शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

नुकसानभरपाईवरील तांत्रिक ढग हटले

By admin | Updated: June 21, 2016 01:22 IST

जिल्हा बॅँक : शेतकऱ्यांच्या खात्यावर २७ कोटी रुपये झाले वर्ग

सांगली : खरीप २०१५ मधील जिल्ह्यातील ६३ हजार २८८ लाभार्थी शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विम्याच्या नुकसानभरपाईची रक्कम येत्या दोन दिवसात मिळणार आहे. तांत्रिक ढग हटल्यानंतर जिल्ह्यातील २१७ सोसायट्यांमध्ये भरपाईची रक्कम वर्ग झाली असून, येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा जमा होणार आहेत, अशी माहिती जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले की, नुकसानभरपाईची ही रक्कम प्राप्त झाल्यानंतर लाभार्थींची जी यादी प्राप्त झाली त्यात अनेक त्रुटी होत्या. पूर्ण नाव नसणे, खातेक्रमांक चुकीचा असणे, एकाच नावाच्या दोन व्यक्तींमुळे झालेला गोंधळ अशा अनेक गोष्टींचे अडथळे बँकेसमोर होते. चुकीच्या पद्धतीने वाटप करण्याऐवजी खातेनिहाय शहानिशा करून या रकमा लाभार्थ्यांना देण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार आता बँकेच्या २१७ शाखांमध्ये सोमवारी रकमा वर्ग करण्यात आल्या आहेत. आता या रकमा संबंधित शाखांकडून लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होतील. त्यामुळे दोन दिवसात शेतकऱ्यांना या रकमा मिळण्यास आता कोणतीही अडचण राहिलेली नाही. पीकविम्याची एकूण रक्कम २७ कोटी २0 लाख ४७ हजार रुपये इतकी आहे. विमा संरक्षित रकमेच्या तुलनेत प्राप्त झालेल्या भरपाईची सरासरी टक्केवारी ५७.९0 इतकी आहे. तालुकानिहाय भरपाईच्या टक्केवारीचा विचार केल्यास सर्वाधिक ६८.५0 टक्के भरपाई तासगाव तालुक्यातील लाभार्थींना मिळाली आहे. त्याखालोखाल जत तालुक्यात ६४ टक्के, कवठेमहांकाळमध्ये ४६.0३ टक्के भरपाई मिळाली आहे. कडेगाव तालुक्यात सर्वात कमी ४.६५ इतकी टक्केवारी आहे. याठिकाणी ५९९ शेतकऱ्यांनी ४६ लाख ८८ हजार रुपयांचा विमा उतरविला होता. यापैकी त्यांना २ लाख १९ हजार रुपये प्राप्त झाले आहेत. त्यानंतर वाळवा तालुक्यातही ४.७६ टक्के इतकी कमी भरपाई प्राप्त झाली आहे, मात्र ठिकाणी लाभार्थींची संख्या केवळ ५ आहे. (प्रतिनिधी)