शहरं
Join us  
Trending Stories
1
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
2
'निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने कारण शोधण्याचा खटाटोप'; शिष्ठमंडळाच्या बैठकीवर शंभूराज देसाईंची टीका
3
Gold Price Today 15 October: आजही सोन्यात तेजी, पण चांदीचे दर घसरले; पाहा १८,२२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर
4
Bihar Election JDU: चिराग पासवानांना नितीश कुमारांचा झटका; दावा केलेल्या जागांवरच उतरवले उमेदवार
5
"...तेव्हा तर अजित पवार तावातावाने बोलत होते"; मतदार याद्यांच्या घोळावरुन बोलताना राज ठाकरेंनी सुनावलं
6
अजब देश! संसद, सरकार, सैन्य सगळं आहे, पण जगाच्या नकाशावर अस्तित्वच नाही, कारण काय?
7
तामिळनाडूत हिंदी गाणी, चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी; स्टॅलिन सरकारने आणले विधेयक
8
AFG vs BAN : वयाच्या चाळीशीत नबीनं रचला इतिहास; पाक खेळाडूच्या वर्ल्ड रेकॉर्डला लावला सुरुंग
9
Good News: महागाई ते ट्रेड डील पर्यंत... मोदी सरकारसाठी दोन दिवसांत आल्या एका पाठोपाठ एक ४ गुड न्यूज
10
'निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरुन कोण तर चालवतंय', जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
"माझ्या नवऱ्याला मार, नाहीतर मी..."; ५ मुलांच्या आईचा हट्ट, बॉयफ्रेंडपेक्षा १२ वर्षांनी आहे मोठी
12
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
13
“राहुल गांधींनी मतदारयादीतील घोळ देश पातळीवर मांडला, हे निकोप लोकशाहीला घातक”: थोरात
14
Ranji Trophy : पृथ्वी शॉचा फ्लॉप शो! मुंबईकरासह चौघांच्या पदरी भोपळा पडल्यानं महाराष्ट्र संघ अडचणीत
15
"पत्नीला म्हणाले, बसमध्ये बसलोय", तो कॉल ठरला शेवटचा, जितेशचा होरपळून गेला जीव; ओळखही पटेना
16
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
17
Pankaj Dheer Death: 'महाभारत'मधील 'कर्ण' काळाच्या पडद्याआड, अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगानं निधन
18
बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
19
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
20
Priyal Yadav : प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?

न्यायालयाच्या कचाट्यामुळे शिक्षक भरती प्रक्रिया रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 16:44 IST

शासनाने शिक्षक भरती प्रक्रिया राबविताना त्रुटीवर पर्याय न शोधल्याने भरती प्रकियेतील अडथळे काही दूर होताना दिसत नाहीत. ब्रीज कोर्सची अट, मागासवर्गीयांच्या कमी जागा आणि इंग्रजी माध्यमांच्या डी. एड्. धारकांच्या प्रश्नावर तरुणांनी न्यायालयात दाद मागितली असून, आता यावरील निकालानंतरच भरतीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देन्यायालयाच्या कचाट्यामुळे शिक्षक भरती प्रक्रिया रखडलीडी. एड्. धारकांच्या प्रश्नावर तरुणांनी मागितली न्यायालयात दाद

सांगली : शासनाने शिक्षक भरती प्रक्रिया राबविताना त्रुटीवर पर्याय न शोधल्याने भरती प्रकियेतील अडथळे काही दूर होताना दिसत नाहीत. ब्रीज कोर्सची अट, मागासवर्गीयांच्या कमी जागा आणि इंग्रजी माध्यमांच्या डी. एड्. धारकांच्या प्रश्नावर तरुणांनी न्यायालयात दाद मागितली असून, आता यावरील निकालानंतरच भरतीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शिक्षक भरती सुरू झाली असली तरी शासनाकडून सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न झाला नसल्याने डी. एड्., बी. एड्.धारकांत अस्वस्थता आहे. एकतर सुरुवातीला २४ हजार जागांवरील भरती घोषित करून प्रत्यक्षात १० हजारांवरच जागांची प्रक्रिया राबविण्यात आल्याने तरुणांत संताप आहे.शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाली असतानाच, काही घटकांवर अन्याय झाल्याने त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

यासंदर्भात एकूण तीन याचिका दाखल असल्याचे समजते. त्यानुसार ज्या बी. एड्.धारकांना १ ली ते पाचवीसाठी काम करावयाचे आहे, त्यांनी ब्रीज कोर्स पूर्ण करण्याची अट घालण्यात आली आहे. सेवेत असताना हा कोर्स करता येत असल्याने नोकरीच्या अगोदरच हा कोर्स कसा करणार? असा सवाल बी.एड्.धारकांनी उपस्थित केला आहे.मागासवर्गीय प्रवर्गातील ५० टक्के जागांची कपात करण्यात आली आहे. यामुळे भरतीसाठी लागणारे मेरीट वाढणार असून, सर्वच प्रवर्गाला याचा फटका बसणार आहे. त्यामुळे बिंदूनामावलीत जो काही बदल करावयाचा तो करून ५० टक्के जागा आत्ताच भरण्याची मागणी करण्यात आली आहे. तिसऱ्या प्रकरणात इंग्रजी माध्यमातून डी.एड्. केलेल्या उमेदवारांसाठी पूर्वी २० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. आता भरती प्रक्रिया राबविताना या २० टक्के जागा कपात करण्यात आल्या आहेत. याबाबत न्यायालयाने अंतरिम निकाल देताना २० टक्के जागा राखीव ठेवण्याचे निर्देश दिले असले तरी त्याचा अंतिम निकाल अपेक्षित आहे.आचारसंहितेआधी भरती पूर्ण करण्याचे आश्वासन देऊनही त्याची अंमलबजावणी करण्यात आली नसल्याने तरुणांत संतापाची भावना आहे.

टॅग्स :Teachers Recruitmentशिक्षकभरतीSangliसांगली