शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
3
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
4
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
5
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
6
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
7
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
8
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
9
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
10
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
11
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
12
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
13
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
14
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
15
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
16
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
17
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
18
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
19
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
20
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप

दहा महिने मानधनापासून ग्रामरोजगार सेवक वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 23:34 IST

अर्जुन कर्पे ।कवठेमहांकाळ : तुटपुंज्या मानधनावर काम करणारे ग्रामरोजगार सेवक काम करूनही शासनाच्या लाल फितीच्या कारभारामुळे तब्बल दहा महिन्यांच्या मानधनापासून वंचित आहेत. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेने या ग्रामरोजगार सेवकांचे मानधन का थकविले आहे, हा प्रश्न उपस्थित होत आहे.तालुक्यात ग्रामस्तरावरील विविध कामे करण्यासाठी शासनाने ६० ग्रामरोजगार सेवकांची नियुक्ती केली आहे. ...

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : कवठेमहांकाळ तालुक्यात लाल फितीचा फटका!

अर्जुन कर्पे ।कवठेमहांकाळ : तुटपुंज्या मानधनावर काम करणारे ग्रामरोजगार सेवक काम करूनही शासनाच्या लाल फितीच्या कारभारामुळे तब्बल दहा महिन्यांच्या मानधनापासून वंचित आहेत. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेने या ग्रामरोजगार सेवकांचे मानधन का थकविले आहे, हा प्रश्न उपस्थित होत आहे.तालुक्यात ग्रामस्तरावरील विविध कामे करण्यासाठी शासनाने ६० ग्रामरोजगार सेवकांची नियुक्ती केली आहे. यामधील ३० सेवकांचे मानधन मोठ्या प्रयत्नानंतर देण्यात आले. अद्यापही ३० ग्रामरोजगार सेवकांचे दहा महिन्यांचे अडीच लाख रुपये मानधन दिलेले नाही. त्यांनी केलेला दोन वर्षाचा प्रशासकीय खर्चही अद्याप देण्यात आलेला नाही.

कवठेमहांकाळ तालुका दुष्काळाशी सामना करत आहे. म्हैसाळ व टेंभूचे पाणी कालव्यात केवळ पूजण्यापुरतेच येते. तालुक्यात मोठा उद्योग नाही. त्यामुळे बेरोजगारांची संख्या मोठी आहे. याचा विचार करून अनेक सुशिक्षित तरुण संसाराचा गाडा चालवण्यासाठी तुटपुंज्या मानधनावर रोजगार सेवक म्हणून काम करीत आहेत. परंतु प्रशासनाला याचे काही देणे-घेणे नाही. तब्बल दहा महिन्यांचे मानधन व दोन वर्षाचा खर्च प्रशासनाने त्यांना दिलेला नाही.

पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या कारभारावर संताप व नाराजी व्यक्त करीत या रोजगार सेवकांनी जिल्हाभर काम बंद ठेवण्याचा निर्णय घेण्याचे ठरवले आहे.प्रशासनाचे उदासीन धोरण आणि निवडणुकीपुरता या तरुणांचा वापर करणारे लोकप्रतिनिधी, यांच्यामुळे हे रोजगार सेवक काम करूनही उपाशी राहू लागले आहेत. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला निवडून दिलेले लोकप्रतिनिधी नेमके काय काम करतात? लोकप्रतिनिधी जनतेचे, तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिलेत की फक्त ठेकेदारी करण्यासाठी व टक्केवारी घेण्यासाठी? असा प्रश्न जनता विचारू लागली आहे. रोजगार सेवकांचे दहा महिन्याचे थकीत अडीच लाख रुपये मानधन व प्रशासकीय खर्च प्रशासन कधी देणार? लोकप्रतिनिधी रोजगार सेवकांचा प्रश्न कधी सोडवणार?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.लोकप्रतिनिधी उदासीनया ग्रामरोजगार सेवकांच्या मानधनासाठी लोकप्रतिनिधीही उदासीन आहेत. मतांचे राजकारण करण्यापेक्षा त्यांनी तालुक्यातील बेरोजगारीचा प्रश्न आधी सोडवावा, अशी मागणी रोजगार सेवक करीत आहेत. 

शिकूनही हाताला काम मिळत नाही, म्हणून आम्ही रोजगार सेवकाचे काम मानधनावर स्वीकारले. कसा तरी कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता. परंतु आठ महिन्याचे मानधन प्रशासनाने दिले नाही. आमच्या केलेल्या कामाचे दामसुद्धा देण्यास प्रशासन विलंब लावत आहे. त्यामुळे आम्ही पुढील आठवड्यत काम बंद करणार आहोत.- तानाजी शिंगाडे, तालुकाध्यक्ष, ग्रामरोजगार सेवक संघटना

टॅग्स :Sangliसांगलीcollectorजिल्हाधिकारीjobनोकरी