शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात लवकरच ग्रामपंचायत निवडणुकींचा बिगुल वाजणार; लोकसभा, विधानसभा लढतीची रंगीत तालीम होणार

By अशोक डोंबाळे | Updated: August 31, 2023 15:50 IST

ग्रामपंचायतींवर वर्चस्व ठेवण्यासाठी नेत्यांचे कार्यकर्त्यांना बळ

अशोक डोंबाळे

सांगली : जिल्ह्यातील ८६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून मतदार याद्या, प्रभागांचे आरक्षण निश्चित झाले आहे. कोणत्याही क्षणी जिल्हा प्रशासन निवडणुका घोषित करण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीम म्हणूनच भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते ८६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांकडे लक्ष ठेवून आहेत. ग्रामीण राजकारणाचा कणा असलेल्या ग्रामपंचायतींवर आपलेच वर्चस्व राहिले पाहिजे, यासाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना बळ देण्यास सुरुवात केली आहे.जिल्हा परिषद, दहा पंचायत समित्या, काही नगरपंचायतींवर प्रशासक आहे. यात भर म्हणून ८६ ग्रामपंचायतींमध्येही प्रशासक असल्यामुळे दुसऱ्या फळीतील नेतृत्वामधील नेत्यांविरोधात प्रचंड असंतोष खदखदत आहे. लोकसभा निवडणुका डिसेंबर २०२३ ते मे २०२४ पर्यंत केव्हाही होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पूर्वी ग्रामीण मतदारांचा कल समजून घेण्यासाठी ८६ ग्रामपंचायतींच्या निवडणूका सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहेत. अधिकाऱ्यांनी तसे संकेतही दिले आहेत. त्यादृष्टीने त्यांनी निवडणुकीची तयारी केली आहे. 

प्रशासनाचा हा अंदाज घेऊन भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवेसनेच्या नेत्यांनी ग्रामपंचायती आपल्या ताब्यात खेचून आणण्यासाठी रणनीत आखली आहे. नेत्यांकडून कार्यकर्त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने बळही दिले जात आहे. सर्वाधिक २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका शिराळा तालुक्यात होत असून राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, भाजपचे सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक यांनी सर्वाधिक ग्रामपंचायती आपल्या गटाकडे खेचण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानंतर कवठेमहांकाळ तालुक्यात १९ आणि आटपाडी तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. 

या दोन्ही तालुक्यांत राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटीचा परिणाम होणार आहे. भाजपचे माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख, आ. गोपीचंद पडळकर, शिवसेनेचे तानाजी पाटील, राष्ट्रवादीचे हणमंतराव देशमुख गटग्रामपंचायत निवडणुकीत सक्रिय झाला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी आमदार सुमनताई पाटील, खासदार संजय पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे गटानेही माेर्चेबांधणी सुरू केली आहे. 

जत, वाळवा, मिरज, पलूस, कडेगाव तालुक्यांमध्ये दोन ते पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. संख्या कमी असली तरी मोठ्या ग्रामपंचायतीमुळे लोकसभा, विधानसभा निवडणुकीत निर्णायक अशी गावे आहेत. त्यामुळे या तालुक्यातील नेत्यांचेही ग्रामपंचायतींच्या निवडणुकीवर लक्ष आहे. कारण, या ग्रामपंचायतींवर लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील राजकारण सोपे जाणार आहे.

या ग्रामपंचायतींमध्ये रणधुमाळीतालुका - संख्याशिराळा - २९आटपाडी - १६क.महांकाळ - १९जत - ५मिरज - ३तासगाव - २खानापूर - ३पलूस - ३वाळवा - ४कडेगाव - २

ग्रामपंचायतींवरही 'प्रशासक'राजजिल्ह्यातील ८६ ग्रामपंचायतींमधील सदस्यांचा पाच वर्षाचा कार्यकाल संपल्यामुळे तेथे सध्या प्रशासकांची नियुक्ती आहे. म्हणून जिल्हा प्रशासनाने आयोगाच्या सूचनेनुसार आरक्षण सोडत काढण्यासह मतदार याद्या तयार केल्या आहेत. कोणत्याही क्षणी ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्याबाबत शासनाकडून सूचना येताच घेण्यात येतील. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची पूर्ण तयारी केली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक