शहरं
Join us  
Trending Stories
1
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
2
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
3
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
4
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
5
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
6
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
7
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
8
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
9
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
10
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
11
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
12
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
13
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
14
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
15
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
16
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
17
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
18
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
19
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
20
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'

शिष्यवृत्तीप्रकरणी फौजदारी दाखल करा

By admin | Updated: July 5, 2014 23:56 IST

सदस्यांची मागणी : मिरज पं. स. सभेत सदस्य आक्रमक

मिरज : वड्डी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत अपहार करणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी मिरज पंचायत समितीच्या सभेत सदस्यांनी केली. रोजगार हमी योजनेच्या कामातील ग्रामसेवक दिरंगाई करीत असल्याचा आरोप करीत सभेत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. सभापती सुभाष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, उपसभापती माणिकताई चौधरी, गटविकास अधिकारी उत्तम वाघमोडे यांच्या उपस्थितीत पंचायत समितीची मासिक सभा पार पडली. वड्डी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या रकमेत अपहार करणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकांवर कोणती कारवाई केली, असा प्रश्न सदस्या राणी देवकारे यांनी विचारला. यावेळी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. शिष्यवृत्तीच्या रकमेत अपहार झाला यासाठी पंचायत समितीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. या गंभीर बाबीची दखल घेऊन शिक्षण विभागाने तातडीने कारवाई करण्याची गरज असताना कागदीघोडे नाचविण्यात येत आहेत. दोशी मुख्याध्यापक व शिक्षकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी सतीश निळकंठ, शंकर पाटील यांनी केली, तर त्या मुख्याध्यापक व शिक्षकाची तालुक्याबाहेर बदली करा, अशी मागणी आबासाहेब चव्हाण यांनी केली. शुभांगी पाटील व सारिका खताळ यांनी गुणवत्ता विकासासाठी शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येचे प्रश्न उपस्थित केले. गेल्या तीन वर्षात १३ व्या वित्त आयोगाअंतर्गत के लेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामांची समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी दिलीप बुरसे यांनी केली. पंचवीस पंधरा योजनेच्या १ कोटीचा विशेष निधी आधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे परत गेल्याचा आरोप सतीश निळकंठ यांनी केला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी एस. एस. सुतार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला मिळाला नसल्याचे सांगत आरोप फेटाळून लावला. १ कोटीचा निधी पंचायत समितीच्या बांधकाम विभागास मिळाल्याचे अभियंता पी. के. प्रदीप यांनी सांगितले. बुधगावातील अनिल दुधाप्पा होवाळे, सुदाम रघुनाथ बंडगर व मधुकर रामचंद्र पाटील या शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेतील विहिरी मंजूर आहेत. या शेतकऱ्यांना विहिरींचे निम्मे अधिक अनुदान मिळाले त्यानंतर तीन ग्रामसेवकांनी हजेरी पुस्तक न भरल्याने हे शेतकरी उर्वरीत अनुदानापासून वंचित असल्याची तक्रार सतीश निळकंठ यांनी केली. शेतकऱ्यांनी डोक्यावर कर्जाचा बोजा करुन विहिरी पूर्ण केल्या आहेत. उर्वरीत अनुदान न मिळाल्यास त्यांचे संसार उद्ध्वस्त होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ग्रामसेवकांमुळेच रोजगार हमी योजनेची कामे रखडल्याचा आरोप बाबासाहेब कांबळे यांनी केला. बुधगावच्या शेतकऱ्यांच्या विहिरीच्या अनुदानाबाबत चौकशी करुन न्याय देण्याचे ओदश गटविकास अधिकारी उत्तम वाघमोडे यांनी दिले. या बैठकीत कृषी, पशुसंवर्धन, पाणी पुरवठा, छोटे पाटबंधारे, आरोग्य व ग्रामपंचायत आदींसह सर्व विभागांचा आढावा घेण्यात आला. (वार्ताहर)