शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

सांगली चेंबर ऑफ कॉमर्सच्या निवडणुकीत प्रस्तापितांना विरोधकांनी फोडलाय घाम

By अशोक डोंबाळे | Updated: October 5, 2023 17:42 IST

नेतृत्वाच्या कारभारावर व्यापारी नाराज : बाजार समितीच्या निवडणुकीतील संघर्ष उफाळला

सांगली : चेंबर ऑफ काॅमर्सच्या निवडणुकीत प्रथमच वेगवान घडामोडी घडत आहेत. प्रस्तापित नेतृत्वाच्या विरोधात बाजार समितीच्या निवडणुकीत व्यापाऱ्यांनी बंड करून धक्का दिला. बाजार समिती निवडणुकीतील यशस्वी पॅटर्नचा चेंबरच्या निवडणुकीतही सुशिक्षित तरुण आणि ज्येष्ठ व्यापाऱ्यांनी एकत्र येत विरोधकांना घाम फोडल्याची व्यापाऱ्यांत चर्चा रंगली आहे.चेंबर ऑफ कॉमर्स ही नामांकित संस्था असून, बहुतांशीवेळा निवडणूक बिनविरोध झाली आहे. पण, सत्ताधाऱ्यांच्या कारभाराविरोधात सुशिक्षित तरुण आणि ज्येष्ठ व्यापाऱ्यांमध्ये असंतोष होता. हा असंतोष सांगली बाजार समितीच्या निवडणुकीतही व्यापाऱ्यांनी व्यक्त करून चेंबरचा एक उमेदवार पराभूत केला. बाजार समितीच्या निवडणुकीतील असंतोष चेंबरच्या निवडणुकीतही व्यापारी व्यक्त करताना दिसत आहेत. सत्ताधारी आणि विरोधी गटात सुशिक्षित व्यापारी उभा राहिल्यामुळे निवडणूक लक्षवेधी ठरली आहे.सत्ताधारी विकासकामाच्या जोरावर आमचाच विजय असल्याचे ठणकावून सांगत आहेत. विरोधकांनी सत्ताधारी गटातील नाराजांना बरोबर घेऊन तरुण आणि ज्येष्ठ व्यापाऱ्यांना उमेदवारीची संधी देऊन सत्ताधाऱ्यांसमोर तगडे आव्हान उभा केले आहे. या सत्ताधाऱ्यांना काही राजकर्त्यांनीही छुपा पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. १० ऑक्टोबरला मतदान होणार असून, या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्व व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सत्ताधारी व्यापारी एकता पॅनलचे उमेदवारअण्णासो चौधरी, दीपक चौगुले, अमरसिंह देसाई, सचिन घेवारे, केतन खोकले, मनीष कोठारी, अभय मगदूम, बाळासो पाटील, आप्पासो पाटील, हरिश्चंद्र पाटील, शरदचंद्र शहा, समीर साखरे, राहुल सावर्डेकर.

व्यापारी विकास आघाडी उमेदवारअविनाश अट्टल, रोहित आरवाडे, रवींद्र चिवटे, राजेश खवाटे, विकास मोहिते, संदीप मालू, श्रीगोपाल मर्दा, मुकेश पटेल, बाळासाहेब पाटील, विपुल पाटील, अशोक पाटील, प्रशांत सावर्डेकर.

व्यापाऱ्यांमध्ये असंतोष का?- जीएसटीचा प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष- व्यापाऱ्यांना पोलिस संरक्षण देण्याऐवजी व्यापाऱ्यांकडून पैसे का उखळले?- प्रशासनाच्या माध्यमातून व्यापाऱ्यांची आर्थिक लूट कुणी केली?- नवीन व्यापाऱ्यांना नेतृत्वाची संधी टाळली जात असल्याचा आरोप

चेंबरने अनेक प्रश्न सोडविलेचेंबर ऑफ काॅमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र आणि राज्य शासनाकडे प्रश्न मांडल्यामुळे जीएसटीचा प्रश्न सोडविला. अनेक प्रश्न चेंबरने सोडविल्यामुळे बाजारपेठेचा विकास झाला आहे. याकडे विरोधकांनी दुर्लक्ष करून चालणार नाही, असा सवाल सत्ताधारी नेत्यांनी केला आहे.

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूक