शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’त नाराजीचा फड!

By admin | Updated: October 29, 2014 00:08 IST

फुटीची चिन्हे : ऊस उत्पादकांच्या मुळावर

अशोक डोंबाळे - सांगली -स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याऐवजी वाऱ्यावर सोडले, अशा संतप्त प्रतिक्रिया कार्यकर्त्यांतून उमटत आहेत. संघटनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या विधानसभा मतदारसंघांत कार्यकर्त्यांना बळ देण्याऐवजी तेथे उसन्या उमेदवारांना आर्थिक निकषावर संधी देण्यात आल्याने सध्या संघटना फुटीच्या उंबरठ्यावर असून, ही बाब ऊस उत्पादकांच्या मुळावर घाव घालणारीच आहे. संघटनेत फूट पाडण्याच्या खेळीत साखरसम्राट काही प्रमाणात यशस्वी झाले आहेत. बहुतांश पक्षांतील नेतेमंडळी निवडणुकांवेळी मुलाखतीला येणाऱ्या इच्छुकांकडे, ‘पैशाची काय तरतूद?’, अशी विचारणा करतच असतात. परंतु अशी विचारणा चळवळीतून नेते म्हणून नावारूपाला आलेल्यांकडूनही झाली, असा आरोप आता होत आहे. शेट्टींच्या जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका शेतकरी, कष्टकऱ्यांच्या बळावरच आणि त्यांनी केलेल्या आर्थिक मदतीतूनच झाल्या आहेत. त्या धर्तीवर कार्यकर्तेही विजयी होतील, असे नेत्यांना का वाटले नाही, अशी कार्यकर्त्यांतून चर्चा सुरू झाली आहे. स्वाभिमानीच्या इच्छुक कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून उसन्या उमेदवारांना पाच ठिकाणी उमेदवारी देण्यात आली. याशिवाय, सांगली जिल्ह्यातील हक्काचे मतदारसंघही मित्रपक्षांना सोडण्यात आले. यामुळे येथील संघटनेचे बळ विरोधकांना मिळाले.निवडणुकीतील संघटनेच्या नेत्यांनी केलेल्या या खेळीतून दुखावलेल्या काही कार्यकर्त्यांनी संघटनेला कायमचा रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. काहींनी संघटनेत सहभाग न घेता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीवरून संघटना फुटीच्या उंबरठ्यावर आहे, हे निश्चित.इस्लामपूर मतदारसंघातून बी. जी. पाटील लढवय्ये कार्यकर्ते असून, त्यांनी उमेदवारी मागितली होती. परंतु, पाटील यांची आर्थिक बाजू कमकुवत असल्याने त्यांना उमेदवारी नाकारल्याचे सांगितले जाते. पाटील यांची बाजू कमकुवत होती, तर सदाभाऊ खोत यांना मैदानात का उतरवले नाही? काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील यांना कशासाठी निवडणूक मैदानात उतरवण्यात आले? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. पलूस-कडेगावमधून संदीप राजोबा इच्छुक होते, पण त्यांनाही उमेदवारी नाकारून ही जागा भाजपला सोडण्यात आली. तासगाव-कवठेमहांकाळमधून महेश खराडे इच्छुक होते. ती जागाही भाजपला गेली. यामुळे खराडे यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढविली.पंढरपूर मतदारसंघातून सोलापूर जिल्हाध्यक्ष जयंत बगाटे इच्छुक होते. परंतु, तेथे साखरसम्राट प्रशांत परिचारक यांना स्वाभिमानीने उमेदवारी दिली. येथील नाराज कार्यकर्त्यांनी भारत भालके यांना सहकार्य केले. करमाळ्यातही साखर कारखानदार संजय शिंदे यांना उमेदवारी दिली. कऱ्हाड उत्तरमधून संघटनेचे पंजाबराव पाटील इच्छुक होते. ऊसदराच्या आंदोलनात त्यांनी तुरूंगवासही भोगला. परंतु, संघटनेने ही जागा भाजपला सोडली आणि कऱ्हाड दक्षिणची जागा घेतली. येथून उद्योजक मनोज घोरपडे यांना उमेदवारी दिली. फलटणमधून काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य पोपटराव काकडे यांना, तर शाहुवाडीतून काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य अमरसिंह पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरविले. संघटनेच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत प्रस्थापित पक्षाप्रमाणेच भूमिका घेऊन उमेदवारीच्या खिरापती वाटल्या. यातूनच संघटनेत धुसफूस सुरु आहे. संघटनेत फूट पाडण्यात साखरसम्राट यशस्वी ठरले असून, याचा फटका ऊस उत्पादकांना बसण्याची चिन्हे आहेत.डिवचाल तर खासदारकीही...स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा झेंडा खांद्यावर घेऊन जिवाचे रान करणारा लढवय्या कार्यकर्ता, अशी उल्हास पाटील यांची ओळख होती. पण, आर्थिक निकष नेत्यांनी लावला आणि शिरोळ (जि. कोल्हापूर) विधानसभा मतदारसंघातून त्यांची उमेदवारी नाकारली. शेवटी लढवय्या तो लढवय्याच. उल्हास पाटील यांनी शिवसेनेकडून संघटनेच्या उमेदवाराच्याविरोधात आवाज उठविला आणि विजयही खेचून आणला. याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा फलक शिरोळमध्ये लागला असून, त्यावर ‘आता केवळ आमदारकी, डिवचाल तर खासदारकीही’ असा इशारा राजू शेट्टी यांना दिला आहे.यंदा दोन ऊस परिषदास्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद जयसिंगपूर येथे दि. १ नोव्हेंबर रोजी आहे. मात्र संघटनेतून बाहेर पडून शिवसेनेचे आमदार झालेले उल्हास पाटील यांनीही सवतासुभा मांडत दि. १६ नोव्हेंबरला ऊस परिषदेचे नियोजन सुरु केले आहे. त्यांना सांगली जिल्ह्यातील नाराज गटाचे पाठबळ असल्याचे बोलले जात आहे.