शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

स्वराज्याच्या शपथेचा साक्षीदार ‘रायरेश्वर’ विजनवासात

By admin | Updated: March 1, 2017 23:47 IST

दुर्लक्षाचे ग्रहण : पावसाळ्यात सूर्यदर्शनच नाही; उन्हाळ्यात शिवकालीन झऱ्याचा पिण्याच्या पाण्यासाठी आधार

वाई : परकीय गुलामगिरीतून रयतेला मुक्त करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ वयाच्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना घेऊन ३७० वर्षांपूर्वी ‘रायरेश्वर’ किल्ल्यावर रायरेश्वराच्या मंदिरात घेतली. या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार असलेल्या किल्ल्यावर पुरातन मंदिरांची झालेली दुरवस्था, गडावर जाण्यासाठी नसलेला रस्ता, ग्रामस्थ व पर्यटकांना होणारी पिण्याच्या पाण्याची टंचाई, शैक्षणिक व आरोग्याच्या असुविधा दूर करण्याचे मोठे आव्हान लोकप्रतिनिधी व शासनापुढे उभे आहे. या समस्या व अडचणी दूर झाल्यास शिवकालीन इतिहासाला उजाळा मिळून पर्यटकांची संख्या वाढेल व स्थानिकांना रोजगार मिळेल, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.गडावरील रायरेश्वर मंदिराजवळ सर्वोच्च माळ्याची टेकडी आहे. येथून निसर्गाचे विलोभनीय विहंगम दृश दिसते. उत्तरेला तुंग तिकोना लोहगड व विसापूर डोंगर दिसतात. तसेच प्रतापगड, केंजळगड, कमळगड, विचित्रगड व मकरंदगडही दिसतात. गडावर सात रंगाची माती आढळते. पश्चिमेला नाखिंदा कडा आहे. गडावर जननी देवीचे मंदिरही प्रसिद्ध आहे. रायरेश्वर गडावर जंगम घराण्याची ४५ घरे असून, सुमारे साडेपाचशे लोकवस्ती आहे. पावसाळ्यात चार महिने सूर्याचे दर्शन होत नाही. येथे पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणात होते. येथील नागरिकांची शेती व जनावरे उत्पन्नांची साधने असून, अतिपावसाने जनावरेही दगावतात. त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसतो. केवळ थंड हवामानाने गव्हाचे उत्पन्न होते. जादा तर नागरिक युवक उदरनिर्वाहासाठी कामाधंद्यानिमित्त बाहेरगावी शहरात जातात. मुलांना समाज मंदिरात बसून शिक्षण घ्यावे लागते. गडावर जाण्या-येण्यासाठी रस्ता नसल्याने माध्यमिक शिक्षणासाठी चार-पाच तास पायपीट करत वाई किंवा भोर येथे जावे लागते. मंदिराजवळ गायमुखाचा झरा हाच पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत आहे. शासनाने शिडीचा कडा यापासून एक किलोमीटरचा रस्ता तयार केला तर किल्ल्यावर सहज जाता येईल त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढून स्थानिकांना रोजगार मिळेल. (प्रतिनिधी)आजारी व्यक्तीवर उपचार करणेही अवघडपावसाळ्यात चार महिने सूर्यदर्शन होत नाही. मुसळधार पाऊस, वादळी वाटा त्यामुळे गडावरून खाली येता येत नाही. त्यामुळे चार महिने पुरेल एवढा अन्नधान्याचा साठा करावा लागतो. रस्ता नसल्याने एखादा आजारी पडल्यास त्याला उपचारासाठी नेताना खूप हाल होतात. ४शासनाने कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची योजना सुरू करावी, रायरेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करावा, गडावर जाण्यासाठी रस्ता करावा, पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, अशा स्वरूपाच्या मागण्या स्थानिकांकडून होत आहेत.उन्हाळ्यात ग्रामस्थांना शिवकालीन झऱ्यातून पाणी आणावे लागते. यासाठी दोन किलोमीटर पायपीट करावी लागते. पर्यटकांचीही गैरसोय होते.गडावर जाण्यासाठी रस्ता नसल्याने अनेक पर्यटक, वृद्ध यांची इच्छा असूनही जाता येत नाही. रस्ता झाल्यास पर्यटकांची संख्या वाढेल व स्थानिकांना रोजगार मिळेल.