शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

दहावीच्या परीक्षा रद्द, पण पुढील प्रवेशाचा सगळाच गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : दहावीची परीक्षा रद्द झाली तरी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन, पुढील प्रवेश, सीईटी या सर्वच बाबतीत गोंधळात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : दहावीची परीक्षा रद्द झाली तरी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन, पुढील प्रवेश, सीईटी या सर्वच बाबतीत गोंधळात गोंधळ आहे. दहावीनंतरचे विविध शिक्षणक्रमांची प्रवेश प्रक्रिया संभ्रमावस्थेत आहे.

शासनाने सामायिक प्रवेश परीक्षा सुचित केली असली तरी त्याच्याही हालचाली नाहीत, त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक व पालक सारेच गोंधळात आहेत.

चौकट

आयटीआय, डिप्लोमाचे प्रवेश कसे होणार?

दहावीनंतर डिप्लोमा व आयटीआय प्रवेशासाठी चढाओढ असते. दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या तरी मुलांचे मूल्यांकन झालेले नाही, त्यामुळे या शिक्षणक्रमांची प्रवेशप्रक्रिया अधांतरीच आहे. शासनाने सीईटी त्वरित घेऊन ही समस्या मार्गी लावण्याची शिक्षण संस्थांची मागणी आहे. तंत्रशिक्षण परिषदेच्या मार्गदर्शनानुसार डिप्लोमाचे प्रवेश होतील; पण परिषदेनेही अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. दहावीबाबतचा निर्णय लवकरात लवकर कळवा, अशी विनंती परिषदेने शासनाला व दहावी बोर्डाला केली आहे. आयटीआयला मात्र दहावीच्या अधिकृत निकालाची प्रतीक्षा आहे.

चौकट

ऑनलाइन सीईटी ठरेल फार्स

दहावीनंतरची सीईटी ऑनलाइन घेतल्यास तो फार्स ठरण्याची भीती आहे. गुणवान मुलांवर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय दहावीच्या हजारो विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन सीईटीसाठी मोठी यंत्रणा उभी करावी लागेल. दहावीला बोर्ड परीक्षेऐवजी थेट ऑनलाइन परीक्षा समोर आल्याने मुलांचा गोंधळही उडणार आहे. शिवाय वेगवेगळ्या शिक्षणक्रमांसाठी एकच सीईटी कितपत व्यवहार्य ठरेल? असाही शिक्षणतज्ज्ञांचा प्रश्न आहे.

चौकट

ऑफलाइन परीक्षेला कोरोना आडवा

सीईटी ऑफलाइन घ्यायची तर त्याला कोरोना आडवा येत आहे. परीक्षेसाठी गर्दी कशी टाळणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सध्या कोरोना उच्चांकी पातळीवर आहे, शिवाय तरुणांना संसर्गाचे प्रमाण जास्त आहे. या स्थितीत ऑफलाइन परीक्षेसाठी पालक तयार होणार का? हादेखील प्रश्न आहे.

चौकट

अंतर्गत मूल्यमापनाविषयी सूचना नाहीत

- दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना वर्गोन्नत केले, पण त्यांच्या मूल्यांकनाविषयी काहीही मार्गदर्शक सूचना बोर्डाकडून आलेल्या नाहीत. त्यामुळे दहावीचे शिक्षक व शाळांमध्ये संभ्रम आहे.

- विद्यार्थ्यांच्या गुणांकनाविषयीचा आदेश सोमवारी (दि. १६) येण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षभरात कोणतीच परीक्षा झाली नसल्याने गुणांकन कसे होणार, याविषयी उत्सुकता आहे.

पॉईंटर्स

अशी आहे प्रवेश क्षमता

जिल्ह्यातील उच्च माध्यमिक शाळा - २६४

अकरावी प्रवेश क्षमता - ४५,९६०

शिक्षक व प्राचार्य म्हणतात...

दहावीचा निकाल निश्चित नसल्याने आयटीआयची प्रवेश प्रक्रिया ठप्प आहे. दरवर्षी दहावीचे निकाल लागताच जुलैपासून प्रवेश प्रक्रिया सुुरू होते. यंदा शासनाने दहावीचे मूल्यांकन जाहीर केले असले तरी अद्याप गुण किंवा टक्केवारी स्पष्ट झालेली नाही. ती जाहीर झाल्यावरच आयटीआयचे प्रवेश सुरू होतील. सीईटी घेतली तरी आयटीआयसाठी काय अभ्यासक्रम असेल हा प्रश्न आहे.

- प्रमोद दहीवडे, आटीआय शिक्षक, सांगली.

दहावीचे मूल्यांकन कधी जाहीर होईल, याची आम्हाला प्रतीक्षा आहे. तंत्रशिक्षण बोर्डाच्या सूचनांनुसार प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल. दहावीनंतरची सीईटी लवकरात लवकर घेतली, तर डिप्लोमाचे प्रवेशही मार्गी लागतील. सीईटी घेताना डिप्लोमासह सर्वच शिक्षणक्रमांसाठी उपयुक्त प्रश्न त्यामध्ये असतील, याची काळजी घ्यायला हवी.

- प्रा. अमोल विभुते, प्राध्यापक, महिला तंत्रनिकेतन, तासगाव.

दहावीच्या निकालासाठी वेळ घालविण्याऐवजी प्रवेशासाठी फॉर्म भरून घेण्याचे काम सुुरू करा, असे शासनाला सुचविले आहे. सीईटी ऑनलाइन घेतली तर ती घरातून होऊ नये, त्यामुळे पारदर्शकता राहणार नाही. स्पर्धा परीक्षा केंद्रांप्रमाणे सेतू किंवा अन्य केंद्रांवर ती व्हायला हवी. कोरोनाची काळजी घेऊन टप्प्याटप्प्याने सीईटी घेता येईल. वेळ न घालवता सीईटीबाबतचा निर्णय तातडीने व्हावा.

- प्रा. नारायण मराठे, विभाग प्रमुख, वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगली.