शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

स्वराज्याच्या शपथेचा साक्षीदार ‘रायरेश्वर’ विजनवासात

By admin | Updated: March 1, 2017 23:47 IST

दुर्लक्षाचे ग्रहण : पावसाळ्यात सूर्यदर्शनच नाही; उन्हाळ्यात शिवकालीन झऱ्याचा पिण्याच्या पाण्यासाठी आधार

वाई : परकीय गुलामगिरीतून रयतेला मुक्त करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ वयाच्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना घेऊन ३७० वर्षांपूर्वी ‘रायरेश्वर’ किल्ल्यावर रायरेश्वराच्या मंदिरात घेतली. या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार असलेल्या किल्ल्यावर पुरातन मंदिरांची झालेली दुरवस्था, गडावर जाण्यासाठी नसलेला रस्ता, ग्रामस्थ व पर्यटकांना होणारी पिण्याच्या पाण्याची टंचाई, शैक्षणिक व आरोग्याच्या असुविधा दूर करण्याचे मोठे आव्हान लोकप्रतिनिधी व शासनापुढे उभे आहे. या समस्या व अडचणी दूर झाल्यास शिवकालीन इतिहासाला उजाळा मिळून पर्यटकांची संख्या वाढेल व स्थानिकांना रोजगार मिळेल, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.गडावरील रायरेश्वर मंदिराजवळ सर्वोच्च माळ्याची टेकडी आहे. येथून निसर्गाचे विलोभनीय विहंगम दृश दिसते. उत्तरेला तुंग तिकोना लोहगड व विसापूर डोंगर दिसतात. तसेच प्रतापगड, केंजळगड, कमळगड, विचित्रगड व मकरंदगडही दिसतात. गडावर सात रंगाची माती आढळते. पश्चिमेला नाखिंदा कडा आहे. गडावर जननी देवीचे मंदिरही प्रसिद्ध आहे. रायरेश्वर गडावर जंगम घराण्याची ४५ घरे असून, सुमारे साडेपाचशे लोकवस्ती आहे. पावसाळ्यात चार महिने सूर्याचे दर्शन होत नाही. येथे पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणात होते. येथील नागरिकांची शेती व जनावरे उत्पन्नांची साधने असून, अतिपावसाने जनावरेही दगावतात. त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसतो. केवळ थंड हवामानाने गव्हाचे उत्पन्न होते. जादा तर नागरिक युवक उदरनिर्वाहासाठी कामाधंद्यानिमित्त बाहेरगावी शहरात जातात. मुलांना समाज मंदिरात बसून शिक्षण घ्यावे लागते. गडावर जाण्या-येण्यासाठी रस्ता नसल्याने माध्यमिक शिक्षणासाठी चार-पाच तास पायपीट करत वाई किंवा भोर येथे जावे लागते. मंदिराजवळ गायमुखाचा झरा हाच पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत आहे. शासनाने शिडीचा कडा यापासून एक किलोमीटरचा रस्ता तयार केला तर किल्ल्यावर सहज जाता येईल त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढून स्थानिकांना रोजगार मिळेल. (प्रतिनिधी)आजारी व्यक्तीवर उपचार करणेही अवघडपावसाळ्यात चार महिने सूर्यदर्शन होत नाही. मुसळधार पाऊस, वादळी वाटा त्यामुळे गडावरून खाली येता येत नाही. त्यामुळे चार महिने पुरेल एवढा अन्नधान्याचा साठा करावा लागतो. रस्ता नसल्याने एखादा आजारी पडल्यास त्याला उपचारासाठी नेताना खूप हाल होतात. ४शासनाने कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची योजना सुरू करावी, रायरेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करावा, गडावर जाण्यासाठी रस्ता करावा, पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, अशा स्वरूपाच्या मागण्या स्थानिकांकडून होत आहेत.उन्हाळ्यात ग्रामस्थांना शिवकालीन झऱ्यातून पाणी आणावे लागते. यासाठी दोन किलोमीटर पायपीट करावी लागते. पर्यटकांचीही गैरसोय होते.गडावर जाण्यासाठी रस्ता नसल्याने अनेक पर्यटक, वृद्ध यांची इच्छा असूनही जाता येत नाही. रस्ता झाल्यास पर्यटकांची संख्या वाढेल व स्थानिकांना रोजगार मिळेल.