शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
7
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
8
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
9
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
10
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
11
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
12
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
13
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
14
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
15
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
16
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
17
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
18
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
19
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
20
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...

सांगलीच्या पारंपरिक गोपाळकाल्यास ‘इव्हेंट’चे स्वरुप

By admin | Updated: August 24, 2016 23:42 IST

आधुनिकतेचा रंग : दहीहंडी राहिली, कृष्ण हरवला; कृष्ण, त्याचे सवंगडी, गाय अशा सर्वच गोष्टींचे स्मरण

सांगली : दीड शतकाहून अधिक काळ चालत आलेला सांगलीतील पारंपरिक गोपाळकाला आता आधुनिकतेचे अनेक रंग लावून ‘इव्हेंट’च्या स्वरूपात समोर आला आहे. कृष्ण, त्याचे सवंगडी, गाय अशा सर्वच गोष्टींचे स्मरण करीत त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करीत साजरा होणारा सांगलीचा पारंपरिक गोपाळकाला हरविल्याची भावना सांगलीकरांमधून व्यक्त होत आहे. सांगलीत अनेक वर्षांपासून श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाल्याची परंपरा आहे. येथील पांजरपोळ, गोपाळकृष्ण मंदिरात मोठ्या प्रमाणावर हा सण साजरा केला जात होता. श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी, हंडीतील दही अंगावर झेलण्यासाठी, गायींचे दर्शन, प्रसाद अशा गोष्टींसाठी भाविकांची याठिकाणी दिवसभर गर्दी होत होती. ढोलकीवरील धार्मिक गाणी वाजविली जात होती. भजन, कीर्तनाचे कार्यक्रमही होत होते. छोट्या प्रमाणातील दहीहंडीच्या कार्यक्रमात मोठा उत्साह त्यावेळी दिसत होता. गवळी गल्लीतील गवळी समाजबांधवही मोठ्या प्रमाणावर हा सण साजरा करीत होते. अनेक वर्षे ही परंपरा उत्साहाच्या वातावरणात सुरू होती. आजही काही मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीने गोपाळकाला, जन्माष्टमी साजरी केली जाते, मात्र शहराचा मुख्य उत्सव म्हणून नवा गोपाळकाला आता अस्तित्वात आला आहे. मारुती चौक, सराफ कट्टा येथे पूर्वीपासून मोठ्या दहीहंडीचे कार्यक्रम होत होते. अनेक मंडळांचा सहभाग त्यामध्ये होता. बक्षिसेही दिली जायची. तरीही सुरुवातीला या उत्सवात धार्मिकता, सामाजिकता अधिक होती. पंधरा वर्षात या परंपरेला आधुनिकतेने कवेत घेतले. धार्मिकता, परंपरा मानणाऱ्या लोकांऐवजी राजकीय लोकांची गर्दी या उत्सवात होऊ लागली. कालांतराने हा उत्सव राजकारण्यांनी ‘हायजॅक’ केला. उत्सवाला पूर्वी भजनी मंडळे येत होती, आता त्यांची जागा सेलिब्रेटिंनी घेतली आहे. किरकोळ लोकवर्गणीतून किंवा मंदिरांकडील जमापुंजीतून पूर्वीचा उत्सव होत होता. आता लाखोंची उड्डाणे या दहीहंडीने घेतले आहेत. कोणाची हंडी किती मोठी, कोणाकडे मोठा सेलिब्रेटी, कोणाचे थर सर्वात मोठे अशा निकषांवर दहीहंडीला महत्त्व प्राप्त होऊ लागले. आमदार, खासदार, नगरसेवक, राजकीय मंडळे, संस्था अशा लोकांच्या नावे दहीहंडीचे कार्यक्रम भरविण्यात येऊ लागले. राजकीय गर्दीत दहीहंडीचे अस्तित्व राहिले, मात्र त्यातून कृष्ण हरविला. कृष्णाच्या अस्तित्वापेक्षा स्वत:च्या अस्तित्वासाठी हा सण इव्हेंटच्या स्वरुपात सांगलीत रुजू पाहात आहे. गोपाळकाल्याचा दिवस सोडून सवडीने, सोयीने दहीहंडीचे कार्यक्रम होत आहेत. त्यामुळे श्रावण संपून भाद्रपद आला तरी दहीहंडी साजरी करण्याची नवी परंपरा यातून निर्माण झाली. (प्रतिनिधी)यांनी जपली परंपरासांगलीचे गोपाळकृष्ण मंदिर, जुने मुरलीधर मंदिर, सांगलीवाडीचे विठ्ठल मंदिर, राम मंदिर येथेही पूर्वीपासून मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. सांगलीवाडीत पारायणे व अन्य धार्मिक कार्यक्रमांतून हा सण साजरा होतो. शेकडो वर्षांपासून सांगलीच्या गवळी समाजाने परंपरागत सण जपला आहे.