शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

‘सूर्यराज’ तापले, ‘सर्पराज’ खवळले! चौघांचा बळी : जिल्ह्यात साडेचारशे जणांना सर्पदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 00:48 IST

सचिन लाड ।सांगली : वातावरणातील बदल, तसेच उन्हाच्या तडाख्यामुळे सर्वत्र ‘सर्पराज’ चांगलेच खवळले आहेत. त्यांचे वारुळ उन्हामुळे प्रचंड तापत असल्याने सर्प गारवा शोधण्याच्या प्रयत्नात आजुबाजूच्या घरात आश्रयाला जात आहेत. मानवी वस्तीत राहण्याची सवय नसल्याने त्यांच्याकडून दंश होण्याच्या घटनांत वाढ होत आहे. गेल्या तीन महिन्यात जिल्ह्यात ४३० जणांना सर्पदंश झाल्याची नोंद ...

सचिन लाड ।सांगली : वातावरणातील बदल, तसेच उन्हाच्या तडाख्यामुळे सर्वत्र ‘सर्पराज’ चांगलेच खवळले आहेत. त्यांचे वारुळ उन्हामुळे प्रचंड तापत असल्याने सर्प गारवा शोधण्याच्या प्रयत्नात आजुबाजूच्या घरात आश्रयाला जात आहेत. मानवी वस्तीत राहण्याची सवय नसल्याने त्यांच्याकडून दंश होण्याच्या घटनांत वाढ होत आहे. गेल्या तीन महिन्यात जिल्ह्यात ४३० जणांना सर्पदंश झाल्याची नोंद आहे. यामध्ये चौघांचा बळीही गेला आहे.

सांगली व मिरजेतील शासकीय रुग्णालयात सर्पदंशाचे दररोज सहा ते सात रुग्ण दाखल होत आहेत. गेल्या आठ दिवसात हा आकडा वाढला आहे. सर्पदंश झालेल्या रुग्णास उपचारार्थ तातडीने रुग्णालयात दाखल केले जाते. डॉक्टर प्रथम त्या रुग्णास अतिदक्षता विभागात हलवितात. विषारी आणि बिनविषारी असे सर्प असतात. रुग्णास कोणता सर्पदंश झाला आहे, हे कोणालाच समजत नाही.

काही वेळेला डॉक्टरांना उपचारासाठी मदत मिळावी, यासाठी संबंधित रुग्णास जो सर्प चावला आहे, त्याला पकडून रुग्णासह डॉक्टरांकडे घेऊन येतात. या प्रकाराने डॉक्टरही घाबरुन जातात. त्यांना सर्प कोणत्या जातीचा आहे, हे समजत नाही. सर्पदंश झालेल्या रुग्णावर चार-पाच तास देखरेख ठेवली जाते. यादरम्यान त्याच्या प्रकृतीने उपचारास प्रतिसाद दिला, तर धोका टळला असल्याचे मानले जाते.

यावर्षी प्रचंड उन्हाळा जाणवला. हवामानात सतत बदल होत आहे. उन्हाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाले. पण उन्हाचा तडाखा, गारव्याच्या शोधार्थ आणि उन्हाळी पावसाच्या ओलाव्यामुळे सर्प स्वत:चा जीव वाचविण्यासाठी वारुळातील बिळातून बाहेर पडले. आश्रयासाठी ते मानवी वस्तीत शिरत होते. घरातील दिवळीत, तुळीवर, पोटमाळ्यावर, उखळामध्ये, धान्याच्या पोत्याच्या ढिगाऱ्यात, कॉट तसेच तिजोरी यासह मिळेल त्या अडगळीच्या ठिकाणी जाऊन ते बसल्यामुळे, घरातील व्यक्ती त्याठिकाणी कामानिमित्त गेल्यानंतर सर्पराजांनी त्यांना दंश केल्याच्या घटना घडल्या.

अनेकदा रुग्णास कुणाचा दंश झाला आहे, हे समजत नाही. अज्ञात विषारी दंशाच्या संशयानेच त्याच्यावर उपचार केले जातात. गेल्या तीन महिन्यात शासकीय रुग्णालयात खासगी रुग्णालयात सर्पदंशाने उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांची संख्या साडेचारशेपर्यंत गेली आहे. दिवसेंदिवस हा आकडा वाढतच आहे.उपचाराचा खर्च महागडासर्पदंश झालेल्या रुग्णाची वैद्यकीय अधिकाºयाकडून पोलीस केस बनविली जाते. त्यामुळे या रुग्णावर मोफत उपचार केले जात आहेत. केस झाल्यामुळे पोलीस रुग्णाचा जबाब नोंदवून घेतात. त्याने सर्पदंशच झाल्याचे सांगितले, तर केस फाईलबंद केली जाते. रुग्णावरील या उपचाराचा खर्चही महागडा आहे. खासगी रुग्णालयात रुग्ण दाखल झाला, तर किमान पंधरा ते सतरा हजार रुपये खर्च येतो, असे डॉक्टरांनी सांगितले.