शहरं
Join us  
Trending Stories
1
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
2
सौदी अरेबियातील बस अपघातात ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख, माहिती गोळा करण्याचे दिले निर्देश
3
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
4
"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?
5
Rohini Acharya : "कुटुंबात एक विषारी माणूस..."; लालू प्रसाद यादवांची लेक रोहिणी आचार्य यांची आणखी एक पोस्ट
6
"मी हे मान्यच करू शकत नाही..."; टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराने चांगलंच सुनावलं
7
५ वर्षांत ५३०० टक्के रिटर्न; आता 'हा' शेअर पुन्हा सुस्साट! सातत्यानं लागतंय अपर सर्किट, कारण काय?
8
भारताचा अमेरिकेसोबत ऐतिहासिक LPG करार; घरगुती गॅस सिलिंडरची किंमत कमी होणार?
9
Protest: आधी ‘शेल्टर’ची व्यवस्था करा, नंतरच श्वानांना हात लावा; प्राणीमित्र संघटना रस्त्यावर!
10
गौतम अदानी आणताहेत देशातील सर्वात मोठा राइट्स इश्यू; ७१६ रुपये स्वस्त मिळतोय शेअर, पाहा डिटेल्स
11
खळबळजनक! थारसाठी पत्नीची हत्या, हुंड्यासाठी पती झाला हैवान; भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
12
SIR च्या कामाचा भार असह्य; वरिष्ठाच्या धमक्यांना कंटाळून शिक्षकाची रेल्वेखाली उडी, एकाच दिवशी दोन कर्मचाऱ्यांचे टोकाचे पाऊल
13
Ritual: पानाच्या टपरीवर का असते शंकराची पितळी मूर्ती? धार्मिक मान्यता की आणखी काही?
14
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
15
सुश्मिता सेनने पूर्ण शुद्धीत राहूनच केलेली अँजिओप्लास्टी, दोन वर्षांपूर्वी आलेला हार्टॲटॅक
16
काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; पूल कोसळून ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण अजूनही बेपत्ता
17
आई वडिलांची एक चूक नडली, मुलाला झाला गंभीर आजार; हाताचे बोट कापावे लागले, कारण काय?
18
टॅक्स भरणे झाले सोपे! बँक, नेट बँकिंगचा झंझट नाही; आता UPI ॲपद्वारे मिनिटांत भरा प्राप्तीकर
19
पालघर साधू हत्याकांडात आरोप केले, त्यालाच पक्षात घेतले? चौफेर टीका होताच भाजपानं दिलं असं स्पष्टीकरण
20
देवेंद्र फडणवीसांना भेटला, सत्कार करून घेतला; पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणणारा निघाला...
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण कर्जमाफीवर ‘स्वाभिमानी’ संघटना ठाम : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 23:42 IST

शेट्टी म्हणाले, देशातील २६५ संघटनांच्या किसान संघटना समन्वय समितीने ८ जानेवारीच्या संपात सहभाग जाहीर केला आहे. यात केंद्राच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध केला जाईल. संपूर्ण ग्रामीण भारत बंदसाठी शेतकरी संघटनांचा पुढाकार राहील. काही ठिकाणी रास्ता रोकोही होईल. उसाला एफआरपी अधिक दोनशे रुपये या मागणीवर आम्ही ठाम आहोत.

ठळक मुद्देएफआरपीसह २०० रुपयांसाठी वाहतूक रोखणार; ८ जानेवारीच्या संपात ग्रामीण महाराष्ट्र सहभागी

सांगली : राज्य सरकारची कर्जमाफी तकलादू आहे. संपूर्ण कर्जमाफीसह सात-बारा कोरा, या मागणीवर आम्ही ठाम आहोत. यासह विविध मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी (दि. ८) देशव्यापी संप पुकारला आहे. त्यामध्ये संघटनेच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भारत शंभर टक्के बंद राहील, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. सांगलीत शुक्रवारी संघटनेचा मेळावा झाला, त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यावेळी उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले, देशातील २६५ संघटनांच्या किसान संघटना समन्वय समितीने ८ जानेवारीच्या संपात सहभाग जाहीर केला आहे. यात केंद्राच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध केला जाईल. संपूर्ण ग्रामीण भारत बंदसाठी शेतकरी संघटनांचा पुढाकार राहील. काही ठिकाणी रास्ता रोकोही होईल. उसाला एफआरपी अधिक दोनशे रुपये या मागणीवर आम्ही ठाम आहोत. कारखाने उसाअभावी अडचणीत असल्याने आंदोलनाची दिशा बदलली आहे. आंदोलनामुळे गाळप हंगामात अडथळे येऊन शेतकऱ्यांचेच नुकसान झाले असते. महापुरातील ऊस तोडला नाही, तर कारखान्यांना सोडणार नाही. दोनशे रुपये अधिक न देणाºया कारखान्यांची वाहतूक शेतकऱ्यांनी रोखावी.

विशाल पाटील म्हणाले, सरकारची कर्जमाफी फसवी आहे. जिल्हा बँकेत आम्हाला शेतकºयांचे दररोज फोन येत आहेत. सरसकट कर्जमाफी न दिल्यास लढा उभारावा लागेल. यावेळी जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, महेश खराडे, संजय बेले, संदीप राजोबा, भागवत जाधव, बी. आर. पाटील, प्रकाश सटाले, गुलाबराव यादव, महेश जगताप, जोतिराम जाधव, भरत चौगुले, राजेंद्र माने, शंकर लंगोटे आदी उपस्थित होते.

 

  • धरसोडीने : तीनशे शेतकऱ्यांची आत्महत्या

शेट्टी म्हणाले, निवडणुकीवेळी सात-बारा कोरा करण्याचे आश्वासन सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी दिले होते. पण धरसोडीने तीनशे शेतकºयांनी आत्महत्या केल्या. थकीत किंवा चालू कर्जमाफीने दिलासा मिळाला असता, तर आत्महत्या झाल्या नसत्या. कर्जमाफीचा फायदा बड्या कारखानदारांना होईल म्हणणे म्हणजे शेतकºयांच्या बदनामीचा प्रयत्न आहे. दोन लाखांची मर्यादा ठेवल्याने तसा फायदा होणार नाही.

  • वाटण्या बाजूला ठेवून कामाला लागा

शेट्टी म्हणाले, सरकार सत्तेत येऊन महिना लोटला तरी खातेवाटप नाही. सरकारने वाटण्या बाजूला ठेवून कामाकडे लक्ष द्यावे. मंत्रीपदावर कोण आहे यापेक्षा शेतकºयाला न्याय कोण देतो, याला स्वाभिमानीचे महत्त्व राहील.

 

टॅग्स :SangliसांगलीRaju Shettyराजू शेट्टी