शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

स्वराज्याच्या शपथेचा साक्षीदार ‘रायरेश्वर’ विजनवासात

By admin | Updated: March 1, 2017 23:47 IST

दुर्लक्षाचे ग्रहण : पावसाळ्यात सूर्यदर्शनच नाही; उन्हाळ्यात शिवकालीन झऱ्याचा पिण्याच्या पाण्यासाठी आधार

वाई : परकीय गुलामगिरीतून रयतेला मुक्त करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ वयाच्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना घेऊन ३७० वर्षांपूर्वी ‘रायरेश्वर’ किल्ल्यावर रायरेश्वराच्या मंदिरात घेतली. या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार असलेल्या किल्ल्यावर पुरातन मंदिरांची झालेली दुरवस्था, गडावर जाण्यासाठी नसलेला रस्ता, ग्रामस्थ व पर्यटकांना होणारी पिण्याच्या पाण्याची टंचाई, शैक्षणिक व आरोग्याच्या असुविधा दूर करण्याचे मोठे आव्हान लोकप्रतिनिधी व शासनापुढे उभे आहे. या समस्या व अडचणी दूर झाल्यास शिवकालीन इतिहासाला उजाळा मिळून पर्यटकांची संख्या वाढेल व स्थानिकांना रोजगार मिळेल, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.गडावरील रायरेश्वर मंदिराजवळ सर्वोच्च माळ्याची टेकडी आहे. येथून निसर्गाचे विलोभनीय विहंगम दृश दिसते. उत्तरेला तुंग तिकोना लोहगड व विसापूर डोंगर दिसतात. तसेच प्रतापगड, केंजळगड, कमळगड, विचित्रगड व मकरंदगडही दिसतात. गडावर सात रंगाची माती आढळते. पश्चिमेला नाखिंदा कडा आहे. गडावर जननी देवीचे मंदिरही प्रसिद्ध आहे. रायरेश्वर गडावर जंगम घराण्याची ४५ घरे असून, सुमारे साडेपाचशे लोकवस्ती आहे. पावसाळ्यात चार महिने सूर्याचे दर्शन होत नाही. येथे पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणात होते. येथील नागरिकांची शेती व जनावरे उत्पन्नांची साधने असून, अतिपावसाने जनावरेही दगावतात. त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसतो. केवळ थंड हवामानाने गव्हाचे उत्पन्न होते. जादा तर नागरिक युवक उदरनिर्वाहासाठी कामाधंद्यानिमित्त बाहेरगावी शहरात जातात. मुलांना समाज मंदिरात बसून शिक्षण घ्यावे लागते. गडावर जाण्या-येण्यासाठी रस्ता नसल्याने माध्यमिक शिक्षणासाठी चार-पाच तास पायपीट करत वाई किंवा भोर येथे जावे लागते. मंदिराजवळ गायमुखाचा झरा हाच पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत आहे. शासनाने शिडीचा कडा यापासून एक किलोमीटरचा रस्ता तयार केला तर किल्ल्यावर सहज जाता येईल त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढून स्थानिकांना रोजगार मिळेल. (प्रतिनिधी)आजारी व्यक्तीवर उपचार करणेही अवघडपावसाळ्यात चार महिने सूर्यदर्शन होत नाही. मुसळधार पाऊस, वादळी वाटा त्यामुळे गडावरून खाली येता येत नाही. त्यामुळे चार महिने पुरेल एवढा अन्नधान्याचा साठा करावा लागतो. रस्ता नसल्याने एखादा आजारी पडल्यास त्याला उपचारासाठी नेताना खूप हाल होतात. ४शासनाने कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची योजना सुरू करावी, रायरेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करावा, गडावर जाण्यासाठी रस्ता करावा, पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, अशा स्वरूपाच्या मागण्या स्थानिकांकडून होत आहेत.उन्हाळ्यात ग्रामस्थांना शिवकालीन झऱ्यातून पाणी आणावे लागते. यासाठी दोन किलोमीटर पायपीट करावी लागते. पर्यटकांचीही गैरसोय होते.गडावर जाण्यासाठी रस्ता नसल्याने अनेक पर्यटक, वृद्ध यांची इच्छा असूनही जाता येत नाही. रस्ता झाल्यास पर्यटकांची संख्या वाढेल व स्थानिकांना रोजगार मिळेल.