शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
4
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
5
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
6
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
7
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
8
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
9
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
10
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
11
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
12
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
13
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
14
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
15
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
16
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
17
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
18
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
19
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
20
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

जत पावसाळ्यात तहानलेलाच

By admin | Updated: October 9, 2015 22:49 IST

माणसी २० लिटर पाणी : २४ गावे, २०५ वाड्या-वस्त्यांना ३१ टँकरद्वारे पाणी पुरवठा

जयवंत आदाटे- जत-तालुक्यातील २४ गावे व त्याखालील २०५ वाड्या-वस्त्यांवरील सुमारे ८१ हजार नागरिकांना ३१ टँकरद्वारे ऐन पावसाळ्यातही माणसी २० लिटर याप्रमाणे पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पावसाळा संपत आला आहे. आता परतीचा पाऊस पडत आहे. तालुक्याच्या काही भागात परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पेरण्या झाल्या आहेत. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ४६३ मिलिमीटर असून आजअखेर २२६.८९ मि.मी. पावसाची नोंद येथे झाली आहे. सरासरी ४८ टक्के पाऊस तालुक्यात झाला आहे. एकही साठवण अथवा पाझर तलाव किंवा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला नाही. काही मोजक्याच तलावात पंधरा ते वीस टक्के पाणीसाठा झाला आहे. तसेच अद्याप काही तलाव कोरडे ठणठणीत आहेत.आॅगस्टमध्ये तालुक्यातील ५४ गावात ४७ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात होता. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीस व शेवटी काही प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पेरण्या झाल्या आहेत. तालुक्यात सर्वत्र समान प्रमाणात हा पाऊस झालेला नाही. कुडणूर, व्हसपेठ, धुळकरवाडी, घोलेश्वर, काराजनगी, दरीकोणूर, सालेकिरी-पाच्छापूर, खंडनाळ, कुणीकोणूर, आवंढी, सिंगणहळ्ळी, लोहगाव, बाज, माडग्याळ, बिरनाळ या तेरा गावांतील सोळा टँकर शासनाने बंद केले आहेत. येथे अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला आहे. जमिनीखालील पाण्याची पातळी वाढलेली नाही. पावसाचे पाणी विहिरीत, विंधन विहिरीत व तलावात काही प्रमाणात आले आहे. हे पाणी टिकून राहणार नाही. त्यामुळे शासनाने आमच्या गावातील पिण्याच्या पाण्याचे टँकर बंद करू नयेत, अशी मागणी टँकर बंद करण्यात आलेल्या गावांतील नागरिकांनी केली आहे.उमराणी, डफळापूर, अमृतवाडी, सिंदूर, उटगी, बिळूर, हळ्ळी, सुसलाद, बेवनूर, जाडरबोबलाद, सोन्याळ, माणिकनाळ, येळवी, अंतराळ, बसर्गी, निगडी खुर्द, गोंधळेवाडी, सोनलगी, मोरबगी, अंकलगी, बालगाव, लकडेवाडी या २४ गावात ३१ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यापुढील कालावधित परतीचा पाऊस समाधानकारक झाला, तर प्रशासनाला टँकरच्या संख्येत वाढ करावी लागणार नाही.पावसामुळे ज्या गावात पिण्यासाठी पाणी उपलब्ध झाले आहे, तेथील प्रत्यक्ष पाहणी करून टँकर बंद करण्यात आले आहेत. त्या गावातून परत टँकरची मागणी आल्यानंतर गावाची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यकता असेल, तर तेथे तात्काळ टँकर सुरू केला जाणार आहे, असे जत पंचायत समिती गटविकास अधिकारी ओमराज गहाणे यांनी सांगितले.किरकोळ पावसानंतर टँकर बंद याबाबत जिल्हा परिषद सदस्या सुशिला व्हनमोरे व सुनंदा पाटील म्हणाल्या की, तालुक्यात पुरेसा पाऊस झाला नाही. शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. किरकोळ पावसावरच रब्बी पेरण्या झाल्या आहेत. उन्हाळ्याप्रमाणे तालुक्यात वातावरण आहे. अत्यल्प पाऊस झाल्यानंतर शासनाने पाण्याचे टॅँकर बंद केले आहेत. परंतु या पावसामुळे विहीर अथवा विंधन विहिरीतील पाणी पातळीत वाढ झालेली नाही. टॅँँकर बंद झाल्यामुळे पावसाचे पाणी पिऊन नागरिक व जनावरांना साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.