शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

‘स्वाभिमानी’ने मुख्यमंत्र्यांना दाखविले काळे झेंडे!

By admin | Updated: May 29, 2017 23:09 IST

‘स्वाभिमानी’ने मुख्यमंत्र्यांना दाखविले काळे झेंडे!

लोकमत न्यूज नेटवर्ककऱ्हाड : शेतकऱ्यांना शासनाकडून कर्जमुक्ती दिली जात नसल्याने त्यांच्यावर आत्महत्येची वेळ येत आहे. कर्जमुक्तीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे खासदार राजू शेट्टी यांनी ‘आत्मक्लेश’ यात्रा काढली आहे. मात्र, अद्यापपर्यंत सरकारचा एकही प्रतिनिधी आत्मक्लेश यात्रेत राजू शेट्टी यांना भेटायला गेलेला नाही. तसेच मुख्यमंत्र्यांकडूनही कर्जमुक्तीबाबत निर्णय घेतले जात नाही. याचा निषेध करीत मलकापूर येथे कृष्णा हॉस्पीटलसमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कऱ्हाड उत्तरचे तालुकाध्यक्ष सचिन नलवडे, प्रदीप मोहिते, योगेश झांबरे, आदींसह कार्यकर्त्यांचा समावेश होता.मलकापूर येथे सोमवारी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील येणार असल्याने त्यांचा निषेध करण्यासाठी स्वाभिमानीचे कार्यकर्ते अगोदरच तयारीत होते. त्यांनी विमानतळ व कृष्णा हॉस्पीटल येथे काळे झेंडे दाखविण्यासाठी फिल्डिंग लावली होती. दुपारी दीड वाजता मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा मलकापूर येथील कृष्णा हॉस्पीटल परिसरात आला असता यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांच्या ताफ्यासमोर येऊन काळे झेंडे दाखविले. यावेळी ‘भाजप सरकारचा निषेध असो, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे. ‘आत्मक्लेश’ यात्रेची दखल न घेणाऱ्या सरकारचा धिक्कार’ अशा घोषणा देण्यात आल्या. या निदर्शनामुळे बंदोबस्तासाठी असलेले पोलिस व अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र, काही कळण्याच्या अगोदरच आंदोलकांनी आपला हेतू साध्य करून घेतला होता. पोलिस प्रमुखांनी बंदोबस्तासाठी असणाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली असल्याचे समजते.कार्यकर्त्यांचा गनिमीकावा यशस्वी !मलकापूर येथे भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकारमंत्री चंद्रकांत पाटील हे येणार असल्याने ठिकठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या गाड्यांचा ताफा मेळाव्याकडे निघाला असता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ‘गनिमी काव्या’ प्रमाणे काळे झेंडे दाखवित निषेध केला. कडक पोलिस बंदोबस्तातही कार्यकर्त्यांनी आपले निषेध आंदोलन यशस्वी करून दाखविले. दिवसभर या आंदोलनाचीच चर्चा होती.