शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण कर्जमाफीवर ‘स्वाभिमानी’ संघटना ठाम : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 23:42 IST

शेट्टी म्हणाले, देशातील २६५ संघटनांच्या किसान संघटना समन्वय समितीने ८ जानेवारीच्या संपात सहभाग जाहीर केला आहे. यात केंद्राच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध केला जाईल. संपूर्ण ग्रामीण भारत बंदसाठी शेतकरी संघटनांचा पुढाकार राहील. काही ठिकाणी रास्ता रोकोही होईल. उसाला एफआरपी अधिक दोनशे रुपये या मागणीवर आम्ही ठाम आहोत.

ठळक मुद्देएफआरपीसह २०० रुपयांसाठी वाहतूक रोखणार; ८ जानेवारीच्या संपात ग्रामीण महाराष्ट्र सहभागी

सांगली : राज्य सरकारची कर्जमाफी तकलादू आहे. संपूर्ण कर्जमाफीसह सात-बारा कोरा, या मागणीवर आम्ही ठाम आहोत. यासह विविध मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी (दि. ८) देशव्यापी संप पुकारला आहे. त्यामध्ये संघटनेच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भारत शंभर टक्के बंद राहील, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. सांगलीत शुक्रवारी संघटनेचा मेळावा झाला, त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यावेळी उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले, देशातील २६५ संघटनांच्या किसान संघटना समन्वय समितीने ८ जानेवारीच्या संपात सहभाग जाहीर केला आहे. यात केंद्राच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध केला जाईल. संपूर्ण ग्रामीण भारत बंदसाठी शेतकरी संघटनांचा पुढाकार राहील. काही ठिकाणी रास्ता रोकोही होईल. उसाला एफआरपी अधिक दोनशे रुपये या मागणीवर आम्ही ठाम आहोत. कारखाने उसाअभावी अडचणीत असल्याने आंदोलनाची दिशा बदलली आहे. आंदोलनामुळे गाळप हंगामात अडथळे येऊन शेतकऱ्यांचेच नुकसान झाले असते. महापुरातील ऊस तोडला नाही, तर कारखान्यांना सोडणार नाही. दोनशे रुपये अधिक न देणाºया कारखान्यांची वाहतूक शेतकऱ्यांनी रोखावी.

विशाल पाटील म्हणाले, सरकारची कर्जमाफी फसवी आहे. जिल्हा बँकेत आम्हाला शेतकºयांचे दररोज फोन येत आहेत. सरसकट कर्जमाफी न दिल्यास लढा उभारावा लागेल. यावेळी जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, महेश खराडे, संजय बेले, संदीप राजोबा, भागवत जाधव, बी. आर. पाटील, प्रकाश सटाले, गुलाबराव यादव, महेश जगताप, जोतिराम जाधव, भरत चौगुले, राजेंद्र माने, शंकर लंगोटे आदी उपस्थित होते.

 

  • धरसोडीने : तीनशे शेतकऱ्यांची आत्महत्या

शेट्टी म्हणाले, निवडणुकीवेळी सात-बारा कोरा करण्याचे आश्वासन सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी दिले होते. पण धरसोडीने तीनशे शेतकºयांनी आत्महत्या केल्या. थकीत किंवा चालू कर्जमाफीने दिलासा मिळाला असता, तर आत्महत्या झाल्या नसत्या. कर्जमाफीचा फायदा बड्या कारखानदारांना होईल म्हणणे म्हणजे शेतकºयांच्या बदनामीचा प्रयत्न आहे. दोन लाखांची मर्यादा ठेवल्याने तसा फायदा होणार नाही.

  • वाटण्या बाजूला ठेवून कामाला लागा

शेट्टी म्हणाले, सरकार सत्तेत येऊन महिना लोटला तरी खातेवाटप नाही. सरकारने वाटण्या बाजूला ठेवून कामाकडे लक्ष द्यावे. मंत्रीपदावर कोण आहे यापेक्षा शेतकºयाला न्याय कोण देतो, याला स्वाभिमानीचे महत्त्व राहील.

 

टॅग्स :SangliसांगलीRaju Shettyराजू शेट्टी