शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

Sangli: तासगावच्या गणपती पंचायतन ट्रस्टीवर कारवाई करा

By अशोक डोंबाळे | Updated: May 14, 2024 14:33 IST

किसान सभेची जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे मागणी : कराराने जमिनी देण्याचा लिलाव त्वरित रद्द करा

सांगली : तासगाव येथील गणपती पंचायतन ट्रस्टची हजारो एकर जमीन जिल्ह्याच्या विविध भागांत आहे. या जमिनींचा ट्रस्टीने ९९ वर्षांच्या कराराने लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांवर भूमिहीन व्हावे लागणार आहे. म्हणून ट्रस्टीचा जमीन लिलाव प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष उमेश देशमुख यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.किसान सभेतर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले की, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्व संस्थान विलीन झाली; पण खासगी मालकी आहे तशीच राहिली. त्यामुळे जिल्ह्यातील संस्थानिकांनी त्यांच्याकडे असणारी जमीन ट्रस्ट ॲक्टखाली नोंद करून शेतकऱ्यांना खंडाने दिली. सध्या या ट्रस्टींनी शेतकऱ्यांकडील जमिनीचा ९९ वर्षांच्या कराराने लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढे सात-बारा उताऱ्यावर देवस्थान इनाम वर्ग तीन अशी नोंद झाली. आजही तशी नोंद आहे. खंडकऱ्या शेतकऱ्यांची नावे संरक्षित कूळ म्हणून इतर हक्कात होती. पाठीमागील दोन वर्षांपासून सदर नावे कमी केली आहेत. उताऱ्यावर कोणत्याही जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर नाहीत. शेतकऱ्यांची नावे कमी झाल्याचा फायदा ट्रस्टींनी घेतला आहे. तसेच या जमिनीचा ९९ वर्षांच्या कराराने लिलाव करण्याचे जाहीर केले आहे. असे झाले तर वर्षानुवर्षे जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्यावर अन्याय होणार आहे. अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. म्हणून आम्ही मागणी करतो की सदर जमिनीचा लिलाव जाहीर करणाऱ्या ट्रस्टीवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. तसेच सध्याची लिलाव प्रक्रिया रद्द करून कसणाऱ्या शेतकऱ्यांची नावे पूर्ववत सात-बारा उताऱ्यावर नोंद झाली पाहिजे, या मागणीचे निवदेन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांना दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष रमेश पाटील, सचिव गुलाब मुलाणी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

शेतकरी भूमिहीन होतील : उमेश देशमुखशेतकऱ्यांकडे संस्थानच्या नावे असणाऱ्या जमिनीचे लिलाव करून ९९ वर्षांने दिले तर जिल्ह्यातील अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. म्हणून शासनाने यामध्ये लक्ष घालून बेकायदेशीर लिलाव रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी उमेश देशमुख यांनी केली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीcollectorजिल्हाधिकारी