शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

तासगाव कारखान्याचा ताबा अवसायकांकडे

By admin | Updated: May 21, 2014 17:39 IST

मुंबईतील बैठकीत निर्णय : हस्तांतरणासाठी १५ दिवसांची मुदत; राज्य बँकेच्या अधिकार्‍यांची कानउघाडणी

 सांगली : तासगाव कारखान्याच्या मालमत्तेचा ताबा पंधरा दिवसात अवसायक मंडळाच्या ताब्यात देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज, मंगळवारी मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्याबाबतचे पत्र सहकार सचिवांमार्फत राज्य बँकेला पाठविले जाणार आहे. कारखान्याच्या थकित कर्जाची परतफेड करण्यासाठी दोन पर्यायही देण्यात आले आहेत. तासगाव साखर कारखाना २०१४-१५ या एका वर्षासाठी भाडेतत्त्वावर देण्यासाठी राज्य बँकेने निविदा प्रसिद्ध केली आहे. मात्र ऊस खरेदी, वाहतूक, तोडणी व अन्य खर्च पाहता, एका वर्षासाठी कोणीच कारखाना भाडेतत्त्वावर घेणार नाही. राज्य बँकेने वर्षाचे ठोक भाडे अडीच कोटी व प्रति टन १०० रुपयांप्रमाणे किमान चार लाख गाळपाचे चार कोटी, असे साडेसहा कोटीचे भाडे निश्चित केले आहे. त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आज मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, गृहमंत्री आर. आर. पाटील, ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील, सहकार सचिव राजगोपाल देवरा, साखर आयुक्त विजय सिंघल, कारखान्याच्या अवसायक मंडळाचे अध्यक्ष वाय. व्ही. सुर्वे, सदस्य के. बी. तेलंग, सहाय्यक आर. डी. पाटील यांच्यासह राज्य बँकेचे उपव्यवस्थापक उपस्थित होते. बैठकीत सुरुवातीला कारखान्याच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. राज्य बँकेने प्रसिद्ध केलेल्या निविदेवर चर्चा झाली. बँकेने प्रसिद्ध केलेली निविदा अव्यवहार्य असून, दीर्घ मुदतीची प्रक्रिया राबवावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. हर्षवर्धन पाटील यांनी राज्य बँकेचे मुख्य व्यवस्थापक अग्रवाल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. अग्रवाल यांनी तासगाव कारखान्याच्या विक्रीबाबतचा निर्णय न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळेच एक वर्षाची निविदा काढली आहे, विक्रीच्या निर्णयावर कारखान्याचे भवितव्य अवलंबून आहे, तांत्रिक अडचण पाहता दीर्घ मुदतीने कारखाना चालविण्यास देणे अशक्य असल्याचे स्पष्ट केले. आर. डी. पाटील यांनी, कारखान्याच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध आहे. यंदाच्या हंगामात कारखाना बंद असल्याने सभासदांचे हाल झाले. पुढील हंगाम सुरू करण्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी गरज पडल्यास शासनाने आपल्या अधिकार्‍याचा वापर करून राज्य बँकेला आदेश द्यावेत, अशी मागणी केली. एन. डी. पाटील यांनी राज्य बँकेच्या अधिकार्‍यांना धारेवर धरले. गणपती संघाची मुदत ३० जून २०१३ ला संपली असताना राज्य बँकेने कारखान्याचा ताबा घेतला नाही. त्यामुळे गळीत हंगामाला उशीर झाला. यंदाही राज्य बँकेने जानेवारीपासून कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया राबविण्याची आवश्यकता होती. पण आता बँकेला जाग आली आहे, असे ते म्हणाले. सहकारमंत्री पाटील म्हणाले की, हा कारखाना १४ कोटीला विकला होता. कारखान्याच्या विक्रीपासून म्हणजे २०१० पासूनच्या व्याजाची रक्कम शासनामार्फत भरून मालमत्तेचा ताबा अवसायक मंडळाकडे देण्यात येईल. तसे पत्र सहकार सचिवामार्फत बँकेला पाठविले जाईल. सध्या कारखान्याची मालमत्ता पंधरा दिवसात अवसायक मंडळाच्या ताब्यात घ्यावी, असे आदेशही राज्य बँकेला दिले. (प्रतिनिधी)