शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

निवडणूक कधीही होऊ दे, आमची सज्जता!; प्रशासनाचे मत 

By अशोक डोंबाळे | Updated: July 8, 2023 12:50 IST

त्यामुळे निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिले

सांगली : जिल्ह्यातील ६० अथवा ६८ जिल्हा परिषद गट आणि १२० अथवा १३६ पंचायत समिती गणांची रचना निश्चित करून जिल्हा प्रशासनाने निवडणुकांची तयारी ठेवली आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी केली तरी निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी प्रशासकीय यंत्रण सज्ज असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. केवळ ओबीसी आरक्षणानुसार आरक्षण सोडत काढण्याचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे.जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समित्यांमधील सदस्यांचा कार्यकाल दि. १४ मार्च २०२१ रोजी संपला आहे. जवळपास दीड वर्षापासून जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समित्यांवर प्रशासक नियुक्त आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या इतिहासात प्रथमच एवढे दिवस प्रशासक नियुक्त आहे. राज्य सरकारच्या या भूमिकेविरोधात सर्वच पक्षांतील दुसऱ्या फळीतील नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.आता राज्य निवडणूक आयोगातर्फे दि. ५ जुलैरोजी मतदार यादीबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबरदरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, असा अंदाज राजकीय वर्तुळातून वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडे निवडणुकांबाबत विचारणा केली असता सांगण्यात आले की, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका कधीही जाहीर झाल्या तर त्या घेण्यासाठी सज्जता आहे. मतदार याद्यांसह सर्व माहिती तयार आहे.

दोन्ही पद्धतीने मतदारसंघ तयारमहाविकास आघाडी सरकारने जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी ५५, जास्तीत जास्त ८५ केली होती. त्या निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या ६८ गटांची, तर पंचायत समितीच्या १३६ गणांची प्रभाग रचना प्रसिद्ध करून आरक्षण सोडत झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने पूर्वीची रचना रद्द करून गटसंख्या कमीत कमी ५० आणि जास्तीत जास्त ७५ केली. या दोन्ही पद्धतींनुसार जिल्हा प्रशासनाने सध्या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समित्यांची गण संख्या निश्चित केली आहे.

निवडणुका ‘जैसे थे’ ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेशराज्य निवडणूक आयोगातर्फे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील मतदार यादीबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केलेली नाही. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाने ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिले आहे.

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूक