शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

‘निनाईदेवी’चा ताबा देण्यास स्थगिती

By admin | Updated: December 9, 2014 01:24 IST

हायकोर्टाचा निर्णय : दालमिया शुगरचे कर्मचारी रिकाम्या हातांनी परतले

हायकोर्टाचा निर्णय : दालमिया शुगरचे कर्मचारी रिकाम्या हातांनी परतलेशिराळा : करुंगली (ता. शिराळा) येथील निनाईदेवी सहकारी साखर कारखाना विक्रीबाबत कारखान्याच्या सभासदांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेबाबत न्यायालयाने आज, सोमवारी दालमिया शुगर प्रा. लि. या कंपनीस निकाल होईपर्यंत बेकायदा ताबा देऊ नये, पोलीस संरक्षण देऊ नये, असा आदेश दिल्याने आज कारखान्याचा ताबा घेण्यासाठी आलेल्या ‘दालमिया’ कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.राज्य सहकारी बँकेने निनाईदेवी कारखान्याचा लिलाव काढून दालमिया ग्रुपला हा कारखाना २४ कोटीला विकला होता. त्यावेळी निनाईदेवी कारखान्याचे सभासद, कर्मचारी, कर्जपुरवठा करणाऱ्या वित्तीय संस्थांना वाऱ्यावर सोडले होते. फक्त राज्य बँकेने स्वत:च्या कर्जाचा विचार करून हा लिलाव केला होता. यानंतर ताबा घेण्यासाठी आलेल्या जवळजवळ १00 कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या दोन ट्रॅव्हल्स बसेस फोडून त्यांना मारहाण केली होती. कारखान्यातील ५ लाख ३७ हजारांच्या वस्तू चोरीस गेल्या होत्या. यामुळे ‘निनाईदेवी’ व ‘दालमिया’ यांच्यातील वाद वाढतच होता. याप्रश्नी प्रांताधिकारी यांच्याबरोबर समझोता बैठकही झाली होती. निनाईदेवी कारखान्यास जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून २00१ मध्ये ८ कोटी ७0 लाख कर्जही दिले होते. यासाठी १५ एकर जमीन तारण देण्यात आली होती. परतफेड न झाल्याने कर्जाची थकबाकी २७ कोटी रुपयांवर गेली आहे. पंधरा एकर जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर बँकेचा बोजा असताना, ही जमीन विकली गेल्याने जिल्हा बँकेने राज्य बँक व दालमिया कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. (पान ९ वर)पाचशेचा जमाव अन् कडेकोट बंदोबस्तआज सकाळी १0 वाजल्यापासून कारखाना गेटसमोर जवळपास पाचशे सभासद, कर्मचारी कंपनी अधिकाऱ्यांना विरोध करण्यासाठी जमा झाले होते. तसेच संघर्ष होऊ नये म्हणून मोठा पोलीस फौजफाटाही ठेवला होता. आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान दालमिया ग्रुपचे जवळजवळ १५0 अधिकारी, कर्मचारी कोकरुड पोलीस बंदोबस्तात ताबा घेण्यास गावात आले होते. मात्र, सकाळी ११ वाजता न्यायालयाच्या आदेशाबाबत कोकरुड पोलीस ठाण्यात कळविले. त्यानंतर पोलिसांनी कंपनी अधिकाऱ्यांना उच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत कल्पना दिल्यावर कंपनीचे अधिकारी, कर्मचारी परतले. ‘निनाईदेवी’चे सभासद, कर्मचारी, तसेच कर्जपुरवठा करणाऱ्या वित्त संस्थांनी आपापले हक्क व पैसे मिळावेत यासाठी लढा चालू केला आहे. या लढ्यामुळे दालमिया ग्रुपबरोबर राज्य बँकही अडचणीत आली आहे.याचदरम्यान या कारखान्याचे सभासद महादेव कदम, आनंदराव पाटील आदी पाचजणांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. कारखान्याचा विक्री व्यवहार चुकीचा झाला आहे.तसेच सभासदांचा विचार न करता कमी किंमतीत विक्री झाली असून या व्यवहारात सभासदांवर अन्याय केला आहे, अशा मुद्यांच्या आधारे याचिका दाखल केली होती. याचिकेवर आज न्यायालयाने निकाल होईपर्यंत निनाईदेवी कारखान्याचा ताबा कंपनीला देऊ नये, तसेच पोलीस संरक्षणही देऊ नये, असा आदेश दिला. (वार्ताहर)