शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
3
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
4
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
5
रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
6
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
7
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
8
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
9
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
10
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
11
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
12
२०२७ पर्यंत युनायटेड अमेरिकेचं विभाजन? ट्रम्प ठरणार USAचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष! मोठे भाकित...
13
मराठी अभिनेत्रीचं "न्यूड" फोटोशूट; सौंदर्य पाहून चाहते प्रेमात, करत आहेत कौतुक
14
नवरात्री २०२५: १२५ वर्ष जुने कोकणातले पंचमुखी गायत्री मंदिर पाहिले का? मंत्रमुग्ध करणारी मूर्ती आणि इतिहास 
15
अश्विनची लवकरच क्रिकेटमध्ये नवी इनिंग; आता पाकिस्तानी क्रिकेटरसोबत एकाच संघात खेळणार!
16
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
17
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
18
15 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; Volvo कार जप्त
19
Volvo EX30: एका चार्जवर ४८० किमी धावणार; वोल्वोची बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च!
20
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार

थकबाकी वसुलीचा सुपरफास्ट पंधरवडा : जिल्हा बँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 01:09 IST

सांगली : चालू आर्थिक वर्ष संपण्यास केवळ पंधरवडाच हाती असल्याने जिल्हा बँक प्रशासनाची पळापळ सुरू झाली आहे. बड्या दहा थकबाकीदारांकडून कर्जवसुलीस प्रतिसाद मिळत असल्याने मार्चअखेर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने गेल्या दोन वर्षापासून शासनाच्या अनेक अडचणींचे बांध तोडून सक्षमतेने कारभार केला आहे. नफ्याच्या आकडेवारीत घट ...

ठळक मुद्देबड्या दहा थकबाकीदारांकडून प्रतिसादाची चिन्हे, नोटिसा बजावताना दुजाभाव टाळला, सर्वांनाच समान न्याय

सांगली : चालू आर्थिक वर्ष संपण्यास केवळ पंधरवडाच हाती असल्याने जिल्हा बँक प्रशासनाची पळापळ सुरू झाली आहे. बड्या दहा थकबाकीदारांकडून कर्जवसुलीस प्रतिसाद मिळत असल्याने मार्चअखेर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने गेल्या दोन वर्षापासून शासनाच्या अनेक अडचणींचे बांध तोडून सक्षमतेने कारभार केला आहे. नफ्याच्या आकडेवारीत घट झाली असली तरी, बँकेच्या कारभारावर त्याचा कुठेही परिणाम झालेला नाही. जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी शंभर कोटी नफ्याचे उद्दिष्ट दिले होते. त्याचवर्षी नोटाबंदीचा निर्णय झाला आणि रिझर्व्ह बँकेमार्फत जिल्हा बँकेची कोंडी सुरू झाली. यावर मात करीत जिल्हा बँकेने नफ्याची समाधानकारक आकडेवारी गाठली. चालू आर्थिक वर्षातही बँकेला समाधानकारक आकडा गाठता येईल, अशी परिस्थिती आहे. त्यासाठीच प्रशासनाने आता गतीने वसुलीसाठी पावले उचलली आहेत.

बड्या वीस थकबाकीदारांना नोटिसा बजावल्यानंतर यातील काही थकबाकीदारांनी पैसे जमा केले आहेत. आता बड्या थकबाकीदारांतील पहिल्या दहा संस्थांकडील थकबाकी वसुलीबाबत कडक धोरण बँक प्रशासनाने स्वीकारले आहे. या संस्थांनीही ३१ मार्चपूर्वी थकबाकी भरण्याचे मान्य केल्याचे समजते. त्यामुळे ३१ मार्चपूर्वीच या संस्थांची वसुली करून नफ्याचा अपेक्षित आकडा गाठण्याचा प्रयत्न दिसत आहे. वर्षभरात बँकेच्या एनपीए (नॉन परफॉर्मिंग असेटस्)मध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. हा एनपीएसुद्धा कमी करण्याचे आव्हान बँकेसमोर आहे.बँकेच्या संचालक मंडळाने गेल्या तीन वर्षात चांगला कारभार केला आहे. आर्थिक सक्षमता टिकविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. त्यामुळेच पदाधिकारी, संचालकांकडूनही वसुलीचा आढावा घेतला जात आहे.कारवाईत : पारदर्शीपणाजिल्हा बँकेने कर्ज देताना आणि वसुलीवेळी दुजाभाव टाळला आहे. थकबाकी असलेल्या संस्थांना नोटिसा बजावताना सर्वांनाच समान न्याय दर्शविला. त्यामुळे बँकेतील वातावरण सध्या चांगले आहे. अन्यथा कारवाईत दुजाभाव झाला असता, तर वसुलीच्या प्रक्रियेला अडथळा आला असता. त्यामुळे त्याबाबतचे पथ्य पदाधिकारी व प्रशासनाने पाळले आहे.