शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
4
संतापलेले भारतीय तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकिस्तानला मदत करणारे इन्कम गमावून बसणार
5
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
6
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
7
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
8
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
9
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
10
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
11
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
12
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
13
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
14
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले
15
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
16
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
17
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
18
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
19
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
20
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...

सुंदोपसुंदीने तासगावात राष्ट्रवादीला धक्का

By admin | Updated: May 8, 2015 00:18 IST

जिल्हा बँक निवडणूक : काँग्रेसला लॉटरी; तालुक्यातील भाजपची भूमिका संशयास्पद

दत्ता पाटील - इस्लामपूर -जिल्हा बँक निवडणुकीत तासगाव तालुक्यात सोसायटी गटात स्पष्ट बहुमत असतानादेखील राष्ट्रवादीवर पराभवाची मोठी नामुष्की ओढवली आहे. पक्षांतर्गत नाराजी आणि सुंदोपसुंदीने राष्ट्रवादीला धक्का बसला असून एकत्रितपणे निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या भाजपची भूमिकादेखील संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे. या कलहाचा काँग्रेसला मात्र चांगलाच लाभ झाला असून, तुटपुंजे मतदान असतानादेखील त्यांना विजयाची लॉटरी लागली आहे.माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर, तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेतेही पहिल्यांदाच जिल्हा बँकेसारख्या सहकारी संस्थेच्या निवडणुकीला सामोरे जात होते. मात्र उमेदवारी वाटपातूनच राष्ट्रवादीतील प्रमुख कार्यकर्त्यांनी नाराजीचा सूर आळवला.काहींनी उघड, तर काहींनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली होती. आर. आर. पाटील असते, तर असे झाले नसते, असाच सूर बहुतांश कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत होता. ज्येष्ठ कार्यकर्त्यांना डावलून सतीश पवार या दुसऱ्या फळीतील तरुण कार्यकर्त्याला सोसायटी गटातून पहिल्यांदाच संधी देण्यात आली होती. भाजप आणि राष्ट्रवादी एकत्रितपणे शेतकरी सहकारी पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवत होते. तालुक्यात काँग्रेसची ताकद नगण्य असल्यामुळे, तसेच बहुतांश सोसायट्यांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्यामुळे सतीश पवार यांचा विजय निश्चित मानला जात होता. एवढेच नव्हे, तर जिल्हा बँकेच्या निवडणुकीची चर्चा होत असताना, तासगाव सोसायटी गटातून पवार यांचा पराभव होईल, असे कोणत्याच दिग्गज नेत्याला वाटत नव्हते. किंबहुना इथला निकाल एकतर्फीच होणार, असे चित्र दिसत होते. मात्र राष्ट्रवादीत उमेदवारी डावलल्यामुळे झालेले नाराजीचे नाट्य, खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात समावेश असणाऱ्या मांजर्डे, विसापूर सर्कलमध्ये नेत्यांच्या झालेल्या तहाच्या घडामोडी, ज्येष्ठ नेत्यांची नाराजी, आर. आर. पाटील यांच्या माघारी कार्यकर्त्यांची मोळी टिकवून ठेवण्यात नेतृत्वाला आलेले अपयश, भाजपकडून झालेला दगाफटका या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादीला धक्कादायक निकालाला सामोरे जावे लागले. त्यामुळेच स्पष्ट बहुमत असतानादेखील राष्ट्रवादीला हक्काची जागा गमवावी लागली आहे.हा पराभव तालुक्याच्या भविष्यातील राजकारणाची नवी नांदी ठरणार, हे निश्चित. दुसरीकडे राष्ट्रवादीतील सुंदोपसुंदीचा फायदा घेत केवळ चार सोसायट्यांवर वर्चस्व असणाऱ्या काँग्रेसचे उमेदवार डॉ. प्रताप पाटील यांनी ४१ मते मिळवत विजय पदरात पाडून घेतला.निवडणुकीत जय-पराजय हा ठरलेलाच असतो. पण जिल्ह्यात परिस्थिती अनुकूल असताना तालुक्याच्या हक्काच्या जागेवर पराभव पत्करावा लागतो, त्याची खंत आहे. याचे आत्मचिंंतन करुन सर्वांना विश्वासात घेऊन भविष्यात आवश्यक त्या दुरुस्तीसह वाटचाल करुन पक्ष बळकट केला जाईल.- आमदार सुमनताई पाटील