शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

सांगली चेंबर ऑफ कॉमर्सच्या निवडणुकीत प्रस्तापितांना विरोधकांनी फोडलाय घाम

By अशोक डोंबाळे | Updated: October 5, 2023 17:42 IST

नेतृत्वाच्या कारभारावर व्यापारी नाराज : बाजार समितीच्या निवडणुकीतील संघर्ष उफाळला

सांगली : चेंबर ऑफ काॅमर्सच्या निवडणुकीत प्रथमच वेगवान घडामोडी घडत आहेत. प्रस्तापित नेतृत्वाच्या विरोधात बाजार समितीच्या निवडणुकीत व्यापाऱ्यांनी बंड करून धक्का दिला. बाजार समिती निवडणुकीतील यशस्वी पॅटर्नचा चेंबरच्या निवडणुकीतही सुशिक्षित तरुण आणि ज्येष्ठ व्यापाऱ्यांनी एकत्र येत विरोधकांना घाम फोडल्याची व्यापाऱ्यांत चर्चा रंगली आहे.चेंबर ऑफ कॉमर्स ही नामांकित संस्था असून, बहुतांशीवेळा निवडणूक बिनविरोध झाली आहे. पण, सत्ताधाऱ्यांच्या कारभाराविरोधात सुशिक्षित तरुण आणि ज्येष्ठ व्यापाऱ्यांमध्ये असंतोष होता. हा असंतोष सांगली बाजार समितीच्या निवडणुकीतही व्यापाऱ्यांनी व्यक्त करून चेंबरचा एक उमेदवार पराभूत केला. बाजार समितीच्या निवडणुकीतील असंतोष चेंबरच्या निवडणुकीतही व्यापारी व्यक्त करताना दिसत आहेत. सत्ताधारी आणि विरोधी गटात सुशिक्षित व्यापारी उभा राहिल्यामुळे निवडणूक लक्षवेधी ठरली आहे.सत्ताधारी विकासकामाच्या जोरावर आमचाच विजय असल्याचे ठणकावून सांगत आहेत. विरोधकांनी सत्ताधारी गटातील नाराजांना बरोबर घेऊन तरुण आणि ज्येष्ठ व्यापाऱ्यांना उमेदवारीची संधी देऊन सत्ताधाऱ्यांसमोर तगडे आव्हान उभा केले आहे. या सत्ताधाऱ्यांना काही राजकर्त्यांनीही छुपा पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. १० ऑक्टोबरला मतदान होणार असून, या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्व व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सत्ताधारी व्यापारी एकता पॅनलचे उमेदवारअण्णासो चौधरी, दीपक चौगुले, अमरसिंह देसाई, सचिन घेवारे, केतन खोकले, मनीष कोठारी, अभय मगदूम, बाळासो पाटील, आप्पासो पाटील, हरिश्चंद्र पाटील, शरदचंद्र शहा, समीर साखरे, राहुल सावर्डेकर.

व्यापारी विकास आघाडी उमेदवारअविनाश अट्टल, रोहित आरवाडे, रवींद्र चिवटे, राजेश खवाटे, विकास मोहिते, संदीप मालू, श्रीगोपाल मर्दा, मुकेश पटेल, बाळासाहेब पाटील, विपुल पाटील, अशोक पाटील, प्रशांत सावर्डेकर.

व्यापाऱ्यांमध्ये असंतोष का?- जीएसटीचा प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष- व्यापाऱ्यांना पोलिस संरक्षण देण्याऐवजी व्यापाऱ्यांकडून पैसे का उखळले?- प्रशासनाच्या माध्यमातून व्यापाऱ्यांची आर्थिक लूट कुणी केली?- नवीन व्यापाऱ्यांना नेतृत्वाची संधी टाळली जात असल्याचा आरोप

चेंबरने अनेक प्रश्न सोडविलेचेंबर ऑफ काॅमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र आणि राज्य शासनाकडे प्रश्न मांडल्यामुळे जीएसटीचा प्रश्न सोडविला. अनेक प्रश्न चेंबरने सोडविल्यामुळे बाजारपेठेचा विकास झाला आहे. याकडे विरोधकांनी दुर्लक्ष करून चालणार नाही, असा सवाल सत्ताधारी नेत्यांनी केला आहे.

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूक