शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा परिषदेत ‘स्वाभिमानी’कडून तोडफोड-पेयजल योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 00:57 IST

संख (ता. जत) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेत भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा

ठळक मुद्देआंदोलक आक्रमक : संख येथील शासनाच्या पेयजल योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी

सांगली : संख (ता. जत) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेत भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयावर हल्ला करुन तोडफोड केली. कार्यालयातील प्लास्टिकचे पार्टिशन फोडले. यावेळी विभागाच्या कक्ष अधिकारी किरकोळ जखमी झाल्या. तोडफोडप्रकरणी रात्री उशिरा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

संख येथील राष्ट्रीय पेयजल योजनेतून सहा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेले नळपाणी पुरवठा योजनेचे काम अद्याप अपूर्ण आहे. या कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेसमोर बुधवारपासून बेमुदत उपोषणास सुरूवात केली आहे. गुरूवारी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी प्रशासनाकडून आंदोलकांना प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे पत्र देण्यात आले होते. पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता अशोक खाडे यांनी आंदोलकांशी चर्चा करून त्यांना हे पत्र दिले होते.

सायंकाळी पाचच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, महावीर पाटील, संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, महादेव बागेळी यांच्यासह कार्यकर्त्यांनी कार्यालयात येऊन, आम्हाला केवळ आश्वासन नको, तर दोषींवर गुन्हा दाखल करण्याबाबतच्या निर्णयाचे पत्र हवे, अशी मागणी केली. ठोस कारवाईच्या पत्रासाठी कार्यकर्ते आग्रही होते. यावरून झालेल्या वादावादीमध्ये कार्यकर्त्यांनी ग्रामीण पाणी पुरवठा कार्यालयातील पार्टिशनची तोडफोड केली. यावेळी विभागाच्या कक्ष अधिकारी कल्पना रेंगडे यांच्या हाताला दुखापत झाली आहे. पार्टिशनचे तुकडे कार्यालयात अस्ताव्यस्त पडले होते. पोलिसांनी पंचनामा करून उपस्थित कर्मचाºयांचे जबाब नोंदवून घेतले.

आंदोलनस्थळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तोडफोड करणाºया कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. याची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पोलिसांना तपासाबाबत सूचना दिल्या.मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे उपस्थित होते. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.दुसºया दिवशी कारवाईचे पत्रसंख येथील राष्टÑीय पेयजल योजनेच्या कामातील अनियमितताप्रकरणी ग्रामस्थांनी विविध पातळीवर पाठपुरावा केला होता. बुधवारपासून बेमुदत उपोषण आंदोलनास सुरूवात करण्याअगोदर त्यांनी जिल्हाधिकाºयांनाही निवेदन सादर केले होते. तालुकापातळीवरही त्यांनी पाठपुरावा केला होता. तरीही चौकशी होत नसल्याने आंदोलनास सुरूवात केली होती. आंदोलनाच्या दुसºयादिवशी प्रशासनाकडून चौकशी करून कारवाईचे पत्र देण्यात आले होते. 

तोडफोडीनंतर घोषणाबाजीतोडफोड केल्याचे समजताच पोलिसांनी येऊन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘खासदार राजू शेट्टी यांचा विजय असो’, ‘मागण्या आमच्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाच्या’, ‘भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना चौकशीसाठीही थांबवून ठेवले होते.

टॅग्स :PoliticsराजकारणSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना