शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
3
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
4
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
5
रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
6
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
7
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
8
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
9
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
10
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
11
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
12
२०२७ पर्यंत युनायटेड अमेरिकेचं विभाजन? ट्रम्प ठरणार USAचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष! मोठे भाकित...
13
मराठी अभिनेत्रीचं "न्यूड" फोटोशूट; सौंदर्य पाहून चाहते प्रेमात, करत आहेत कौतुक
14
नवरात्री २०२५: १२५ वर्ष जुने कोकणातले पंचमुखी गायत्री मंदिर पाहिले का? मंत्रमुग्ध करणारी मूर्ती आणि इतिहास 
15
अश्विनची लवकरच क्रिकेटमध्ये नवी इनिंग; आता पाकिस्तानी क्रिकेटरसोबत एकाच संघात खेळणार!
16
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
17
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
18
15 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; Volvo कार जप्त
19
Volvo EX30: एका चार्जवर ४८० किमी धावणार; वोल्वोची बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च!
20
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार

सुहास बाबर यांचा ‘एक मुक्काम गावकºयांसोबत!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 00:45 IST

विटा : पाच वर्षातून एकदा केवळ मते मागण्यापुरते गावात न जाता, त्या-त्या गावातच मुक्काम करून त्यांचे प्रश्न समजून घेत ते सोडवण्यासाठी

ठळक मुद्दे अभिनव उपक्रम : दर पंधरा दिवसांतून एका गावात थांबणार; गावातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नग्रामपंचायतीने स्वच्छता अभियान आणि नांदेड पॅटर्न शोषखड्डे याबाबत आग्रही राहण्याच्या सूचना केल्या.

विटा : पाच वर्षातून एकदा केवळ मते मागण्यापुरते गावात न जाता, त्या-त्या गावातच मुक्काम करून त्यांचे प्रश्न समजून घेत ते सोडवण्यासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी खानापूर तालुक्यात ‘एक मुक्काम गावकºयांसोबत’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. याची सुरूवात रेणावी येथून करण्यात आली. उपाध्यक्ष बाबर दर पंधरा दिवसांनी तालुक्यातील एक गाव निवडून तेथे रात्रीचा मुक्काम करणार असून समस्या सोडविण्याचे काम करणार आहेत.

प्रत्येक खेडेगावातील लोकांना समस्या मांडण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी येता येईलच असे नाही. त्यासाठी सर्वसामान्यांनी आपल्याकडे येण्याऐवजी आपणच त्यांच्या गावात एक रात्र मुक्काम करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, तर त्याची वास्तवता समजून येईल, या उद्देशाने बाबर यांनी हा उपक्रम सुरू केला आहे.

या उपक्रमांतर्गत बाबर यांनी रेणावी येथे पहिला मुक्काम केला. यावेळी त्यांनी प्राथमिक शाळेची पाहणी करीत शाळांचा परिसर, दर्जा, उपलब्ध सुविधा, गुणात्मक परिस्थिती यासह विविध ग्रामस्थांचे विविध प्रश्न समजावून घेतले. या बैठकीला गट-तट विसरून सर्व रेणावीकर ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी बससेवा, अंगणवाडी, दलित वस्ती, समाजमंदिर, रेशन धान्य याबाबतचे विविध प्रश्न मांडले. त्यानंतर बाबर यांनी प्रत्येक प्रभागात जाऊन रस्ते, गटारी, दिवाबत्ती, घरकुल, नाईक समाजाचे समाजमंदिर, मुस्लिम दफनभूमी आदी कामांची पाहणी करून ग्रामपंचायतीने स्वच्छता अभियान आणि नांदेड पॅटर्न शोषखड्डे याबाबत आग्रही राहण्याच्या सूचना केल्या.

बाबर यांनी रेणावी गावात मुक्काम करून दुसºयादिवशी सकाळी ते बसस्थानकावर आले. यावेळी विटा येथे शाळेला येण्यासाठी थांबलेल्या विद्यार्थ्यांशी त्यांनी चर्चा केली. या वेळेत दोन एसटी बसेस गेल्या. पण त्या थांबल्या नाहीत. त्यामुळे बाबर यांनी तातडीने विटा आगाराशी संपर्क साधून, बस थांबविण्याच्या सूचना दिल्या.विलक्षण व सुखद अनुभव...अनेकदा सामान्य जनता आमच्यापर्यंत पोहोचू शकत नसल्याने गावातील प्रश्नांची वास्तवता समजत नाही. त्यामुळे आपणच स्वत: गावात जाऊन प्रत्येकांशी संवाद साधावा, या उद्देशाने ‘एक मुक्काम गावकºयांसोबत’ हा उपक्रम हाती घेतला आहे. हा अनुभव विलक्षण व सुखद आहे. जनतेचे प्रश्न व समस्या समजून घेता आल्या. जनतेचे प्रश्न व समस्यांचा निपटारा करण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचे मत उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी यावेळी व्यक्त केले.