शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
4
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
5
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
6
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
7
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
8
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
9
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
10
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
11
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
14
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
15
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
16
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
17
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
18
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
19
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
20
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

कापसाच्या साठेबाजीमुळे वस्त्रोद्योग संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 00:13 IST

विटा : देशभरातील वस्त्रोद्योग सध्या काही बड्या मोजक्याच कापूस व्यापाऱ्यांच्या साठेबाजीमुळे अडचणीत सापडला आहे. संबंधित व्यापाºयांनी बाजारपेठेत जास्त दरासाठी कापसाची कृत्रिम टंचाई निर्माण केल्याने संपूर्ण वस्त्रोद्योग संकटात सापडला आहे. परिणामी, बाजारपेठेत सूत व कापड खरेदी-विक्री पूर्णपणे ठप्प झाल्याने कापसाची कृत्रिम टंचाई निर्माण करणाºया दोषी कापूस व्यापाºयांवर शासनाने कठोर कारवाई करावी, ...

विटा : देशभरातील वस्त्रोद्योग सध्या काही बड्या मोजक्याच कापूस व्यापाऱ्यांच्या साठेबाजीमुळे अडचणीत सापडला आहे. संबंधित व्यापाºयांनी बाजारपेठेत जास्त दरासाठी कापसाची कृत्रिम टंचाई निर्माण केल्याने संपूर्ण वस्त्रोद्योग संकटात सापडला आहे. परिणामी, बाजारपेठेत सूत व कापड खरेदी-विक्री पूर्णपणे ठप्प झाल्याने कापसाची कृत्रिम टंचाई निर्माण करणाºया दोषी कापूस व्यापाºयांवर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे.कापसाच्या पीकपाण्याचे वर्ष आॅक्टोबर ते सप्टेंबर असे मोजले जाते. कापूस हंगाम सुरू होण्यापूर्वी केंद्र शासनाच्या कॉटन कॉर्पोरेशनच्यावतीने देशातील पाऊस व कापूस लागवड यांचा अंदाज घेतला जातो. त्यानुसार प्रत्येक वर्षाचा कापसाचा ताळेबंद मांडून त्यातील देशांतर्गत सूतगिरण्या व इतर कापसाची गरज राखीव ठेवून उर्वरित राहिलेल्या कापसाच्या निर्यातीचा कोटा निश्चित केला जातो. त्यानुसार चालू वर्षातील पहिले आठ ते नऊ महिने म्हणजे मेपर्यंत कापसाची उपलब्धता व दर नैसर्गिक तेजी-मंदी गृहीत धरून स्थिर नियंत्रित व स्थिर राहिले होते.कापसाच्या ताळेबंदानुसार जून ते सप्टेंबर या चार महिन्यांसाठी लागणारा कापूस साठा देशात उपलब्ध आहे. परंतु, हा सर्व कापूस केवळ काही मोजके बडे व्यापारी व बहुराष्टÑीय कंपन्यांनी गोदामात साठवून ठेवल्याचे वृत्त आहे. या व्यापाºयांनी संगनमताने गेल्या महिन्यापासून बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण केल्याचा आरोप सूतगिरण्यांच्या व्यवस्थापन व वस्त्रोद्योजकांनी केला आहे. कारण ४१ ते ४२ हजार खंडी असलेला कापूस सध्या ४७ हजार रुपये खंडीनेही मिळत नाही. त्यामुळे सुताच्या उत्पादन किमतीत २० ते २५ रुपये प्रति किलोस, तर कापडाच्या उत्पादन किमतीत त्याप्रमाणात वाढ झाली. परंतु, कापडाच्या वाढलेल्या उत्पादन किमतीत ग्राहक उपलब्ध न झाल्याने कापडाचे दर वाढले नाहीत. परिणामी नुकसान होत असल्याने यंत्रमागधारकांनी सूत खरेदी बंद केली आहे.यंत्रमागधारकांनी सूत खरेदी बंद केल्याने बाजारात सुताचा साठा वाढल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून सुताचा दर १० ते १५ रुपये कमी झाला आहे. त्यामुळे कापड व सूत बाजारात आणखी संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे कापड, सूत खरेदी-विक्री पूर्णपणे ठप्प झाली आहे.दरम्यान, कापूस प्रति खंडीला ५० हजार रुपये झाल्याशिवाय कापूस विक्रीस काढायचाच नाही, असा निर्धार साठेबाजांनी केल्याने कापसाची बाजारात आजही टंचाई आहे. त्यामुळे कापसाचे वाढीव दर, टंचाई व सुताचे घसरलेले दर या दुष्टचक्रात सूतगिरण्या अडकल्या आहेत; तर दुसºया बाजूला सुताचे व कापडाचे दर आणखी कमी होतील का, या विवंचनेमुळे कापड खरेदी-विक्री ठप्प झाली आहे.परिणामी, केवळ कापसाच्या साठेबाजी व कृत्रिम टंचाईमुळे वस्त्रोद्योग साखळीतील सर्व घटक नुकसानीत आले आहेत व अडचणीत सापडले आहेत. त्यासाठी शासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.