शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

शिष्यवृत्तीप्रकरणी फौजदारी दाखल करा

By admin | Updated: July 5, 2014 23:56 IST

सदस्यांची मागणी : मिरज पं. स. सभेत सदस्य आक्रमक

मिरज : वड्डी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत अपहार करणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी मिरज पंचायत समितीच्या सभेत सदस्यांनी केली. रोजगार हमी योजनेच्या कामातील ग्रामसेवक दिरंगाई करीत असल्याचा आरोप करीत सभेत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. सभापती सुभाष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, उपसभापती माणिकताई चौधरी, गटविकास अधिकारी उत्तम वाघमोडे यांच्या उपस्थितीत पंचायत समितीची मासिक सभा पार पडली. वड्डी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या रकमेत अपहार करणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकांवर कोणती कारवाई केली, असा प्रश्न सदस्या राणी देवकारे यांनी विचारला. यावेळी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. शिष्यवृत्तीच्या रकमेत अपहार झाला यासाठी पंचायत समितीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. या गंभीर बाबीची दखल घेऊन शिक्षण विभागाने तातडीने कारवाई करण्याची गरज असताना कागदीघोडे नाचविण्यात येत आहेत. दोशी मुख्याध्यापक व शिक्षकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी सतीश निळकंठ, शंकर पाटील यांनी केली, तर त्या मुख्याध्यापक व शिक्षकाची तालुक्याबाहेर बदली करा, अशी मागणी आबासाहेब चव्हाण यांनी केली. शुभांगी पाटील व सारिका खताळ यांनी गुणवत्ता विकासासाठी शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येचे प्रश्न उपस्थित केले. गेल्या तीन वर्षात १३ व्या वित्त आयोगाअंतर्गत के लेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामांची समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी दिलीप बुरसे यांनी केली. पंचवीस पंधरा योजनेच्या १ कोटीचा विशेष निधी आधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे परत गेल्याचा आरोप सतीश निळकंठ यांनी केला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी एस. एस. सुतार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला मिळाला नसल्याचे सांगत आरोप फेटाळून लावला. १ कोटीचा निधी पंचायत समितीच्या बांधकाम विभागास मिळाल्याचे अभियंता पी. के. प्रदीप यांनी सांगितले. बुधगावातील अनिल दुधाप्पा होवाळे, सुदाम रघुनाथ बंडगर व मधुकर रामचंद्र पाटील या शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेतील विहिरी मंजूर आहेत. या शेतकऱ्यांना विहिरींचे निम्मे अधिक अनुदान मिळाले त्यानंतर तीन ग्रामसेवकांनी हजेरी पुस्तक न भरल्याने हे शेतकरी उर्वरीत अनुदानापासून वंचित असल्याची तक्रार सतीश निळकंठ यांनी केली. शेतकऱ्यांनी डोक्यावर कर्जाचा बोजा करुन विहिरी पूर्ण केल्या आहेत. उर्वरीत अनुदान न मिळाल्यास त्यांचे संसार उद्ध्वस्त होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ग्रामसेवकांमुळेच रोजगार हमी योजनेची कामे रखडल्याचा आरोप बाबासाहेब कांबळे यांनी केला. बुधगावच्या शेतकऱ्यांच्या विहिरीच्या अनुदानाबाबत चौकशी करुन न्याय देण्याचे ओदश गटविकास अधिकारी उत्तम वाघमोडे यांनी दिले. या बैठकीत कृषी, पशुसंवर्धन, पाणी पुरवठा, छोटे पाटबंधारे, आरोग्य व ग्रामपंचायत आदींसह सर्व विभागांचा आढावा घेण्यात आला. (वार्ताहर)