शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

तासगाव नगरपालिकेची निवडणूक दुरंगी की तिरंगी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:42 IST

दत्ता पाटील तासगाव : तासगाव नगरपालिका निवडणुकीला अजून अवधी आहे. मात्र त्यापूर्वीच शहरात नेते आणि कार्यकर्त्यांकडून जुळवाजुळव सुरू आहे. ...

दत्ता पाटील

तासगाव : तासगाव नगरपालिका निवडणुकीला अजून अवधी आहे. मात्र त्यापूर्वीच शहरात नेते आणि कार्यकर्त्यांकडून जुळवाजुळव सुरू आहे. सत्ताधारी भाजप स्वबळावर लढणार आहे, मात्र राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना स्वबळ आजमावणार की महाविकास आघाडी करून लढणार, याबाबत नेमके चित्र स्पष्ट नसल्याने इच्छुकांकडून गोंधळलेल्या अवस्थेतच मोर्चेबांधणी सुरू आहे.

महाविकास आघाडीच्या भवितव्यावरच पालिकेतील लढत दुरंगी होणार की तिरंगी, यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

तासगाव नगरपालिकेत गतवेळच्या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत झाली होती. या लढती राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये आघाडी झाली नसल्याचा फायदा भाजपला झाला होता. थेट नगराध्यक्ष निवडीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उमेदवारांतील मतविभागणीमुळे भाजपला नगराध्यक्षपदाची लॉटरी लागली होती.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या अडेलतट्टू भूमिकेचा फायदा भाजपला झाला. भाजपने खासदार संजयकाका पाटील यांच्या माध्यमातून कोट्यवधीचा निधी खर्च करून पुन्हा स्वबळावर रिंगणात उतरण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

बदलत्या राजकीय परिस्थितीत शहरात सत्ताधाऱ्यांविरोधात रोषाचे वातावरण आहे. मात्र त्याचा लाभ उठवण्यात विरोधक कितपत यशस्वी होतात, यावर पालिकेतील सत्तेचे भवितव्य ठरणार आहे.

भाजपविरोधात राज्यात सत्तेत आल्याने आत्मविश्‍वास दुणावलेली राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याच्या मानसिकतेत आहे, तर काँग्रेस आणि नव्याने शिवसेनेत दाखल झालेल्या कारभाऱ्यांनीही निवडणुकीसाठी जुळवाजुळव सुरू केली आहे. राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात महाविकास आघाडी झाली, तर भाजपपुढे आव्हान निर्माण होणार आहे. आघाडी नाही झाली, तर तिरंगी लढत होऊ शकते. मात्र आघाडी होणार की नाही, याबाबत नेमके चित्र स्पष्ट नसल्याने भाजप वगळता अन्य पक्षांतील इच्छुकांत गोंधळाचे वातावरण आहे.

चौकट

खासदारांच्या जुन्या शिलेदारांची मोर्चेबांधणी

एकेकाळी खासदार संजयकाका पाटील यांचे कट्टर समर्थक असणारे काही शिलेदार काँग्रेस आणि शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून भाजपला सत्तेतून पायउतार करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. बेरजेचे राजकारण करण्यासाठी भेटीगाठीचा धडाका सुरू झाला आहे.

चौकट

अंडरस्टॅन्डिंगच्या राजकारणाची धास्ती

नगरपालिका निवडणुकीत भाजपने कंबर कसली आहे. मात्र राष्ट्रवादीच्या गोटात अंडरस्टॅन्डिंगच्या राजकारणाची धास्ती आहे. भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून एकमेकांशी अंडरस्टॅन्डिग करून निवडणुका झाल्या, तर पालिकेची निवडणूक नुरा कुस्तीसारखी होईल, याची धास्ती अनेकांनी घेतली आहे.