शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

जतमध्ये विवाहितेची मुलासह विहिरीत आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 23:53 IST

जत : तालुक्यातील अमृतवाडी येथील प्रियांका रामचंद्र बाबर (वय २८) हिने आपला मुलगा अशिष (४ वर्षे) याला पोटाशी बांधून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान घडली. कौटुंबिक वादातून या विवाहितेने आत्महत्या केल्याची चर्चा सुरू आहे.याप्रकरणी मृत प्रियांकाचा पती रामचंद्र सुखदेव बाबर यांनी जत पोलिसांत ...

जत : तालुक्यातील अमृतवाडी येथील प्रियांका रामचंद्र बाबर (वय २८) हिने आपला मुलगा अशिष (४ वर्षे) याला पोटाशी बांधून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान घडली. कौटुंबिक वादातून या विवाहितेने आत्महत्या केल्याची चर्चा सुरू आहे.याप्रकरणी मृत प्रियांकाचा पती रामचंद्र सुखदेव बाबर यांनी जत पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. रामचंद्र व प्रियांका यांचा दहा वर्षांपूर्वी विवाह झाला. प्रियांका यांचे माहेर देसारहट्टी (ता. अथणी) येथील आहे. लग्नानंतर त्यांना ऐश्वर्या (७ वर्षे) व अशिष ही दोन मुले झाली. शनिवारी प्रियांका व रामचंद्र यांच्यात वाद झाला होता. त्यामुळे रागाच्या भरात मुलगा अशिष याला घेऊन ती घराबाहेर पडली होती. त्यानंतर काही अंतरावर कृष्णा बाबर यांच्या विहिरीजवळ येऊन, अशिष याला पोटाशी बांधून तिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.पाण्याचा उपसा करुन मृतदेह काढलेप्रियांका घरातून बेपत्ता झाल्यानंतर पती रामचंद्र, सासरा सुखदेव व सासू अंबूबाई हे दोघांचा सर्वत्र शोध घेत होते. रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान त्यांना विहिरीच्या काठावर प्रियांकाचे चप्पल दिसून आले. त्यानंतर या घटनेची माहिती त्यांनी जत पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक आर. ए. ताशिलदार व सहकारी कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.ही विहीर ८० फूट खोल असून विहिरीत सुमारे २७ फूट पाणी आहे. विहिरीला पायºया नाहीत. गावात भारनियमन असल्यामुळे वीज पुरवठा बंद होता. रात्री उशिरा वीज पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर दोन विद्युत मोटारींद्वारे विहिरीतील पाणी रात्रभर उपसण्यात आले. त्यानंतर रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान दोन्ही मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले.प्रियांकाचे पती रामचंद्र हे शेतकरी आहेत. अमृतवाडी गावापासून पूर्व बाजूस सुमारे एक किलोमीटर अंतरावर बाबर वस्ती परिसरात त्यांची शेतजमीन आहे. शेतातच घर बांधून सासू, सासरा, पती व मुले सर्वजण एकत्रितपणे राहतात. मोठी मुलगी ऐश्वर्या सांगली येथील रामचंद्र यांच्या बहिणीकडे असते.