शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
5
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
6
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
7
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
8
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
9
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
10
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
11
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
12
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
13
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
14
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
15
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
16
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
17
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
18
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
19
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
20
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 

शिक्षकांनो, अगोदर मुलं प्रगत करा...!

By admin | Updated: July 10, 2016 00:59 IST

औरंगाबाद : शाळेच्या वेळेत गुरुजी मोबाईलवर खेळत बसतात की व्हॉटस्अ‍ॅपवर चॅटिंग करतात, याच्याशी आमचे काहीही देणे-घेणे नाही. त्यांनी दिवसभर काहीही करावे, मात्र वर्गातील मुलं प्रगत झाली पाहिजेत.

औरंगाबाद : शाळेच्या वेळेत गुरुजी मोबाईलवर खेळत बसतात की व्हॉटस्अ‍ॅपवर चॅटिंग करतात, याच्याशी आमचे काहीही देणे-घेणे नाही. त्यांनी दिवसभर काहीही करावे, मात्र वर्गातील मुलं प्रगत झाली पाहिजेत. ती शिकली पाहिजेत. आमची बांधिलकी गुरुजींसोबत नाही, ती मुलांसोबत आहे, अशी भूमिका राज्याचे शालेय शिक्षण सचिव नंदकुमार यांनी आज येथे ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.ते म्हणाले की, गुरुजींनी शाळेच्या वेळेत व्हॉटस्अ‍ॅपवर चॅटिंग करावी की अन्य काही करावे, यासंबंधी आमची कसलीही हरकत नाही. बस्स, जिल्हा परिषद शाळांतील मुले प्रगत झाली पाहिजेत. हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. संपूर्ण राज्यातील जि. प. शाळांतील मुले डिसेंबर २०१७ पर्यंत प्रगत झाली पाहिजेत, हा आमचा संकल्प आहे; परंतु औरंगाबादसह राज्यातील काही जिल्हा परिषद शिक्षकांचा विश्वास आहे की, आम्ही डिसेंबर २०१७ नव्हे, तर एक वर्ष अगोदरच (डिसेंबर २०१६) मुलं प्रगत करून दाखवू. शिक्षकांवर कोणत्याही गोष्टीची सक्ती करण्यात आलेली नाही. जिल्हा परिषदेत शाळांतील मुलांना लिहिता येत नाही की वाचताही येत नाही, ही खाजगी शाळांमार्फत पसरविलेली अफवा आहे. ज्यामुळे जि. प. शाळांवर असलेला विश्वास उडेल व ती मुले खाजगी शाळेत येतील, या हेतूने पसरविलेली ती अफवा आहे, असेही नंदकुमार म्हणाले.सक्ती नाहीशिक्षकांवर ‘ज्ञानरचनावाद शिक्षण पद्धत लादली जातेय’ याकडे नंदकुमार यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, शिक्षकांवर कोणतीही अध्यापन पद्धत लादलेली नाही.४ज्या अध्यापन पद्धतीमुळे मुले प्रगत होत असतील, ती पद्धत शिक्षकांनी अंगिकारावी. शिक्षकांना ‘ज्ञानरचनावाद’ ही शिक्षण पद्धत सक्तीची करण्यात आलेली नाही. शिक्षकांनी कोणती अध्यापन पद्धत अवलंबावी. तो शाळेत काय करतो. तो मुख्यालयी राहतो की नाही, यावर आमचा कोणताही आक्षेप नाही. ४मात्र, मुले शिकली पाहिजेत. जर ती शिकली नसतील, तर ती का शिकली नाहीत, याचा आम्ही जाब विचारू. यावर शिक्षकांनीच आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे सांगून शिक्षक संघटनांचे वाढते ‘फॅड’ किंवा शिक्षकांमध्ये वाढत चाललेल्या ‘पुढारपणा’बद्दल उत्तर देण्यास नंदकुमार यांनी पद्धशीरपणे बगल दिली.