शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

‘सूर्यराज’ तापले, ‘सर्पराज’ खवळले! चौघांचा बळी : जिल्ह्यात साडेचारशे जणांना सर्पदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 00:48 IST

सचिन लाड ।सांगली : वातावरणातील बदल, तसेच उन्हाच्या तडाख्यामुळे सर्वत्र ‘सर्पराज’ चांगलेच खवळले आहेत. त्यांचे वारुळ उन्हामुळे प्रचंड तापत असल्याने सर्प गारवा शोधण्याच्या प्रयत्नात आजुबाजूच्या घरात आश्रयाला जात आहेत. मानवी वस्तीत राहण्याची सवय नसल्याने त्यांच्याकडून दंश होण्याच्या घटनांत वाढ होत आहे. गेल्या तीन महिन्यात जिल्ह्यात ४३० जणांना सर्पदंश झाल्याची नोंद ...

सचिन लाड ।सांगली : वातावरणातील बदल, तसेच उन्हाच्या तडाख्यामुळे सर्वत्र ‘सर्पराज’ चांगलेच खवळले आहेत. त्यांचे वारुळ उन्हामुळे प्रचंड तापत असल्याने सर्प गारवा शोधण्याच्या प्रयत्नात आजुबाजूच्या घरात आश्रयाला जात आहेत. मानवी वस्तीत राहण्याची सवय नसल्याने त्यांच्याकडून दंश होण्याच्या घटनांत वाढ होत आहे. गेल्या तीन महिन्यात जिल्ह्यात ४३० जणांना सर्पदंश झाल्याची नोंद आहे. यामध्ये चौघांचा बळीही गेला आहे.

सांगली व मिरजेतील शासकीय रुग्णालयात सर्पदंशाचे दररोज सहा ते सात रुग्ण दाखल होत आहेत. गेल्या आठ दिवसात हा आकडा वाढला आहे. सर्पदंश झालेल्या रुग्णास उपचारार्थ तातडीने रुग्णालयात दाखल केले जाते. डॉक्टर प्रथम त्या रुग्णास अतिदक्षता विभागात हलवितात. विषारी आणि बिनविषारी असे सर्प असतात. रुग्णास कोणता सर्पदंश झाला आहे, हे कोणालाच समजत नाही.

काही वेळेला डॉक्टरांना उपचारासाठी मदत मिळावी, यासाठी संबंधित रुग्णास जो सर्प चावला आहे, त्याला पकडून रुग्णासह डॉक्टरांकडे घेऊन येतात. या प्रकाराने डॉक्टरही घाबरुन जातात. त्यांना सर्प कोणत्या जातीचा आहे, हे समजत नाही. सर्पदंश झालेल्या रुग्णावर चार-पाच तास देखरेख ठेवली जाते. यादरम्यान त्याच्या प्रकृतीने उपचारास प्रतिसाद दिला, तर धोका टळला असल्याचे मानले जाते.

यावर्षी प्रचंड उन्हाळा जाणवला. हवामानात सतत बदल होत आहे. उन्हाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाले. पण उन्हाचा तडाखा, गारव्याच्या शोधार्थ आणि उन्हाळी पावसाच्या ओलाव्यामुळे सर्प स्वत:चा जीव वाचविण्यासाठी वारुळातील बिळातून बाहेर पडले. आश्रयासाठी ते मानवी वस्तीत शिरत होते. घरातील दिवळीत, तुळीवर, पोटमाळ्यावर, उखळामध्ये, धान्याच्या पोत्याच्या ढिगाऱ्यात, कॉट तसेच तिजोरी यासह मिळेल त्या अडगळीच्या ठिकाणी जाऊन ते बसल्यामुळे, घरातील व्यक्ती त्याठिकाणी कामानिमित्त गेल्यानंतर सर्पराजांनी त्यांना दंश केल्याच्या घटना घडल्या.

अनेकदा रुग्णास कुणाचा दंश झाला आहे, हे समजत नाही. अज्ञात विषारी दंशाच्या संशयानेच त्याच्यावर उपचार केले जातात. गेल्या तीन महिन्यात शासकीय रुग्णालयात खासगी रुग्णालयात सर्पदंशाने उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांची संख्या साडेचारशेपर्यंत गेली आहे. दिवसेंदिवस हा आकडा वाढतच आहे.उपचाराचा खर्च महागडासर्पदंश झालेल्या रुग्णाची वैद्यकीय अधिकाºयाकडून पोलीस केस बनविली जाते. त्यामुळे या रुग्णावर मोफत उपचार केले जात आहेत. केस झाल्यामुळे पोलीस रुग्णाचा जबाब नोंदवून घेतात. त्याने सर्पदंशच झाल्याचे सांगितले, तर केस फाईलबंद केली जाते. रुग्णावरील या उपचाराचा खर्चही महागडा आहे. खासगी रुग्णालयात रुग्ण दाखल झाला, तर किमान पंधरा ते सतरा हजार रुपये खर्च येतो, असे डॉक्टरांनी सांगितले.