शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

दहावीच्या परीक्षा रद्द, पण पुढील प्रवेशाचा सगळाच गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : दहावीची परीक्षा रद्द झाली तरी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन, पुढील प्रवेश, सीईटी या सर्वच बाबतीत गोंधळात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : दहावीची परीक्षा रद्द झाली तरी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन, पुढील प्रवेश, सीईटी या सर्वच बाबतीत गोंधळात गोंधळ आहे. दहावीनंतरचे विविध शिक्षणक्रमांची प्रवेश प्रक्रिया संभ्रमावस्थेत आहे.

शासनाने सामायिक प्रवेश परीक्षा सुचित केली असली तरी त्याच्याही हालचाली नाहीत, त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक व पालक सारेच गोंधळात आहेत.

चौकट

आयटीआय, डिप्लोमाचे प्रवेश कसे होणार?

दहावीनंतर डिप्लोमा व आयटीआय प्रवेशासाठी चढाओढ असते. दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या तरी मुलांचे मूल्यांकन झालेले नाही, त्यामुळे या शिक्षणक्रमांची प्रवेशप्रक्रिया अधांतरीच आहे. शासनाने सीईटी त्वरित घेऊन ही समस्या मार्गी लावण्याची शिक्षण संस्थांची मागणी आहे. तंत्रशिक्षण परिषदेच्या मार्गदर्शनानुसार डिप्लोमाचे प्रवेश होतील; पण परिषदेनेही अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. दहावीबाबतचा निर्णय लवकरात लवकर कळवा, अशी विनंती परिषदेने शासनाला व दहावी बोर्डाला केली आहे. आयटीआयला मात्र दहावीच्या अधिकृत निकालाची प्रतीक्षा आहे.

चौकट

ऑनलाइन सीईटी ठरेल फार्स

दहावीनंतरची सीईटी ऑनलाइन घेतल्यास तो फार्स ठरण्याची भीती आहे. गुणवान मुलांवर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय दहावीच्या हजारो विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन सीईटीसाठी मोठी यंत्रणा उभी करावी लागेल. दहावीला बोर्ड परीक्षेऐवजी थेट ऑनलाइन परीक्षा समोर आल्याने मुलांचा गोंधळही उडणार आहे. शिवाय वेगवेगळ्या शिक्षणक्रमांसाठी एकच सीईटी कितपत व्यवहार्य ठरेल? असाही शिक्षणतज्ज्ञांचा प्रश्न आहे.

चौकट

ऑफलाइन परीक्षेला कोरोना आडवा

सीईटी ऑफलाइन घ्यायची तर त्याला कोरोना आडवा येत आहे. परीक्षेसाठी गर्दी कशी टाळणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सध्या कोरोना उच्चांकी पातळीवर आहे, शिवाय तरुणांना संसर्गाचे प्रमाण जास्त आहे. या स्थितीत ऑफलाइन परीक्षेसाठी पालक तयार होणार का? हादेखील प्रश्न आहे.

चौकट

अंतर्गत मूल्यमापनाविषयी सूचना नाहीत

- दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना वर्गोन्नत केले, पण त्यांच्या मूल्यांकनाविषयी काहीही मार्गदर्शक सूचना बोर्डाकडून आलेल्या नाहीत. त्यामुळे दहावीचे शिक्षक व शाळांमध्ये संभ्रम आहे.

- विद्यार्थ्यांच्या गुणांकनाविषयीचा आदेश सोमवारी (दि. १६) येण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षभरात कोणतीच परीक्षा झाली नसल्याने गुणांकन कसे होणार, याविषयी उत्सुकता आहे.

पॉईंटर्स

अशी आहे प्रवेश क्षमता

जिल्ह्यातील उच्च माध्यमिक शाळा - २६४

अकरावी प्रवेश क्षमता - ४५,९६०

शिक्षक व प्राचार्य म्हणतात...

दहावीचा निकाल निश्चित नसल्याने आयटीआयची प्रवेश प्रक्रिया ठप्प आहे. दरवर्षी दहावीचे निकाल लागताच जुलैपासून प्रवेश प्रक्रिया सुुरू होते. यंदा शासनाने दहावीचे मूल्यांकन जाहीर केले असले तरी अद्याप गुण किंवा टक्केवारी स्पष्ट झालेली नाही. ती जाहीर झाल्यावरच आयटीआयचे प्रवेश सुरू होतील. सीईटी घेतली तरी आयटीआयसाठी काय अभ्यासक्रम असेल हा प्रश्न आहे.

- प्रमोद दहीवडे, आटीआय शिक्षक, सांगली.

दहावीचे मूल्यांकन कधी जाहीर होईल, याची आम्हाला प्रतीक्षा आहे. तंत्रशिक्षण बोर्डाच्या सूचनांनुसार प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल. दहावीनंतरची सीईटी लवकरात लवकर घेतली, तर डिप्लोमाचे प्रवेशही मार्गी लागतील. सीईटी घेताना डिप्लोमासह सर्वच शिक्षणक्रमांसाठी उपयुक्त प्रश्न त्यामध्ये असतील, याची काळजी घ्यायला हवी.

- प्रा. अमोल विभुते, प्राध्यापक, महिला तंत्रनिकेतन, तासगाव.

दहावीच्या निकालासाठी वेळ घालविण्याऐवजी प्रवेशासाठी फॉर्म भरून घेण्याचे काम सुुरू करा, असे शासनाला सुचविले आहे. सीईटी ऑनलाइन घेतली तर ती घरातून होऊ नये, त्यामुळे पारदर्शकता राहणार नाही. स्पर्धा परीक्षा केंद्रांप्रमाणे सेतू किंवा अन्य केंद्रांवर ती व्हायला हवी. कोरोनाची काळजी घेऊन टप्प्याटप्प्याने सीईटी घेता येईल. वेळ न घालवता सीईटीबाबतचा निर्णय तातडीने व्हावा.

- प्रा. नारायण मराठे, विभाग प्रमुख, वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगली.