शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

थकबाकी वसुलीचा सुपरफास्ट पंधरवडा : जिल्हा बँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 01:09 IST

सांगली : चालू आर्थिक वर्ष संपण्यास केवळ पंधरवडाच हाती असल्याने जिल्हा बँक प्रशासनाची पळापळ सुरू झाली आहे. बड्या दहा थकबाकीदारांकडून कर्जवसुलीस प्रतिसाद मिळत असल्याने मार्चअखेर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने गेल्या दोन वर्षापासून शासनाच्या अनेक अडचणींचे बांध तोडून सक्षमतेने कारभार केला आहे. नफ्याच्या आकडेवारीत घट ...

ठळक मुद्देबड्या दहा थकबाकीदारांकडून प्रतिसादाची चिन्हे, नोटिसा बजावताना दुजाभाव टाळला, सर्वांनाच समान न्याय

सांगली : चालू आर्थिक वर्ष संपण्यास केवळ पंधरवडाच हाती असल्याने जिल्हा बँक प्रशासनाची पळापळ सुरू झाली आहे. बड्या दहा थकबाकीदारांकडून कर्जवसुलीस प्रतिसाद मिळत असल्याने मार्चअखेर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने गेल्या दोन वर्षापासून शासनाच्या अनेक अडचणींचे बांध तोडून सक्षमतेने कारभार केला आहे. नफ्याच्या आकडेवारीत घट झाली असली तरी, बँकेच्या कारभारावर त्याचा कुठेही परिणाम झालेला नाही. जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी शंभर कोटी नफ्याचे उद्दिष्ट दिले होते. त्याचवर्षी नोटाबंदीचा निर्णय झाला आणि रिझर्व्ह बँकेमार्फत जिल्हा बँकेची कोंडी सुरू झाली. यावर मात करीत जिल्हा बँकेने नफ्याची समाधानकारक आकडेवारी गाठली. चालू आर्थिक वर्षातही बँकेला समाधानकारक आकडा गाठता येईल, अशी परिस्थिती आहे. त्यासाठीच प्रशासनाने आता गतीने वसुलीसाठी पावले उचलली आहेत.

बड्या वीस थकबाकीदारांना नोटिसा बजावल्यानंतर यातील काही थकबाकीदारांनी पैसे जमा केले आहेत. आता बड्या थकबाकीदारांतील पहिल्या दहा संस्थांकडील थकबाकी वसुलीबाबत कडक धोरण बँक प्रशासनाने स्वीकारले आहे. या संस्थांनीही ३१ मार्चपूर्वी थकबाकी भरण्याचे मान्य केल्याचे समजते. त्यामुळे ३१ मार्चपूर्वीच या संस्थांची वसुली करून नफ्याचा अपेक्षित आकडा गाठण्याचा प्रयत्न दिसत आहे. वर्षभरात बँकेच्या एनपीए (नॉन परफॉर्मिंग असेटस्)मध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. हा एनपीएसुद्धा कमी करण्याचे आव्हान बँकेसमोर आहे.बँकेच्या संचालक मंडळाने गेल्या तीन वर्षात चांगला कारभार केला आहे. आर्थिक सक्षमता टिकविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. त्यामुळेच पदाधिकारी, संचालकांकडूनही वसुलीचा आढावा घेतला जात आहे.कारवाईत : पारदर्शीपणाजिल्हा बँकेने कर्ज देताना आणि वसुलीवेळी दुजाभाव टाळला आहे. थकबाकी असलेल्या संस्थांना नोटिसा बजावताना सर्वांनाच समान न्याय दर्शविला. त्यामुळे बँकेतील वातावरण सध्या चांगले आहे. अन्यथा कारवाईत दुजाभाव झाला असता, तर वसुलीच्या प्रक्रियेला अडथळा आला असता. त्यामुळे त्याबाबतचे पथ्य पदाधिकारी व प्रशासनाने पाळले आहे.