शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

सांगली जिल्हा परिषदेत ‘स्वाभिमानी’कडून तोडफोड-पेयजल योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 00:57 IST

संख (ता. जत) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेत भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा

ठळक मुद्देआंदोलक आक्रमक : संख येथील शासनाच्या पेयजल योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी

सांगली : संख (ता. जत) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेत भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयावर हल्ला करुन तोडफोड केली. कार्यालयातील प्लास्टिकचे पार्टिशन फोडले. यावेळी विभागाच्या कक्ष अधिकारी किरकोळ जखमी झाल्या. तोडफोडप्रकरणी रात्री उशिरा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

संख येथील राष्ट्रीय पेयजल योजनेतून सहा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेले नळपाणी पुरवठा योजनेचे काम अद्याप अपूर्ण आहे. या कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेसमोर बुधवारपासून बेमुदत उपोषणास सुरूवात केली आहे. गुरूवारी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी प्रशासनाकडून आंदोलकांना प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे पत्र देण्यात आले होते. पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता अशोक खाडे यांनी आंदोलकांशी चर्चा करून त्यांना हे पत्र दिले होते.

सायंकाळी पाचच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, महावीर पाटील, संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, महादेव बागेळी यांच्यासह कार्यकर्त्यांनी कार्यालयात येऊन, आम्हाला केवळ आश्वासन नको, तर दोषींवर गुन्हा दाखल करण्याबाबतच्या निर्णयाचे पत्र हवे, अशी मागणी केली. ठोस कारवाईच्या पत्रासाठी कार्यकर्ते आग्रही होते. यावरून झालेल्या वादावादीमध्ये कार्यकर्त्यांनी ग्रामीण पाणी पुरवठा कार्यालयातील पार्टिशनची तोडफोड केली. यावेळी विभागाच्या कक्ष अधिकारी कल्पना रेंगडे यांच्या हाताला दुखापत झाली आहे. पार्टिशनचे तुकडे कार्यालयात अस्ताव्यस्त पडले होते. पोलिसांनी पंचनामा करून उपस्थित कर्मचाºयांचे जबाब नोंदवून घेतले.

आंदोलनस्थळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तोडफोड करणाºया कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. याची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पोलिसांना तपासाबाबत सूचना दिल्या.मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे उपस्थित होते. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.दुसºया दिवशी कारवाईचे पत्रसंख येथील राष्टÑीय पेयजल योजनेच्या कामातील अनियमितताप्रकरणी ग्रामस्थांनी विविध पातळीवर पाठपुरावा केला होता. बुधवारपासून बेमुदत उपोषण आंदोलनास सुरूवात करण्याअगोदर त्यांनी जिल्हाधिकाºयांनाही निवेदन सादर केले होते. तालुकापातळीवरही त्यांनी पाठपुरावा केला होता. तरीही चौकशी होत नसल्याने आंदोलनास सुरूवात केली होती. आंदोलनाच्या दुसºयादिवशी प्रशासनाकडून चौकशी करून कारवाईचे पत्र देण्यात आले होते. 

तोडफोडीनंतर घोषणाबाजीतोडफोड केल्याचे समजताच पोलिसांनी येऊन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘खासदार राजू शेट्टी यांचा विजय असो’, ‘मागण्या आमच्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाच्या’, ‘भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना चौकशीसाठीही थांबवून ठेवले होते.

टॅग्स :PoliticsराजकारणSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना