शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
4
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
5
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
6
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
7
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
8
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
9
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
10
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
11
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
12
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
13
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
14
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
15
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
16
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
17
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
18
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
19
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
20
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक

कुंडलमधील ओढ्याने घेतला मोकळा श्वास!

By admin | Updated: June 9, 2016 01:15 IST

तरुणांचा पुढाकार : पंच्याहत्तर वर्षांच्या ऐतिहासिक बंधाऱ्याचेही केले पुनरुज्जीवन - गुड न्यूज

अशोक डोंबाळे -- सांगली --महिन्याभरापूर्वी डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी राजस्थान येथील अलवर जिल्ह्यातील तरुण जलविद्यापीठ येथे घेतलेल्या कार्यशाळेत कुंडल (ता. पलूस) येथील अ‍ॅड. दीपक लाड यांना सहभागी होण्याची संधी मिळाली. तेथून परतल्यानंतर त्यांनी कृतीतून ‘पाणी आणि पर्यावरण’ विषयावर त्यांनी कामाचा धडाका लावला आहे. कुंडल गावातील पंच्याहत्तर वर्षापूर्वीचा जुना कोल्हापूर पध्दतीचा बंधारा आणि धारेचा गावओढा पाणवेली, प्लॅस्टिक कचऱ्याने मुजला होता. याचे काम हाती घेतले आणि लोकसहभागातून या ओढ्याने मोकळा श्वास घेतला.कुंडलच्या ओढ्याची धारेचा ओढा अशी ओळख आहे. देवराष्ट्रे, कुंभारगाव येथील डोंगराचे दहा किलोमीटरपासून पाणी येत आहे. गावाचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी औंध संस्थान आणि किर्लोस्कर कंपनी यांनी एकत्र येऊन कुंडल येथे १९४० मध्ये कोल्हापूर पध्दतीचा बंधारा बांधला होता. पावसाळा संपल्यानंतर लाकडी फळ्यांच्या माध्यमातून पाणी साठविले जात होते. कालांतराने या ओढ्याकडे आणि बंधाऱ्याकडेही कुणाचे लक्ष गेले नाही. पंच्याहत्तर वर्षात हा बंधाराही प्रदूषणाच्या विळख्यात दिसेनासा झाला. पाणवनस्पती, त्यात गावाच्या प्लॅस्टिक कचऱ्याची भर पडल्यामुळे ओढ्याचे सौंदर्यही बकाल झाले होते. डॉ. राणा यांच्या कार्यशाळेतून परतल्यानंतर कुंडल येथील रणसंग्राम सोशल फौंडेशनच्या अ‍ॅड. लाड या तरूणाचे गावाच्या ओढ्याकडे लक्ष गेले आणि त्यांनी २५ मेरोजी स्वच्छतेचे काम हाती घेतले.गेल्या पंधरा दिवसांत अ‍ॅड. दीपक लाड यांनी गावातील तरुणांना एकत्र करून ओढा व बंधाऱ्याची स्वच्छता हाती घेतली आहे. सुमारे दोन किलोमीटर ओढ्याची स्वच्छता करून जुन्या ऐतिहासिक बंधाऱ्याचेही पुनरुज्जीवनाचे काम हाती घेतले आहे. या सर्व कामास आतापर्यंत केवळ पन्नास हजार रुपये खर्च आला आहे. यासाठी लोकशासन आंदोलनच्या अ‍ॅड. मनीषा रोटे यांचे पाठबळ मिळाले आहे. तरुणांनी जलसंधारणाचे महत्त्वपूर्ण काम हाती घेतल्यामुळे रोटे यांनी जुन्या बंधाऱ्याच्या पुनरुज्जीवनासाठी आणि लागणाऱ्या लाकडी फळ्यांसाठी २५ हजारांची मदत केली. या मदतीबरोबरच अर्जुन वडर, अ‍ॅड. अनिल लाड, विजय राजमाने, विश्वजित लाड, शाहीद मुल्ला, सौरभ हेगडे, मुकुंद खारगे, अनिल चव्हाण, श्रीकांत चव्हाण, राहुल देवकाते, हनिफ शेख, झुंझार शिंदे, मिलिंद रायते, ऋषिकेश मोहिते, अजित साळुंखे, निखिल सोळवंडे, डॉ. सोमनाथ सोळवंडे, वर्षा सनगर, मंजुश्री सनगर या तरुणांनी श्रमदान आणि खिशातील पैसे घालून काम हाती घेतले आहे. या तरुणांच्या कार्यास गावातूनही प्रतिसाद मिळण्याची गरज असून, कुंडल हे क्रांतिअग्रणींचे गाव असल्यामुळे तो निश्चित मिळेल, अशी अपेक्षा आहे. बंधाऱ्याला फळ्या बसविल्यामुळे पाण्याची बचत झाली.