शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

तासगावचा बेदाणा काश्मीर ते कन्याकुमारी

By admin | Updated: September 8, 2015 23:09 IST

बाजार समितीचा पुढाकार : गलाई बांधवांना देणार खरेदीचा परवाना

दत्ता पाटील - तासगाव  -देशाच्या बेदाणा व्यवसायातील ३५ टक्के हिस्सा तासगाव बाजार समितीचा आहे. बेदाणा विक्रीला चालना देण्यासाठी आता तासगाव बाजार समितीने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील गलाई बांधव देशाच्या कानाकोपऱ्यात विखुरलेले आहेत. या गलाई बांधवांनाच आता खरेदीचा परवाना देण्यात येणार आहे. त्याबाबत गलाई व्यावसायिकांशी बोलणी झाली आहे. लवकरच गलाई बांधवांच्या माध्यमातून काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत तासगावच्या बेदाण्याची विक्री सुरु होणार आहे.राज्यात सर्वात पहिल्यांदा तासगाव बाजार समितीने बेदाणा मार्केटची सुरुवात केली. सद्यस्थितीत तासगावात वर्षाला सुमारे ४७ हजार टन बेदाण्याची विक्री होत असून पाचशे कोटींची उलाढाल होते. तासगावची बेदाणा बाजारपेठ विश्वासार्ह आणि चांगल्या दरासाठी प्रसिध्द असल्यामुळे महाराष्ट्रातील सोलापूर, पंढरपूर, बार्शी, नाशिकसह कर्नाटकातूनही मोठ्या प्रमाणात बेदाण्याची आवक होत असते. एकूण आवकेपैकी कर्नाटकचा हिस्सा सुमारे ७६ टक्के इतका आहे. कर्नाटकातून आवक वाढल्यामुळे स्थानिक बेदाणा उत्पादकांना काही प्रमाणात दराचा फटका बसत आहे. आवक जास्त झाल्यानंतर परराज्यातून खरेदीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून दर कमी केला जातो. बेदाणा दराबाबतची परराज्यातील व्यापाऱ्यांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी, तसेच देशाच्या कानाकोपऱ्यात बेदाण्यासारखा सुकामेवा पोहोचवून अधिकाधिक विक्री व्हावी, यासाठी तासगाव बाजार समितीने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील गलाई बांधव व्यवसायाच्या निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यात स्थिरस्थावर झाले आहेत. एकाच घरातील अनेक लोक गलाई व्यवसायात आहेत. मात्र अलीकडच्या काळात काही कारणांनी मंदी आलेली आहे. त्यामुळे गलाई बांधवांना बेदाणा व्यवसायाची नवी संधी निर्माण करुन देण्यात येणार आहे. बेदाणा खरेदीचे परवाने देऊन गलाई व्यावसायिक राहत असलेल्या भागात, सुकामेवा असणाऱ्या बेदाण्याच्या विक्रीची संधी निर्माण करुन देण्यात येणार आहे. याबाबत गलाई व्यावसायिकांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून, लवकरच त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती अविनाश पाटील यांनी दिली. जास्तीत जास्त मालाचा उठाव व्हावा, बेदाणा उत्पादकांना चांगला दर मिळावा, यासाठी गलाई बांधवांना बेदाणा खरेदीचे परवाने देण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे. त्याबाबत गलाई असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी बोलणी झाली आहेत. येणाऱ्या काळात तासगावचा बेदाणा देशाच्या कानाकोपऱ्यात उपलब्ध होईल, अशी विक्री व्यवस्था केली जाणार आहे.- अविनाश पाटील, सभापती, तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीगलाई व्यवसायाच्या निमित्ताने जिल्ह्यातील अनेक लोक काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत स्थिरावले आहेत. व्यवसायातील तीव्र स्पर्धा आणि अन्य कारणांमुळे धंदा मंदावला आहे. त्यामुळे राज्याबाहेर स्थायिक झालेले गलाई बांधव नवीन व्यावसायाचे मार्ग अवलंबत आहेत. तासगाव बाजार समितीचा प्रस्ताव आमच्या दृष्टीने स्वागतार्ह आहे. हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे. - शंकरनाना पवार, सचिव, नॅशनल गोल्ड, सिल्व्हर, ज्वेलरी असोसिएशन.