शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

‘पाटबंधारे’ची कारखानदारांना मूकसंमती : सुभाष पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 01:21 IST

विटा : गेल्या गळीत हंगामातील ही रक्कम कारखानदारांकडून वसूल करण्याचे धाडस पाटबंधारे अधिकाºयांनीही दाखविले नसल्याने कारखानदार एक वर्षापासून पाणीपट्टीचे पैसे

ठळक मुद्देपाणीपट्टीचे पैसे वर्षभरापासून वापरताहेत साखर कारखानदार शेतकºयांनी ऊस बिलातून पाणीपट्टी भरली, त्यात त्यांचा काय दोष?

विटा : गेल्या गळीत हंगामातील ही रक्कम कारखानदारांकडून वसूल करण्याचे धाडस पाटबंधारे अधिकाऱ्यांना ही दाखविले नसल्याने कारखानदार एक वर्षापासून पाणीपट्टीचे पैसे वापरत आहेत. त्यामुळे पाणीपट्टीचे पैसे वापरण्यासाठी पाटबंधारे अधिकाऱ्यांना साखर कारखानदारांना मूकसंमती दिली असल्याचा आरोप खानापूर-कडेगाव तालुका शेकापचे सरचिटणीस अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी सोमवारी विटा येथे पत्रकारांशी बोलताना केला.

अ‍ॅड. पाटील म्हणाले, कडेगाव तालुक्यातील साखर कारखान्यांनी शेतकºयांच्या ऊस बिलातून गेल्या गळीत हंगामात कपात केलेल्या ताकारी योजनेच्या पाणीपट्टीची सुमारे पावणेदोन कोटी रुपयांची रक्कम कारखानदारांनी अद्यापही पाटबंधारे खात्याकडे जमा केली नाही.

२०१६-१७ च्या गत गळीत हंगामात पाटबंधारे खात्याने क्रांती, सोनहिरा, उद्गिरी, केन अ‍ॅग्रो, ग्रीन शुगर पॉवर यासह विविध साखर कारखान्यांना ताकारी योजनेची पाणीपट्टी कपात करण्यासाठी शेतकºयांच्या नावांची यादी दिली. शेतकºयांचा ऊस गळितासाठी गेल्यानंतर अनेक कारखान्यांनी यादीप्रमाणे पाणीपट्टीची रक्कम कपात केली. त्यातील काही कारखान्यांनी पाणीपट्टीची रक्कम खात्याकडे जमा केली. परंतु, काही कारखान्यांनी पाटबंधारे विभागाकडे अद्यापही जमा केली नाही. ही रक्कम कारखानदारांकडून वसूल करण्यासाठी पाटबंधारे अधिकाºयांनीही तसदी घेतल्याचे दिसून येत नाही.

त्यामुळे ताकारी योजनेच्या वीज बिलाची थकबाकी झाल्याने वीज पुरवठा खंडीत झाला आहे. परिणामी, ताकारीचे रब्बी आवर्तन सुरू करण्यास तब्बल अडीच महिन्यांचा विलंब झाला आहे. गेल्या वर्षभरापासून पाणीपट्टीची रक्कम भरूनही शेतकºयांवर रब्बी पिके वाळवून घालविण्याची वेळ आली आहे. या सर्व प्रकाराला पाटबंधारे अधिकारी, साखर कारखानदार जबाबदार आहेत. त्यातच पाणीपट्टीची कपात करून घेतलेली रक्कम वर्षभरापासून वापरण्यास कारखानदारांना पाटबंधारे अधिकाºयांनीच मूक संमत्ती दिली असल्याचा आरोप अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी यावेळी बोलताना केला.शेतकºयांचा काय दोष?शासनाने टंचाई काळात शेतकºयांची मांगणी लक्षात घेऊन ताकारी उपसा सिंचन योजना सुरू केली. या कालावधीतील योजनेचे वीज बिल ४ कोटी रूपये आले आहे. कार्यक्षेत्रात ग्रीन पॉवर शुगरकडे ८३ लाख व केन अ‍ॅग्रोकडे ९० लाख अशी या दोन साखर कारखान्यांकडे शेतकºयांच्या बिलातून वसूल केलेली तब्बल १ कोटी ७३ लाख रूपये पाणीपट्टी जमा आहे. तरीही त्यांनी रक्कम पाटबंधारे खात्याकडे जमा केलेली नाही. राज्य सरकार व या दोन कारखान्यांनी त्यांच्याकडील ५.७५ कोटीची रक्कम भरली असती, तर ताकारी योजनेचे आवर्तन सुरू झाले असते. शेतकºयांनी ऊस बिलातून पाणीपट्टी भरली, त्यात त्यांचा काय दोष? असा सवाल अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी केला.