शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

सुहास बाबर यांच्याकडे ‘कृषी, पशुसंवर्धन’च

By admin | Updated: April 20, 2017 00:11 IST

जिल्हा परिषद : राजमानेंकडे बांधकाम-अर्थ; तम्मणगौंडा रवी यांना शिक्षण, आरोग्य समिती

सांगली : जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन समित्यांचे सभापतीपद देण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. सभापती अरुण राजमाने यांच्याकडे बांधकाम-अर्थ, तर सभापती तम्मणगौंडा रवी यांच्याकडे शिक्षण व आरोग्य समित्या देण्याचा निर्णय भाजप आणि मित्रपक्षांच्या बैठकीत झाला. गुरुवारी सभापती आणि सदस्यांना समित्यांचे वाटप करण्यासाठी दुपारी एक वाजता विशेष सभा होणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला ३४, तर भाजपला ४९ समित्यांचे वाटप करण्यावरही एकमत झाले आहे.गुरुवारी सर्वसाधारण सभेत विषय समितींच्या दोन सभापतींना समितींचे वाटप आणि दहा समित्यांवर सदस्यांची निवड होणार आहे. निवडी बिनविरोध होण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे २६ सदस्य आणि ३ सभापती असे २९ संख्याबळ होते. त्यांच्याकडून ३४-४९ जागांचा फॉर्म्युला सादर करण्यात आला होता. भाजप-आघाडीकडे ३६ सदस्यांचे बळ आहे. त्यांना सूत्रांनुसार ४९ जागा मिळणार आहेत. मात्र स्थायी आणि अर्थ समितीसाठी शेवटपर्यंत रस्सीखेच सुरू होती. विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीचा ३४ जागांचा फॉर्म्युला सत्ताधाऱ्यांनी अमान्य केला. ३४ जागांबाबत तडजोड करावी लागेल, असे संकेत भाजपने दिले आहेत. सत्ताधारी भाजप आघाडीत शिवसेना, रयत विकास आघाडी, स्वाभिमानी विकास आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा समावेश आहे. आघाडीतील सदस्यांनी दोन समितींवर नियुक्तीचा रेटा लावला आहे. त्यामुळे सदस्यांची नियुक्ती करण्यात सत्ताधारी भाजपला तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र त्याबाबतची अधिकृत घोषणा निवडीपूर्वी जाहीर केली जाणार आहे. भाजपचा प्रस्ताव विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीने स्वीकारल्यास विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी संग्रामसिंह देशमुख, तर उपाध्यक्षपदी सुहास बाबर यांची वर्णी लागली, तर ब्रह्मदेव पडळकर यांना समाजकल्याण व प्रा. सुषमा नायकवडी यांना महिला बालकल्याण विभागाचे सभापतीपद मिळाले. अरुण राजमाने आणि तम्मणगौडा रवी यांचीही सभापतीपदी वर्णी लागली असली तरी त्यांना खाते मिळालेले नाही. उपाध्यक्ष बाबर यांना कृषी व पशुसंवर्धन विभाग निश्चित झाले आहेत, मात्र या खात्यांबाबत ते समाधानी नसल्याने मुंबईत शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांची भाजप नेत्यांकडून मनधरणी करण्यात आली. राजमाने यांना बांधकाम आणि अर्थ, तर रवी यांच्याकडे शिक्षण व आरोग्य विभागाचे खाते दिले जाणार आहे. तिन्ही पदाधिकाऱ्यांच्या खात्यांमध्येही बदल करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत चर्चा सुरू होती. त्यामुळे बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अंतिम निर्णय सभेपूर्वी जाहीर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा परिषदेत स्थायी, जलसंधारण, अर्थ, शिक्षण, बांधकाम, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, समाजकल्याण, महिला व बालकल्याण अशा दहा समित्या आहेत. स्थायी समितीला अधिक महत्त्व आहे. अर्थ, शिक्षण, बांधकाम, आरोग्य, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण या सहा समित्यांमध्ये प्रत्येकी आठ सदस्य निवडून दिले जातात. कृषी समितीत १० सदस्य, तर समाजकल्याण समितीत ११ सदस्य निवडून द्यायचे आहेत. समाजकल्याण समितीत अनुसूचित जातीमधील ५ अणि नागरिकांच्या मागास प्रवर्गातील ४ सदस्य आवश्यक आहेत. सर्वसाधारण प्रवर्गातून निवडून आलेले १९ सदस्य, सर्वसाधारण महिला प्रवर्गातून १८ सदस्या आहेत. अनुसूचित जातीचे ७ सदस्य आहेत. नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे १६ सदस्य आहेत. एकोणीस सदस्यांना दोन समितीत सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. पंचेचाळीस सदस्यांना एकाच समितीत संधी मिळणार आहे, दोन समित्यांसाठी काही सदस्यांनी नेत्यांकडे फिल्डिंग लावली होती. (प्रतिनिधी)निवडणुकांची वेळ येणार नाही : देशमुखजिल्हा परिषदेच्या चार सभापतींच्या निवडी बिनविरोध करण्यात भाजपला यश आले होते. त्याच धर्तीवर काँग्रेस व राष्ट्रवादीशी समित्या वाटपातही समझोता करून सर्व निवडी बिनविरोध होतील. निवडणुका घेण्याची वेळ येणार नाही, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी दिली.