शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
7
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
8
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
9
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
10
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
11
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
12
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
13
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
14
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
15
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
16
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
17
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
18
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
19
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
20
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!

सांगलीत अक्षय तृतीयेस खरेदीला सोनेरी झळाळी

By admin | Updated: April 29, 2017 00:05 IST

१५ कोटींची उलाढाल : सोने, वाहन, इलेक्ट्रॉनिक्ससाठी झुंबड

सांगली : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने, वाहन, तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी शुक्रवारी ग्राहकांनी सांगलीच्या बाजारपेठेत गर्दी केली होती. सोने खरेदी करण्यासाठी तर सराफ पेढीवर रांगा लागल्या होत्या. लग्नसराईमुळे सोने खरेदीला अधिकच झळाळी आली होती. तसेच वाहनविश्वातही मोठी उलाढाल झाली असून, दोन हजाराहून अधिक दुचाकी, तर तीनशेहून अधिक चारचाकी रस्त्यावर आल्या. दरम्यान, इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्येही दोन कोटीची उलाढाल झाली. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर एक ग्रॅम का होईना, सोने खरेदी करावी, असा लोकांचा विश्वास आहे. म्हणूनच शुक्रवारी सकाळपासूनच सोने-चांदी खरेदीसाठी रांगा लागल्या होत्या. लग्नसराई सुरू असल्याने खरेदीसाठी मोठी गर्दी होती. खरेदीसाठी सराफ पेठ आणि विश्रामबाग येथे पु. ना. गाडगीळ पेढी, आर. बी. भोसले ज्वेलर्ससह सर्वच सराफ पेढीवर गर्दी होती. शुक्रवारी दिवसभरात सरासरी २९ हजार २०० रुपये सोने दहा ग्रॅमचा दर राहिला, तर चांदीचा सरासरी दर ४० हजार ८०० रुपये किलोस होता. सोन्यात नेकलेस, चेन, गंठण, मंगळसूत्र, कानातले टॉप्स खरेदीसाठी अधिक ओढा होता. एक ग्रॅमच्या दागिन्यांनाही चांगलीच मागणी होती. दुचाकी विश्वात गतवर्षीच्या तुलनेत १० ते १५ टक्के वाढ झाली होती. विविध कंपन्यांच्या दुचाकींंना चांगली मागणी होती. जास्त मायलेज देण्याऱ्या वाहनांना पसंती होती. तरुणाईत हेवी वेट आणि स्टायलिश दुचाकी खेरदी केल्या जात होत्या. दोन हजाराहून अधिक दुचाकी अक्षय तृतीयेला रस्त्यावर आल्या. इलेक्ट्रॉनिक कंपन्यांकडून सुलभ हप्त्यांची उपलब्ध केलेली सोय व पर्यायही उपलब्ध असल्याने शहरातील इलेक्ट्रॉनिक दुकानात ग्राहकांनी गर्दी केली होती. इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये मोबाईल, पंखे, फ्रीज, कुलर, एसी, एलईडी टीव्ही, होम थिएटर खरेदीसाठी झुंबड उडाली होती. फर्निचर बाजारातही चांगली उलाढाल झाली. त्याचा लाभ उठवत ग्राहकांनी खरेदी केली. स्क्रॅच कार्ड, भेटवस्तू आणि त्वरित कर्जपुरवठा, १० ते ३० टक्क्यांपर्यंत सूट या सुविधेमुळे केवळ विंडो शॉपिंग करण्यासाठी आलेल्या ग्राहकांनीही खरेदी केली. चारचाकी खरेदीलाही समाधानकारक प्रतिसाद मिळाला. गेल्या काही वर्षापासून शेतीसाठी लागणारे छोटे ट्रॅक्टर्स व अवजारांच्या खरेदीला शेतकरी वर्ग प्राधान्य देत आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत या छोट्या वाहनांचीही चांगली विक्री झाली. अक्षय तृतीयेच्या सणादिवशी सोने खरेदीबरोबरच आंबा खरेदीलाही विशेष महत्त्व असते. आमरस-पोळीचा बेत घरोघरी केला जातो. त्यामुळे गुरूवारपासूनच शहरात ठिकठिकाणी आंबे खरेदीसाठी गर्दी दिसून येत होती. सांगली-मिरज रोड, कॉलेज कॉर्नरसह शहराच्या विविध भागात फळे विक्रेत्यांनी आंबा विक्रीसाठी खास स्टॉल उभारले होते. रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, कर्नाटक आणि रत्नागिरी पायरी आंब्याला मागणी होती.पाडव्याप्रमाणे अक्षय तृतीयेलाही घर खरेदीचे स्वप्न सत्यात उतरत असते. शुक्रवारी काहींनी या मुहूर्तावर फ्लॅटचे बुकिंग केले, तर अनेक बिल्डरांकडे फ्लॅटबाबत विचारणा होत होती. नोटाबंदीनंतर जमीन, घर खरेदीच्या व्यवहारावर मंदीचे सावट आले आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर फ्लॅट, प्लॉट व्यवसायात थोडीफार हालचाल जाणवली. ही दिलासादायक बाब आहे. आणखी काही दिवसांत जमीन, घर खरेदीच्या व्यवहारात आशादायक चित्र दिसेल, असे बांधकाम व्यावसायिक दीपक सरडे यांनी सांगितले. एकूणच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सांगलीतील बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी होती. वाहन, सोने-चांदी, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीतून १५ कोटीची उलाढाल झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पाडव्यानंतर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सांगलीकरांनी मनसोक्त खरेदीचा आनंद लुटला (प्रतिनिधी) दुचाकी खरेदी : ग्राहकांचा प्रतिसाद३१ मार्चला दुचाकी कंपन्यांकडून बीएस ३ मानांकनाच्या वाहनांची, मोठी सूट देऊन विक्री करण्यात आली होती. त्यामुळे अवघ्या पंधरवड्यात आलेल्या अक्षय तृतीयेला वाहन खरेदी मोठ्या प्रमाणात होणार का? याबाबत दुचाकी वाहन वितरकांमध्ये शंका होती. पण शुक्रवारी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दुचाकी खरेदीला ग्राहकांनी उदंड प्रतिसाद दिला. तारळेकर, ट्रायकलर होंडा, पट्टणशेट्टी होंडा, मिलेनियम होंडासह सर्व शोरूममध्ये दिवसभर गर्दी होती. गतवर्षीच्या अक्षय तृतीयेच्या तुलनेत यावर्षी दुचाकी विक्रीत दहा ते बारा टक्के वाढ झाल्याचे श्रीकांत तारळेकर यांनी सांगितले. ‘चारचाकी’लाही मागणीनोटाबंदी, मंदीच्या काळातही चारचाकी वाहन खरेदीला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सर्वच वाहन विक्रेत्यांकडे खरेदीसाठी गर्दी होती. जवळपास तीनशेहून अधिक चारचाकी वाहनांची विक्री झाल्याचा अंदाज आहे. त्यातून चार ते पाच कोटीची उलाढाल एकट्या चारचाकी वाहन विक्रीतून झाल्याचे सांगण्यात आले.