शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

‘पाटबंधारे’ची कारखानदारांना मूकसंमती : सुभाष पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 01:21 IST

विटा : गेल्या गळीत हंगामातील ही रक्कम कारखानदारांकडून वसूल करण्याचे धाडस पाटबंधारे अधिकाºयांनीही दाखविले नसल्याने कारखानदार एक वर्षापासून पाणीपट्टीचे पैसे

ठळक मुद्देपाणीपट्टीचे पैसे वर्षभरापासून वापरताहेत साखर कारखानदार शेतकºयांनी ऊस बिलातून पाणीपट्टी भरली, त्यात त्यांचा काय दोष?

विटा : गेल्या गळीत हंगामातील ही रक्कम कारखानदारांकडून वसूल करण्याचे धाडस पाटबंधारे अधिकाऱ्यांना ही दाखविले नसल्याने कारखानदार एक वर्षापासून पाणीपट्टीचे पैसे वापरत आहेत. त्यामुळे पाणीपट्टीचे पैसे वापरण्यासाठी पाटबंधारे अधिकाऱ्यांना साखर कारखानदारांना मूकसंमती दिली असल्याचा आरोप खानापूर-कडेगाव तालुका शेकापचे सरचिटणीस अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी सोमवारी विटा येथे पत्रकारांशी बोलताना केला.

अ‍ॅड. पाटील म्हणाले, कडेगाव तालुक्यातील साखर कारखान्यांनी शेतकºयांच्या ऊस बिलातून गेल्या गळीत हंगामात कपात केलेल्या ताकारी योजनेच्या पाणीपट्टीची सुमारे पावणेदोन कोटी रुपयांची रक्कम कारखानदारांनी अद्यापही पाटबंधारे खात्याकडे जमा केली नाही.

२०१६-१७ च्या गत गळीत हंगामात पाटबंधारे खात्याने क्रांती, सोनहिरा, उद्गिरी, केन अ‍ॅग्रो, ग्रीन शुगर पॉवर यासह विविध साखर कारखान्यांना ताकारी योजनेची पाणीपट्टी कपात करण्यासाठी शेतकºयांच्या नावांची यादी दिली. शेतकºयांचा ऊस गळितासाठी गेल्यानंतर अनेक कारखान्यांनी यादीप्रमाणे पाणीपट्टीची रक्कम कपात केली. त्यातील काही कारखान्यांनी पाणीपट्टीची रक्कम खात्याकडे जमा केली. परंतु, काही कारखान्यांनी पाटबंधारे विभागाकडे अद्यापही जमा केली नाही. ही रक्कम कारखानदारांकडून वसूल करण्यासाठी पाटबंधारे अधिकाºयांनीही तसदी घेतल्याचे दिसून येत नाही.

त्यामुळे ताकारी योजनेच्या वीज बिलाची थकबाकी झाल्याने वीज पुरवठा खंडीत झाला आहे. परिणामी, ताकारीचे रब्बी आवर्तन सुरू करण्यास तब्बल अडीच महिन्यांचा विलंब झाला आहे. गेल्या वर्षभरापासून पाणीपट्टीची रक्कम भरूनही शेतकºयांवर रब्बी पिके वाळवून घालविण्याची वेळ आली आहे. या सर्व प्रकाराला पाटबंधारे अधिकारी, साखर कारखानदार जबाबदार आहेत. त्यातच पाणीपट्टीची कपात करून घेतलेली रक्कम वर्षभरापासून वापरण्यास कारखानदारांना पाटबंधारे अधिकाºयांनीच मूक संमत्ती दिली असल्याचा आरोप अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी यावेळी बोलताना केला.शेतकºयांचा काय दोष?शासनाने टंचाई काळात शेतकºयांची मांगणी लक्षात घेऊन ताकारी उपसा सिंचन योजना सुरू केली. या कालावधीतील योजनेचे वीज बिल ४ कोटी रूपये आले आहे. कार्यक्षेत्रात ग्रीन पॉवर शुगरकडे ८३ लाख व केन अ‍ॅग्रोकडे ९० लाख अशी या दोन साखर कारखान्यांकडे शेतकºयांच्या बिलातून वसूल केलेली तब्बल १ कोटी ७३ लाख रूपये पाणीपट्टी जमा आहे. तरीही त्यांनी रक्कम पाटबंधारे खात्याकडे जमा केलेली नाही. राज्य सरकार व या दोन कारखान्यांनी त्यांच्याकडील ५.७५ कोटीची रक्कम भरली असती, तर ताकारी योजनेचे आवर्तन सुरू झाले असते. शेतकºयांनी ऊस बिलातून पाणीपट्टी भरली, त्यात त्यांचा काय दोष? असा सवाल अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी केला.