शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ऊस तोडीला अवकाळी पावसाचे ग्रहण

By admin | Updated: November 17, 2014 23:21 IST

कृष्णाकाठची स्थिती : किमान महिनाभर ऊस तोडी लांबणार

निवास पवार - शिरटे -विधानसभा निवडणूक, ऊस तोड कामगारांचे आंदोलन यामुळे २0१४—१५ चा गळीत हंगाम आधीच उशिरा सुरु झाला. त्यातच आता अवकाळी पावसाची भर पडली आहे. या अवकाळी पावसामुळे कृष्णा नदीकाठावरील गावांमध्ये किमान महिनाभर तरी ऊस तोड होऊ शकत नाही. याचा फटका शेतकरी वर्गाला बसणार आहे. एकूणच या पावसाचे ऊस तोडीला ग्रहण लागल्याची भावना शेतकरी वर्गातून आहे.नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात कृष्णाकाठावरील काही कारखान्यांनी गळीत हंगामास सुरुवात केली. ऊस तोडीही सुरु झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. यावर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाशिवाय गळीत हंगाम सुरू झाल्याने कारखानदारांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला होता. परंतु शेतकरी आणि कारखानदारांचा आनंद निसर्गाला मान्य नसावा, म्हणूनच की काय, गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सध्या कृष्णा नदीकाठावरील सर्व ऊस तोडी पूर्णपणे बंद करण्यात आल्या असून, अजून किमान महिनाभर तरी ऊस तोडता येणार नाही. यामुळे यंदाही गळीत हंगाम लांबण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.दरवर्षी आॅक्टोबर महिन्यात ऊस तोडणीचा कार्यक्रम सुरु होतो. नोव्हेंबर, डिसेंबरअखेर अनेक शेतकऱ्यांचा ऊस तुटून जातो. ऊस गेल्यानंतर अनेक शेतकरी त्यामध्ये गहू अथवा इतर पिके घेत असतो. परंतु गेल्या तीन ते चार वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दरासाठीच्या आंदोलनामुळे गळीत हंगाम लांबणीवर पडत गेला. यावर्षी संघटनेचे आंदोलन नसले तरी विधानसभा निवडणूक, ऊस तोडणी कामगारांचे काम बंद आंदोलन व आता अवकाळी पाऊस यामुळे याहीवर्षी हंगाम किमान दोन महिने लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.य. मो. कृष्णा सह. साखर कारखान्याचा अपवाद वगळता कृष्णाकाठावरील सर्वच कारखान्यांनी गळीत हंगामास सुरुवात केली आहे. ऊस तोड सुरु झाली आणि लगेचच अवकाळी पावसाचे थैमान सुरु झाल्याने काही ऊस तोडी निम्म्यावरच थांबवण्यात आल्या आहेत. आता तरी पावसाने विश्रांती घ्यावी, अशीच प्रार्थना करताना शेतकरी वर्ग दिसत आहे.माळरानाला कमी फटका..!ज्या शेतकऱ्यांची ऊसशेती माळरानावर आहे, त्यांना या पावसाचा फारसा फरक पडत नाही. पाऊस पडून गेल्यानंतर दोन दिवसात पुन्हा ऊस तोडणी केली तरी चालू शकते. परंतु कृष्णाकाठावरील ऊसशेती बाराही महिने पाण्याखाली असल्याने येथे थोडा पाऊस झाला तरी ८ ते १0 दिवस उसात जाता येत नाही. गेले चार दिवस तर मुसळधार पाऊस पडल्याने किमान महिनाभर तरी तोडी घेता येणार नाहीत.