शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

सांगलीच्या पारंपरिक गोपाळकाल्यास ‘इव्हेंट’चे स्वरुप

By admin | Updated: August 24, 2016 23:42 IST

आधुनिकतेचा रंग : दहीहंडी राहिली, कृष्ण हरवला; कृष्ण, त्याचे सवंगडी, गाय अशा सर्वच गोष्टींचे स्मरण

सांगली : दीड शतकाहून अधिक काळ चालत आलेला सांगलीतील पारंपरिक गोपाळकाला आता आधुनिकतेचे अनेक रंग लावून ‘इव्हेंट’च्या स्वरूपात समोर आला आहे. कृष्ण, त्याचे सवंगडी, गाय अशा सर्वच गोष्टींचे स्मरण करीत त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करीत साजरा होणारा सांगलीचा पारंपरिक गोपाळकाला हरविल्याची भावना सांगलीकरांमधून व्यक्त होत आहे. सांगलीत अनेक वर्षांपासून श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाल्याची परंपरा आहे. येथील पांजरपोळ, गोपाळकृष्ण मंदिरात मोठ्या प्रमाणावर हा सण साजरा केला जात होता. श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी, हंडीतील दही अंगावर झेलण्यासाठी, गायींचे दर्शन, प्रसाद अशा गोष्टींसाठी भाविकांची याठिकाणी दिवसभर गर्दी होत होती. ढोलकीवरील धार्मिक गाणी वाजविली जात होती. भजन, कीर्तनाचे कार्यक्रमही होत होते. छोट्या प्रमाणातील दहीहंडीच्या कार्यक्रमात मोठा उत्साह त्यावेळी दिसत होता. गवळी गल्लीतील गवळी समाजबांधवही मोठ्या प्रमाणावर हा सण साजरा करीत होते. अनेक वर्षे ही परंपरा उत्साहाच्या वातावरणात सुरू होती. आजही काही मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीने गोपाळकाला, जन्माष्टमी साजरी केली जाते, मात्र शहराचा मुख्य उत्सव म्हणून नवा गोपाळकाला आता अस्तित्वात आला आहे. मारुती चौक, सराफ कट्टा येथे पूर्वीपासून मोठ्या दहीहंडीचे कार्यक्रम होत होते. अनेक मंडळांचा सहभाग त्यामध्ये होता. बक्षिसेही दिली जायची. तरीही सुरुवातीला या उत्सवात धार्मिकता, सामाजिकता अधिक होती. पंधरा वर्षात या परंपरेला आधुनिकतेने कवेत घेतले. धार्मिकता, परंपरा मानणाऱ्या लोकांऐवजी राजकीय लोकांची गर्दी या उत्सवात होऊ लागली. कालांतराने हा उत्सव राजकारण्यांनी ‘हायजॅक’ केला. उत्सवाला पूर्वी भजनी मंडळे येत होती, आता त्यांची जागा सेलिब्रेटिंनी घेतली आहे. किरकोळ लोकवर्गणीतून किंवा मंदिरांकडील जमापुंजीतून पूर्वीचा उत्सव होत होता. आता लाखोंची उड्डाणे या दहीहंडीने घेतले आहेत. कोणाची हंडी किती मोठी, कोणाकडे मोठा सेलिब्रेटी, कोणाचे थर सर्वात मोठे अशा निकषांवर दहीहंडीला महत्त्व प्राप्त होऊ लागले. आमदार, खासदार, नगरसेवक, राजकीय मंडळे, संस्था अशा लोकांच्या नावे दहीहंडीचे कार्यक्रम भरविण्यात येऊ लागले. राजकीय गर्दीत दहीहंडीचे अस्तित्व राहिले, मात्र त्यातून कृष्ण हरविला. कृष्णाच्या अस्तित्वापेक्षा स्वत:च्या अस्तित्वासाठी हा सण इव्हेंटच्या स्वरुपात सांगलीत रुजू पाहात आहे. गोपाळकाल्याचा दिवस सोडून सवडीने, सोयीने दहीहंडीचे कार्यक्रम होत आहेत. त्यामुळे श्रावण संपून भाद्रपद आला तरी दहीहंडी साजरी करण्याची नवी परंपरा यातून निर्माण झाली. (प्रतिनिधी)यांनी जपली परंपरासांगलीचे गोपाळकृष्ण मंदिर, जुने मुरलीधर मंदिर, सांगलीवाडीचे विठ्ठल मंदिर, राम मंदिर येथेही पूर्वीपासून मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. सांगलीवाडीत पारायणे व अन्य धार्मिक कार्यक्रमांतून हा सण साजरा होतो. शेकडो वर्षांपासून सांगलीच्या गवळी समाजाने परंपरागत सण जपला आहे.