शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम विभागाची ‘मनरेगा’कडे पाठ

By admin | Updated: July 27, 2014 22:58 IST

कडेगाव तालुक्यातील स्थिती : बावीस गावे वंचित

प्रताप महाडिक : कडेगाव , तालुक्यातील ५५ पैकी २२ गावांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांची सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी आहे. परंतु बांधकाम विभागाने यापैकी एकाही गावात योजनेची कामे सुरू केली नाहीत. यामुळे २२ गावांतील ग्रामस्थांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.तालुक्यातील ३३ गावांमध्ये पंचायत समितीकडून रोजगार हमी योजनेची कामे केली जातात. या गावांमधील रोजगार हमी योजनेची कामे सुरळीतपणे सुरू आहेत. सध्या पंचायत समितीकडून १४ कामे सुरू आहेत आणि १६२ मजुरांना रोजगार मिळाला आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र त्यांच्याकडील कडेगाव, निमसोड, सोहोली, शिवाजीनगर, नेर्ली, येडे, अपशिंगे, खंबाळे औंध, कोतवडे, कडेपूर, रायगाव, हिंगणगाव खुर्द, चिखली, तडसर, हिंगणगाव बुद्रुक, ढाणेवाडी, उपाळे वांगी, येतगाव, वाजेगाव, कान्हरवाडी, आसद या गावांमध्ये रोजगार हमी योजनेची कामे केली नाहीत. याबाबत पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी केली होती. परंतु तरी या अधिकाऱ्यांनी रोजगार हमी योजनेची कामे केली नाहीत.कारवाईची मागणीसार्वजनिक बांधकाम विभागावर महात्मा गांधी रोजगार हमी योजना राबविणे बंधनकारक आहे. परंतु येथील अधिकारी जबाबदारी झटकून कामांचा प्रस्तावच घेत नाहीत आणि घेतला तरी कामे मंजूर करीत नाहीत. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.