शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जत पावसाळ्यात तहानलेलाच

By admin | Updated: October 9, 2015 22:49 IST

माणसी २० लिटर पाणी : २४ गावे, २०५ वाड्या-वस्त्यांना ३१ टँकरद्वारे पाणी पुरवठा

जयवंत आदाटे- जत-तालुक्यातील २४ गावे व त्याखालील २०५ वाड्या-वस्त्यांवरील सुमारे ८१ हजार नागरिकांना ३१ टँकरद्वारे ऐन पावसाळ्यातही माणसी २० लिटर याप्रमाणे पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पावसाळा संपत आला आहे. आता परतीचा पाऊस पडत आहे. तालुक्याच्या काही भागात परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पेरण्या झाल्या आहेत. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ४६३ मिलिमीटर असून आजअखेर २२६.८९ मि.मी. पावसाची नोंद येथे झाली आहे. सरासरी ४८ टक्के पाऊस तालुक्यात झाला आहे. एकही साठवण अथवा पाझर तलाव किंवा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला नाही. काही मोजक्याच तलावात पंधरा ते वीस टक्के पाणीसाठा झाला आहे. तसेच अद्याप काही तलाव कोरडे ठणठणीत आहेत.आॅगस्टमध्ये तालुक्यातील ५४ गावात ४७ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात होता. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीस व शेवटी काही प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पेरण्या झाल्या आहेत. तालुक्यात सर्वत्र समान प्रमाणात हा पाऊस झालेला नाही. कुडणूर, व्हसपेठ, धुळकरवाडी, घोलेश्वर, काराजनगी, दरीकोणूर, सालेकिरी-पाच्छापूर, खंडनाळ, कुणीकोणूर, आवंढी, सिंगणहळ्ळी, लोहगाव, बाज, माडग्याळ, बिरनाळ या तेरा गावांतील सोळा टँकर शासनाने बंद केले आहेत. येथे अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला आहे. जमिनीखालील पाण्याची पातळी वाढलेली नाही. पावसाचे पाणी विहिरीत, विंधन विहिरीत व तलावात काही प्रमाणात आले आहे. हे पाणी टिकून राहणार नाही. त्यामुळे शासनाने आमच्या गावातील पिण्याच्या पाण्याचे टँकर बंद करू नयेत, अशी मागणी टँकर बंद करण्यात आलेल्या गावांतील नागरिकांनी केली आहे.उमराणी, डफळापूर, अमृतवाडी, सिंदूर, उटगी, बिळूर, हळ्ळी, सुसलाद, बेवनूर, जाडरबोबलाद, सोन्याळ, माणिकनाळ, येळवी, अंतराळ, बसर्गी, निगडी खुर्द, गोंधळेवाडी, सोनलगी, मोरबगी, अंकलगी, बालगाव, लकडेवाडी या २४ गावात ३१ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यापुढील कालावधित परतीचा पाऊस समाधानकारक झाला, तर प्रशासनाला टँकरच्या संख्येत वाढ करावी लागणार नाही.पावसामुळे ज्या गावात पिण्यासाठी पाणी उपलब्ध झाले आहे, तेथील प्रत्यक्ष पाहणी करून टँकर बंद करण्यात आले आहेत. त्या गावातून परत टँकरची मागणी आल्यानंतर गावाची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यकता असेल, तर तेथे तात्काळ टँकर सुरू केला जाणार आहे, असे जत पंचायत समिती गटविकास अधिकारी ओमराज गहाणे यांनी सांगितले.किरकोळ पावसानंतर टँकर बंद याबाबत जिल्हा परिषद सदस्या सुशिला व्हनमोरे व सुनंदा पाटील म्हणाल्या की, तालुक्यात पुरेसा पाऊस झाला नाही. शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. किरकोळ पावसावरच रब्बी पेरण्या झाल्या आहेत. उन्हाळ्याप्रमाणे तालुक्यात वातावरण आहे. अत्यल्प पाऊस झाल्यानंतर शासनाने पाण्याचे टॅँकर बंद केले आहेत. परंतु या पावसामुळे विहीर अथवा विंधन विहिरीतील पाणी पातळीत वाढ झालेली नाही. टॅँँकर बंद झाल्यामुळे पावसाचे पाणी पिऊन नागरिक व जनावरांना साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.