शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कापसाच्या साठेबाजीमुळे वस्त्रोद्योग संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 00:13 IST

विटा : देशभरातील वस्त्रोद्योग सध्या काही बड्या मोजक्याच कापूस व्यापाऱ्यांच्या साठेबाजीमुळे अडचणीत सापडला आहे. संबंधित व्यापाºयांनी बाजारपेठेत जास्त दरासाठी कापसाची कृत्रिम टंचाई निर्माण केल्याने संपूर्ण वस्त्रोद्योग संकटात सापडला आहे. परिणामी, बाजारपेठेत सूत व कापड खरेदी-विक्री पूर्णपणे ठप्प झाल्याने कापसाची कृत्रिम टंचाई निर्माण करणाºया दोषी कापूस व्यापाºयांवर शासनाने कठोर कारवाई करावी, ...

विटा : देशभरातील वस्त्रोद्योग सध्या काही बड्या मोजक्याच कापूस व्यापाऱ्यांच्या साठेबाजीमुळे अडचणीत सापडला आहे. संबंधित व्यापाºयांनी बाजारपेठेत जास्त दरासाठी कापसाची कृत्रिम टंचाई निर्माण केल्याने संपूर्ण वस्त्रोद्योग संकटात सापडला आहे. परिणामी, बाजारपेठेत सूत व कापड खरेदी-विक्री पूर्णपणे ठप्प झाल्याने कापसाची कृत्रिम टंचाई निर्माण करणाºया दोषी कापूस व्यापाºयांवर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे.कापसाच्या पीकपाण्याचे वर्ष आॅक्टोबर ते सप्टेंबर असे मोजले जाते. कापूस हंगाम सुरू होण्यापूर्वी केंद्र शासनाच्या कॉटन कॉर्पोरेशनच्यावतीने देशातील पाऊस व कापूस लागवड यांचा अंदाज घेतला जातो. त्यानुसार प्रत्येक वर्षाचा कापसाचा ताळेबंद मांडून त्यातील देशांतर्गत सूतगिरण्या व इतर कापसाची गरज राखीव ठेवून उर्वरित राहिलेल्या कापसाच्या निर्यातीचा कोटा निश्चित केला जातो. त्यानुसार चालू वर्षातील पहिले आठ ते नऊ महिने म्हणजे मेपर्यंत कापसाची उपलब्धता व दर नैसर्गिक तेजी-मंदी गृहीत धरून स्थिर नियंत्रित व स्थिर राहिले होते.कापसाच्या ताळेबंदानुसार जून ते सप्टेंबर या चार महिन्यांसाठी लागणारा कापूस साठा देशात उपलब्ध आहे. परंतु, हा सर्व कापूस केवळ काही मोजके बडे व्यापारी व बहुराष्टÑीय कंपन्यांनी गोदामात साठवून ठेवल्याचे वृत्त आहे. या व्यापाºयांनी संगनमताने गेल्या महिन्यापासून बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण केल्याचा आरोप सूतगिरण्यांच्या व्यवस्थापन व वस्त्रोद्योजकांनी केला आहे. कारण ४१ ते ४२ हजार खंडी असलेला कापूस सध्या ४७ हजार रुपये खंडीनेही मिळत नाही. त्यामुळे सुताच्या उत्पादन किमतीत २० ते २५ रुपये प्रति किलोस, तर कापडाच्या उत्पादन किमतीत त्याप्रमाणात वाढ झाली. परंतु, कापडाच्या वाढलेल्या उत्पादन किमतीत ग्राहक उपलब्ध न झाल्याने कापडाचे दर वाढले नाहीत. परिणामी नुकसान होत असल्याने यंत्रमागधारकांनी सूत खरेदी बंद केली आहे.यंत्रमागधारकांनी सूत खरेदी बंद केल्याने बाजारात सुताचा साठा वाढल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून सुताचा दर १० ते १५ रुपये कमी झाला आहे. त्यामुळे कापड व सूत बाजारात आणखी संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे कापड, सूत खरेदी-विक्री पूर्णपणे ठप्प झाली आहे.दरम्यान, कापूस प्रति खंडीला ५० हजार रुपये झाल्याशिवाय कापूस विक्रीस काढायचाच नाही, असा निर्धार साठेबाजांनी केल्याने कापसाची बाजारात आजही टंचाई आहे. त्यामुळे कापसाचे वाढीव दर, टंचाई व सुताचे घसरलेले दर या दुष्टचक्रात सूतगिरण्या अडकल्या आहेत; तर दुसºया बाजूला सुताचे व कापडाचे दर आणखी कमी होतील का, या विवंचनेमुळे कापड खरेदी-विक्री ठप्प झाली आहे.परिणामी, केवळ कापसाच्या साठेबाजी व कृत्रिम टंचाईमुळे वस्त्रोद्योग साखळीतील सर्व घटक नुकसानीत आले आहेत व अडचणीत सापडले आहेत. त्यासाठी शासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.