शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’त नाराजीचा फड!

By admin | Updated: October 29, 2014 00:08 IST

फुटीची चिन्हे : ऊस उत्पादकांच्या मुळावर

अशोक डोंबाळे - सांगली -स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याऐवजी वाऱ्यावर सोडले, अशा संतप्त प्रतिक्रिया कार्यकर्त्यांतून उमटत आहेत. संघटनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या विधानसभा मतदारसंघांत कार्यकर्त्यांना बळ देण्याऐवजी तेथे उसन्या उमेदवारांना आर्थिक निकषावर संधी देण्यात आल्याने सध्या संघटना फुटीच्या उंबरठ्यावर असून, ही बाब ऊस उत्पादकांच्या मुळावर घाव घालणारीच आहे. संघटनेत फूट पाडण्याच्या खेळीत साखरसम्राट काही प्रमाणात यशस्वी झाले आहेत. बहुतांश पक्षांतील नेतेमंडळी निवडणुकांवेळी मुलाखतीला येणाऱ्या इच्छुकांकडे, ‘पैशाची काय तरतूद?’, अशी विचारणा करतच असतात. परंतु अशी विचारणा चळवळीतून नेते म्हणून नावारूपाला आलेल्यांकडूनही झाली, असा आरोप आता होत आहे. शेट्टींच्या जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका शेतकरी, कष्टकऱ्यांच्या बळावरच आणि त्यांनी केलेल्या आर्थिक मदतीतूनच झाल्या आहेत. त्या धर्तीवर कार्यकर्तेही विजयी होतील, असे नेत्यांना का वाटले नाही, अशी कार्यकर्त्यांतून चर्चा सुरू झाली आहे. स्वाभिमानीच्या इच्छुक कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून उसन्या उमेदवारांना पाच ठिकाणी उमेदवारी देण्यात आली. याशिवाय, सांगली जिल्ह्यातील हक्काचे मतदारसंघही मित्रपक्षांना सोडण्यात आले. यामुळे येथील संघटनेचे बळ विरोधकांना मिळाले.निवडणुकीतील संघटनेच्या नेत्यांनी केलेल्या या खेळीतून दुखावलेल्या काही कार्यकर्त्यांनी संघटनेला कायमचा रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. काहींनी संघटनेत सहभाग न घेता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीवरून संघटना फुटीच्या उंबरठ्यावर आहे, हे निश्चित.इस्लामपूर मतदारसंघातून बी. जी. पाटील लढवय्ये कार्यकर्ते असून, त्यांनी उमेदवारी मागितली होती. परंतु, पाटील यांची आर्थिक बाजू कमकुवत असल्याने त्यांना उमेदवारी नाकारल्याचे सांगितले जाते. पाटील यांची बाजू कमकुवत होती, तर सदाभाऊ खोत यांना मैदानात का उतरवले नाही? काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील यांना कशासाठी निवडणूक मैदानात उतरवण्यात आले? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. पलूस-कडेगावमधून संदीप राजोबा इच्छुक होते, पण त्यांनाही उमेदवारी नाकारून ही जागा भाजपला सोडण्यात आली. तासगाव-कवठेमहांकाळमधून महेश खराडे इच्छुक होते. ती जागाही भाजपला गेली. यामुळे खराडे यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढविली.पंढरपूर मतदारसंघातून सोलापूर जिल्हाध्यक्ष जयंत बगाटे इच्छुक होते. परंतु, तेथे साखरसम्राट प्रशांत परिचारक यांना स्वाभिमानीने उमेदवारी दिली. येथील नाराज कार्यकर्त्यांनी भारत भालके यांना सहकार्य केले. करमाळ्यातही साखर कारखानदार संजय शिंदे यांना उमेदवारी दिली. कऱ्हाड उत्तरमधून संघटनेचे पंजाबराव पाटील इच्छुक होते. ऊसदराच्या आंदोलनात त्यांनी तुरूंगवासही भोगला. परंतु, संघटनेने ही जागा भाजपला सोडली आणि कऱ्हाड दक्षिणची जागा घेतली. येथून उद्योजक मनोज घोरपडे यांना उमेदवारी दिली. फलटणमधून काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य पोपटराव काकडे यांना, तर शाहुवाडीतून काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य अमरसिंह पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरविले. संघटनेच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत प्रस्थापित पक्षाप्रमाणेच भूमिका घेऊन उमेदवारीच्या खिरापती वाटल्या. यातूनच संघटनेत धुसफूस सुरु आहे. संघटनेत फूट पाडण्यात साखरसम्राट यशस्वी ठरले असून, याचा फटका ऊस उत्पादकांना बसण्याची चिन्हे आहेत.डिवचाल तर खासदारकीही...स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा झेंडा खांद्यावर घेऊन जिवाचे रान करणारा लढवय्या कार्यकर्ता, अशी उल्हास पाटील यांची ओळख होती. पण, आर्थिक निकष नेत्यांनी लावला आणि शिरोळ (जि. कोल्हापूर) विधानसभा मतदारसंघातून त्यांची उमेदवारी नाकारली. शेवटी लढवय्या तो लढवय्याच. उल्हास पाटील यांनी शिवसेनेकडून संघटनेच्या उमेदवाराच्याविरोधात आवाज उठविला आणि विजयही खेचून आणला. याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा फलक शिरोळमध्ये लागला असून, त्यावर ‘आता केवळ आमदारकी, डिवचाल तर खासदारकीही’ असा इशारा राजू शेट्टी यांना दिला आहे.यंदा दोन ऊस परिषदास्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद जयसिंगपूर येथे दि. १ नोव्हेंबर रोजी आहे. मात्र संघटनेतून बाहेर पडून शिवसेनेचे आमदार झालेले उल्हास पाटील यांनीही सवतासुभा मांडत दि. १६ नोव्हेंबरला ऊस परिषदेचे नियोजन सुरु केले आहे. त्यांना सांगली जिल्ह्यातील नाराज गटाचे पाठबळ असल्याचे बोलले जात आहे.