शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
4
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
5
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
6
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
7
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
8
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
9
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
10
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
11
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
12
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
13
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
14
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
15
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
16
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
17
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
18
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
19
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
20
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

ग्रामस्वच्छता अभियानास स्थगिती हे महाराष्ट्राचे दुर्दैव

By admin | Updated: February 11, 2016 00:32 IST

स्मिता पाटील : प्रसंगी राज्यभर आंदोलन करू

सांगली : संत गाडगेबाबा यांच्या नावाने आर. आर. पाटील आबांनी सुरू केलेल्या ग्रामस्वच्छता अभियानाला स्थगिती देण्याचा राज्य शासनाचा निर्णय म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशी टीका आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी बुधवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केली. त्या म्हणाल्या की, स्वत: हातात झाडू घेऊन ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला स्वच्छतेचा संदेश दिला, त्या संत गाडगेबाबा महाराजांच्या नावे सुरू झालेली ग्रामस्वच्छता योजना युनोपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या योजनेचा सन्मान झाला, ती योजना केवळ राजकीय हेतूने बंद करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. स्थगितीच्या निर्णयामागे निश्चितच राजकारण आहे. नंतर ही योजनाच रद्द करण्याचा हेतूही दिसून येतो. शासनाने ही योजना बदलून दुसऱ्या नावाने आणण्याच्या हालचाली सुरू केल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे संत गाडगेबाबांच्याच नावाला या सरकारचा विरोध आहे का?महाराष्ट्राची ओळख पुरोगामी राज्य म्हणून केली जाते. त्यामुळे अशा पुरोगामी राज्यात अशापद्धतीचे नावांच्या बदलाचे राजकारण करणे, तसेच चांगल्या योजना राजकीय हेतूने बंद करणे अयोग्य आहे. पंतप्रधानांनी राष्ट्राला स्वच्छ भारत अभियानातून स्वच्छतेचा संदेश दिला असताना, त्यांच्याच पक्षाचे राज्यातील सरकार स्वच्छता अभियानाला स्थगिती देत आहे, हा प्रचंड मोठा विरोधाभास आहे. आम्ही या गोष्टीला विरोध करू. प्रसंगी राज्यभर याप्रश्नी आंदोलन करावे लागले तरी, आम्ही त्यासाठी तयार आहोत. राष्ट्रवादीने आबांच्या अनेक चांगल्या धोरणांना, निर्णयांना पाठबळ दिले होते. त्यामुळे याप्रश्नीही पक्षाचे मला निश्चितपणे पाठबळ असेल. पक्षश्रेष्ठींशीही याबाबत चर्चा केली आहे, असे त्या म्हणाल्या.यावेळी ताजुद्दीन तांबोळी, योगेंद्र थोरात उपस्थित होते. (प्रतिनिधी)शिवरायांच्या नावेही राजकारणतासगावातील नगरपालिकेच्या व्यापारी संकुलास आबांच्या प्रयत्नातून निधी मिळाला होता. त्यामुळे आम्ही आबांचे नाव संकुलाला देण्याचा निर्णय घेतला होता. छत्रपती शिवरायांबद्दल सर्वांनाच आदर आहे, पण त्यांच्या नावाचा वापर राजकारणासाठी करणे चुकीचे आहे, असे मत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.