शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

थकबाकी वसुलीचा सुपरफास्ट पंधरवडा : जिल्हा बँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 01:09 IST

सांगली : चालू आर्थिक वर्ष संपण्यास केवळ पंधरवडाच हाती असल्याने जिल्हा बँक प्रशासनाची पळापळ सुरू झाली आहे. बड्या दहा थकबाकीदारांकडून कर्जवसुलीस प्रतिसाद मिळत असल्याने मार्चअखेर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने गेल्या दोन वर्षापासून शासनाच्या अनेक अडचणींचे बांध तोडून सक्षमतेने कारभार केला आहे. नफ्याच्या आकडेवारीत घट ...

ठळक मुद्देबड्या दहा थकबाकीदारांकडून प्रतिसादाची चिन्हे, नोटिसा बजावताना दुजाभाव टाळला, सर्वांनाच समान न्याय

सांगली : चालू आर्थिक वर्ष संपण्यास केवळ पंधरवडाच हाती असल्याने जिल्हा बँक प्रशासनाची पळापळ सुरू झाली आहे. बड्या दहा थकबाकीदारांकडून कर्जवसुलीस प्रतिसाद मिळत असल्याने मार्चअखेर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने गेल्या दोन वर्षापासून शासनाच्या अनेक अडचणींचे बांध तोडून सक्षमतेने कारभार केला आहे. नफ्याच्या आकडेवारीत घट झाली असली तरी, बँकेच्या कारभारावर त्याचा कुठेही परिणाम झालेला नाही. जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी शंभर कोटी नफ्याचे उद्दिष्ट दिले होते. त्याचवर्षी नोटाबंदीचा निर्णय झाला आणि रिझर्व्ह बँकेमार्फत जिल्हा बँकेची कोंडी सुरू झाली. यावर मात करीत जिल्हा बँकेने नफ्याची समाधानकारक आकडेवारी गाठली. चालू आर्थिक वर्षातही बँकेला समाधानकारक आकडा गाठता येईल, अशी परिस्थिती आहे. त्यासाठीच प्रशासनाने आता गतीने वसुलीसाठी पावले उचलली आहेत.

बड्या वीस थकबाकीदारांना नोटिसा बजावल्यानंतर यातील काही थकबाकीदारांनी पैसे जमा केले आहेत. आता बड्या थकबाकीदारांतील पहिल्या दहा संस्थांकडील थकबाकी वसुलीबाबत कडक धोरण बँक प्रशासनाने स्वीकारले आहे. या संस्थांनीही ३१ मार्चपूर्वी थकबाकी भरण्याचे मान्य केल्याचे समजते. त्यामुळे ३१ मार्चपूर्वीच या संस्थांची वसुली करून नफ्याचा अपेक्षित आकडा गाठण्याचा प्रयत्न दिसत आहे. वर्षभरात बँकेच्या एनपीए (नॉन परफॉर्मिंग असेटस्)मध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. हा एनपीएसुद्धा कमी करण्याचे आव्हान बँकेसमोर आहे.बँकेच्या संचालक मंडळाने गेल्या तीन वर्षात चांगला कारभार केला आहे. आर्थिक सक्षमता टिकविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. त्यामुळेच पदाधिकारी, संचालकांकडूनही वसुलीचा आढावा घेतला जात आहे.कारवाईत : पारदर्शीपणाजिल्हा बँकेने कर्ज देताना आणि वसुलीवेळी दुजाभाव टाळला आहे. थकबाकी असलेल्या संस्थांना नोटिसा बजावताना सर्वांनाच समान न्याय दर्शविला. त्यामुळे बँकेतील वातावरण सध्या चांगले आहे. अन्यथा कारवाईत दुजाभाव झाला असता, तर वसुलीच्या प्रक्रियेला अडथळा आला असता. त्यामुळे त्याबाबतचे पथ्य पदाधिकारी व प्रशासनाने पाळले आहे.