शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

Sangli: तासगावच्या गणपती पंचायतन ट्रस्टीवर कारवाई करा

By अशोक डोंबाळे | Updated: May 14, 2024 14:33 IST

किसान सभेची जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे मागणी : कराराने जमिनी देण्याचा लिलाव त्वरित रद्द करा

सांगली : तासगाव येथील गणपती पंचायतन ट्रस्टची हजारो एकर जमीन जिल्ह्याच्या विविध भागांत आहे. या जमिनींचा ट्रस्टीने ९९ वर्षांच्या कराराने लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांवर भूमिहीन व्हावे लागणार आहे. म्हणून ट्रस्टीचा जमीन लिलाव प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष उमेश देशमुख यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.किसान सभेतर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले की, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्व संस्थान विलीन झाली; पण खासगी मालकी आहे तशीच राहिली. त्यामुळे जिल्ह्यातील संस्थानिकांनी त्यांच्याकडे असणारी जमीन ट्रस्ट ॲक्टखाली नोंद करून शेतकऱ्यांना खंडाने दिली. सध्या या ट्रस्टींनी शेतकऱ्यांकडील जमिनीचा ९९ वर्षांच्या कराराने लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढे सात-बारा उताऱ्यावर देवस्थान इनाम वर्ग तीन अशी नोंद झाली. आजही तशी नोंद आहे. खंडकऱ्या शेतकऱ्यांची नावे संरक्षित कूळ म्हणून इतर हक्कात होती. पाठीमागील दोन वर्षांपासून सदर नावे कमी केली आहेत. उताऱ्यावर कोणत्याही जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर नाहीत. शेतकऱ्यांची नावे कमी झाल्याचा फायदा ट्रस्टींनी घेतला आहे. तसेच या जमिनीचा ९९ वर्षांच्या कराराने लिलाव करण्याचे जाहीर केले आहे. असे झाले तर वर्षानुवर्षे जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्यावर अन्याय होणार आहे. अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. म्हणून आम्ही मागणी करतो की सदर जमिनीचा लिलाव जाहीर करणाऱ्या ट्रस्टीवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. तसेच सध्याची लिलाव प्रक्रिया रद्द करून कसणाऱ्या शेतकऱ्यांची नावे पूर्ववत सात-बारा उताऱ्यावर नोंद झाली पाहिजे, या मागणीचे निवदेन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांना दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष रमेश पाटील, सचिव गुलाब मुलाणी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

शेतकरी भूमिहीन होतील : उमेश देशमुखशेतकऱ्यांकडे संस्थानच्या नावे असणाऱ्या जमिनीचे लिलाव करून ९९ वर्षांने दिले तर जिल्ह्यातील अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. म्हणून शासनाने यामध्ये लक्ष घालून बेकायदेशीर लिलाव रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी उमेश देशमुख यांनी केली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीcollectorजिल्हाधिकारी