शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
4
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
5
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
6
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
7
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
8
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
9
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
10
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
11
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
12
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
13
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
14
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
15
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
16
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
17
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
18
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
19
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
20
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड

कोयना, चांदोलीमध्ये वाघांसाठी १४ हेक्टरचे संरक्षित क्षेत्र, ताडोबाचे वाघ आणणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 17:46 IST

: कोयना व चांदोली अभयारण्यात वाघांसाठी १४ हेक्टरचे संरक्षित क्षेत्र तयार केले जात आहे. खाद्य म्हणून सागरेश्वर आणि कात्रज येथून सांबर व चितळ आणून सोडली जातील. हरीणांची पैदास वाढल्यानंतर ताडोबामधून वाघ आणून सोडले जाणार आहेत.

ठळक मुद्देकोयना, चांदोलीमध्ये वाघांसाठी १४ हेक्टरचे संरक्षित क्षेत्र, ताडोबाचे वाघ आणणार, पाहुण्यांना चांदोली, कोयना मानवणार का?

संतोष भिसेसांगली : कोयना व चांदोली अभयारण्यात वाघांसाठी १४ हेक्टरचे संरक्षित क्षेत्र तयार केले जात आहे. खाद्य म्हणून सागरेश्वर आणि कात्रज येथून सांबर व चितळ आणून सोडली जातील. हरीणांची पैदास वाढल्यानंतर ताडोबामधून वाघ आणून सोडले जाणार आहेत.वन्यजीव संवर्धन आराखड्यानुसार राज्यात वाघांचे अधिवास क्षेत्र वाढविण्यात येणार आहे. सध्या ताडोबा वनक्षेत्रात क्षमतेपेक्षा जास्त वाघ नोंदवले गेलेत. चंद्रपूर, गडचिरोलीमध्येही संख्या वाढली आहे. जंगलक्षेत्रातील वाघ मानवी वस्तीत शिरल्याने रहिवासी त्रस्त आहेत, शिवाय जिवितहानीही होत आहे. त्यामुळे वाघांचा समतोल राखण्यो नियोजन आहे. अतिरिक्त वाघांचे पुनर्वसन प्रस्तावित आहे.पश्चिम महाराष्ट्रात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यापूर्वीच घोषित झाला आहे. कोयना आणि चांदोलीचे जंगल त्याअंतर्गत येते. सध्या येथे बिबटे भरपूर आहेत, वाघ मात्र एखादाच आहे. वाघ वाढवण्यासाठी काही वर्षांपूर्वी कात्रजमधून ४० हून अधिक हरणे आणली होती. झोळंबी क्षेत्रात डीअर पार्क तयार केला होता. काही दिवसांनी हरणे जंगलक्षेत्रात सोडली, पण पैदास वाढली की नाही हे मात्र निश्चित नाही. सोलापूरच्या प्राणीसंग्रहालयातून जास्त झालेले काळवीट आणण्याचे नियोजन प्राधिकरणाच्या नकारामुळे प्रत्यक्षात आले नाही.पाहुण्यांना चांदोली, कोयना मानवणार का?डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेकडून वाघांच्या पुनर्वसनाचा अभ्यास चार वर्षांपासून सुरु आहे. वाघांचा वावर, सुरक्षितता, खाद्याची उपलब्धता, भविष्यात पैदास होण्यासाठी अनुकुलता, मानवी वस्तीपासून अंतर, शिकारीचे धोके या सर्व बाबींचा अभ्यास सुरु आहे. ताडोबाच्या हवामानातील वाघांना चांदोली, कोयना मानवेल काय? याचाही अदमास घेतला जात आहे. अभ्यास अंतिम टप्प्यात असून संस्थेने हिरवा दाखवल्यानंतर नवे पाहुणे चांदोली, कोयनेत रुजू होतील. पर्यटकांना टायगर सफारीचा आनंद घेता येईल.चांदोलीत स्थानिक वाघ नाहीचांदोलीत एखादाच व कोयनेत तीन ते चार वाघ आढळले आहेत, पण ते स्थानिक रहिवासी नाहीत. चांदोली, कोयना, दाजीपूर-राधानगरी, तिलारी हा त्यांचा कॅरीडॉर आहे. ताडोबातून आणलेले वाघही या कॅरीडॉरमध्ये फिरल्यास जास्त संख्येमुळे मानवी वस्त्यांत शिरण्याची शक्यता वन्यजीव प्रेमींनी व्यक्त केली. अर्थात ३१७ चौकिमीच्या चांदोलीमध्ये पुरेसे खाद्य मिळाल्यास ते अन्यत्र भटकणार नाहीत असाही अंदाज आहे.

टॅग्स :TigerवाघSangliसांगली