शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

'स्वाभिमानी'कडून सांगली-पेठ रस्त्याच्या खड्ड्यात वृक्षारोपण, ..तर अधिकाऱ्यांना कोंडून घालण्याचा दिला इशारा

By अशोक डोंबाळे | Updated: November 5, 2022 18:17 IST

रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता अशी अवस्था

सांगली : सांगली ते पेठ रस्ता आता रहदारीसाठी राहिलेला नाही. रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे शनिवारी रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा निषेध केला. रस्ता तत्काळ झाला नाही तर अधिकाऱ्यांना कोंडून घालू, असा इशारा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी भागवत जाधव, जगन्नाथ भोसले, अरुण कवठेकर, तानाजी साठे, भरत पाटील, प्रभाकर पाटील, राम पाटील, काशिनाथ निंबाळकर, अभय मंजुगडे, आदींसह शेतकरी उपस्थित होते.महेश खराडे म्हणाले की, सांगली ते पेठ रस्ता दर्जेदार करण्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांची मागणी आहे. सांगली शहरातील नागरिकांनी या रस्त्यासाठी अनेकवेळा आंदोलनेही केली आहेत. तरीही या रस्त्याकडे अधिकारी आणि लोकप्रतिनिधीही लक्ष देत नसल्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांचे मोठे हाल सुरू आहे. खराब रस्त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अनेक महिलांची रस्त्यातच प्रसूती झाली आहे. रस्त्याचे काम उत्कृष्ट होत नाही, केवळ डागडुजी केली जाते. लोकांचा वेळ, पेट्रोल, डिझेल मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

अधिकाऱ्यांनी वाद थांबवून रस्त्याचे काम करावे : महेश खराडेसांगली ते पेठ रस्ता राज्य शासनाकडे की केंद्राच्या हायवे प्राधिकरणाकडे आहे या वादात रस्त्याचे काम रखडले आहे. अधिकाऱ्यांच्या या वादात सामान्य नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. याकडे गांभीर्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. यापुढे या रस्त्यावर अपघातात कुणाचा जीव गेला तर त्याला जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दोषी धरून त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहे, असा इशाराही महेश खराडे यांनी दिला आहे

टॅग्स :Sangliसांगलीroad transportरस्ते वाहतूक