शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

सलगरे, चाबुकस्वारवाडी ‘म्हैसाळ’च्या प्रतीक्षेत

By admin | Updated: May 25, 2015 00:28 IST

३०० हेक्टर पिके संकटात : पाणी सोडण्याबाबत अधिकाऱ्यांची उदासीनता; लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष

दादा खोत - सलगरे -सलगरे व चाबुकस्वारवाडी ही मिरज पूर्व भागातील शेवटची गावे. म्हैसाळ योजनेच्या पाणी क्षेत्रात या गावांचे जवळजवळ ८० टक्के क्षेत्र पाण्याखाली आहे. सलगरे-चाबुकस्वारवाडी ओढ्यामधून या चार वर्षांपासून पाणी सोडल्याने सुमारे ३०० हेक्टर क्षेत्र ‘म्हैसाळ’च्या लाभक्षेत्रात आले आहे. पंपगृह सुरू होऊन महिना उलटून गेला तरी सलगरे, चाबुकस्वारवाडीत पाणी मिळालेले नाही.ओढ्याला पाणी सोडल्याने चार किलोमीटर ओढ्याच्या परिसरामध्ये ऊसशेती व द्राक्षशेती, भाजीपाला लागवड आदी पिकांचे क्षेत्र वाढले. साहजिकच नैसर्गिकरित्या ओढ्याचा वापर ‘म्हैसाळ’च्या पाणी वहनासाठी झाला. या परिसरामध्ये ओढ्याला बंधारे आदी जलसिंचनाची कामे झाली. सर्वांत जास्त विहिरींची संख्या ही याच पट्ट्यात आहे. त्यामुळे या ओढ्याला ‘म्हैसाळ’चे पाणी येणार, या आशेने लाखो रुपयांची गुंतवणूक शेतकऱ्यांनी या लाभक्षेत्रामध्ये केली. परंतु पाणी सोडून महिना लोटला तरी या चार किलोमीटर नैसर्गिक परिस्थिती असलेल्या व बागायत क्षेत्र असलेल्या भागाला अजूनही क्षमतेने पाणी सोडले नसल्याने, या परिसरातील ऊसशेती, द्राक्षशेती व भाजीपाला शेती ही पिके संकटात आली आहे, तर काहींच्या उसाला त्याचा फटका बसला आहे.ओढ्यातून पाणी सोडण्यासाठी गेट क्र. १ व २ मधून पाणी सोडल्यास या लाभक्षेत्रातील ४०० हेक्टरपर्यंतचे क्षेत्र पाण्याखाली येते. परंतु हे क्षेत्र सलगरे लाभक्षेत्रांतर्गत असल्याने या गेटमधून पाणी सोडता येणार नाही, अशी अधिकाऱ्यांची भूमिका आहे. या लाभक्षेत्राला पाणी सोडण्यासाठी वारंवार मागणी अर्जाचे कारण पुढे करून पाणी सोडण्यास टाळाटाळ केली आहे. अगोदरच अवकाळी व हवामानाच्या दृष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्याला या कृत्रिम पाणीटंचाई व मागणी अर्जाशिवाय पाणी नाही, या अधिकाऱ्यांच्या धोरणाचा सामना करण्याची वेळ आली आहे. दरम्यान, काही शेतकऱ्यांनी मागणी अर्ज भरले आहेत. ऊसशेती व द्राक्षबागा वाचविण्यासाठी कूपनलिकांचा आधार शेतकरी घेत आहेत. परंतु भीषण पाणीटंचाईने पाणी पातळीच खालावली असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.भीषण पाणीटंचाईसंदर्भात ‘म्हैसाळ’च्या एका अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता, आवर्तन मे महिन्यापर्यंत असल्याचे सांगत पाणी जतपर्यंत जाणार असून, मेमध्ये पाणी सोडले जाईल, असे त्याने सांगितले. पिके वाया गेल्यानंतर पाणी कशासाठी सोडणार? असा संतप्त सवाल शेतकरी करीत आहेत.५० टक्के शेतकऱ्यांनी पाणी अर्ज भरल्याशिवाय पाणी सोडले जाणार नाही. शेतकऱ्यांनी मागणी अर्ज भरुन आॅफिसला सादर करावेत. ५० टक्के मागणी अर्जाची अट पूर्ण झाल्यानंतर पाणी सोडण्याची तयारी केली जाईल.- एस. डी. बावचेकर,सहायक अभियंता