शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

आताच्या जागा सोडून राष्ट्रवादीशी बोलणी - पृथ्वीराज पाटील : काँग्रेस इच्छुकांच्या उद्यापासून मुलाखती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 23:41 IST

राष्ट्रवादी काँग्रेसकडून ४३-३३ जागांचा प्रस्ताव आला आहे, तो आम्हाला मान्य नाही. काँग्रेसचे नगरसेवक दुसऱ्या पक्षात गेले असले तरी, या जागा पक्षाच्याच आहेत. तिथे उमेदवार महत्त्वाचा नाही.

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसकडून ४३-३३ जागांचा प्रस्ताव आला आहे, तो आम्हाला मान्य नाही. काँग्रेसचे नगरसेवक दुसऱ्या पक्षात गेले असले तरी, या जागा पक्षाच्याच आहेत. तिथे उमेदवार महत्त्वाचा नाही. सध्या काँग्रेसचे ४१, तर राष्ट्रवादीचे २४ नगरसेवक आहेत. या जागा कायम ठेवून उर्वरित जागांवर चर्चा व्हावी, अशी भूमिका काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत मांडली. दरम्यान, शनिवार व रविवारी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आहेत.

पाटील म्हणाले, महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे. सर्व २० प्रभागात पक्षाकडे मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवार आहेत. २२५ अर्जांची विक्री झाली असून १८० जणांनी अर्ज दाखल केले आहेत. शुक्रवारी दुपारी दोन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. त्यामुळे आणखी १०० जणांचे अर्ज दाखल होतील. ज्यांनी पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे. शनिवारी ३० रोजी सांगलीतील कच्छी जैन भवन येथे सांगलीतील दहा व कुपवाडमधील प्रभाग १ व ८ अशा बारा प्रभागातील उमेदवारांच्या मुलाखती होतील, तर रविवारी मिरजेच्या पटवर्धन हॉलमध्ये मिरजेतील सहा व कुपवाडमधील प्रभाग २ मधील इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत.

या मुलाखतींसाठी प्रदेश काँग्रेसने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सतेज पाटील, अभय छाजेड, प्रकाश सातपुते यांची कोअर कमिटी नियुक्त केली आहे. या कमिटीत आपलाही समावेश आहे. या कमिटीसह जिल्हाध्यक्ष आ. मोहनशेठ कदम, आ. विश्वजित कदम, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या जयश्रीताई पाटील उपस्थित राहणार आहेत.

आघाडीबाबत ते म्हणाले, काँग्रेसमधून काही नगरसेवक बाहेर पडले. त्यामुळे आमच्या जागा ३१ झाल्या, तर त्यांच्या वाढून २७ झाल्या आहेत. हा बेस धरून उर्वरित २० जागांबाबत चर्चा करण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीने दिला. पण तो आम्ही अमान्य केला आहे. आमच्यातील काही लोक पक्ष सोडून गेले, याचा अर्थ आमचा त्या जागांवरचा हक्क जात नाही. पक्षाच्या चिन्हावर तेथे निवडणूक झाल्याने या जागा पक्षाच्या आहेत. त्यामुळे आमच्याकडे ४१, तर त्यांच्याकडे १९ जागा चिन्हावर लढलेल्या आहेत. त्यांना काही अपक्षांनी पाठिंबा दिला. त्यामुळे त्यांची संख्या २४ वर गेली. हा बेस धरून त्यांनी चर्चा करावी, असा नवीन प्रस्ताव काँग्रेसने त्यांना दिला आहे. यावर आता त्यांच्याकडून उत्तर आल्यावर चर्चा होईल.ताणाताणी नको : पाटीलपृथ्वीराज पाटील म्हणाले, देशात व राज्यात भाजपविरोधात सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. महापालिकेतही ही आघाडी व्हावी यासाठी काँग्रेस सकारात्मक आहे. राष्ट्रवादीने यासाठी योग्य प्रस्ताव द्यावा. आम्ही त्यावर निश्चित विचार करू. आघाडीबाबत चर्चेतून मार्ग निघेल. दोन्हीकडून खूप ताणाताणी होऊ नये, असेही ते म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणElectionनिवडणूक