शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

सांगलीच्या पारंपरिक गोपाळकाल्यास ‘इव्हेंट’चे स्वरुप

By admin | Updated: August 24, 2016 23:42 IST

आधुनिकतेचा रंग : दहीहंडी राहिली, कृष्ण हरवला; कृष्ण, त्याचे सवंगडी, गाय अशा सर्वच गोष्टींचे स्मरण

सांगली : दीड शतकाहून अधिक काळ चालत आलेला सांगलीतील पारंपरिक गोपाळकाला आता आधुनिकतेचे अनेक रंग लावून ‘इव्हेंट’च्या स्वरूपात समोर आला आहे. कृष्ण, त्याचे सवंगडी, गाय अशा सर्वच गोष्टींचे स्मरण करीत त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करीत साजरा होणारा सांगलीचा पारंपरिक गोपाळकाला हरविल्याची भावना सांगलीकरांमधून व्यक्त होत आहे. सांगलीत अनेक वर्षांपासून श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाल्याची परंपरा आहे. येथील पांजरपोळ, गोपाळकृष्ण मंदिरात मोठ्या प्रमाणावर हा सण साजरा केला जात होता. श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी, हंडीतील दही अंगावर झेलण्यासाठी, गायींचे दर्शन, प्रसाद अशा गोष्टींसाठी भाविकांची याठिकाणी दिवसभर गर्दी होत होती. ढोलकीवरील धार्मिक गाणी वाजविली जात होती. भजन, कीर्तनाचे कार्यक्रमही होत होते. छोट्या प्रमाणातील दहीहंडीच्या कार्यक्रमात मोठा उत्साह त्यावेळी दिसत होता. गवळी गल्लीतील गवळी समाजबांधवही मोठ्या प्रमाणावर हा सण साजरा करीत होते. अनेक वर्षे ही परंपरा उत्साहाच्या वातावरणात सुरू होती. आजही काही मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीने गोपाळकाला, जन्माष्टमी साजरी केली जाते, मात्र शहराचा मुख्य उत्सव म्हणून नवा गोपाळकाला आता अस्तित्वात आला आहे. मारुती चौक, सराफ कट्टा येथे पूर्वीपासून मोठ्या दहीहंडीचे कार्यक्रम होत होते. अनेक मंडळांचा सहभाग त्यामध्ये होता. बक्षिसेही दिली जायची. तरीही सुरुवातीला या उत्सवात धार्मिकता, सामाजिकता अधिक होती. पंधरा वर्षात या परंपरेला आधुनिकतेने कवेत घेतले. धार्मिकता, परंपरा मानणाऱ्या लोकांऐवजी राजकीय लोकांची गर्दी या उत्सवात होऊ लागली. कालांतराने हा उत्सव राजकारण्यांनी ‘हायजॅक’ केला. उत्सवाला पूर्वी भजनी मंडळे येत होती, आता त्यांची जागा सेलिब्रेटिंनी घेतली आहे. किरकोळ लोकवर्गणीतून किंवा मंदिरांकडील जमापुंजीतून पूर्वीचा उत्सव होत होता. आता लाखोंची उड्डाणे या दहीहंडीने घेतले आहेत. कोणाची हंडी किती मोठी, कोणाकडे मोठा सेलिब्रेटी, कोणाचे थर सर्वात मोठे अशा निकषांवर दहीहंडीला महत्त्व प्राप्त होऊ लागले. आमदार, खासदार, नगरसेवक, राजकीय मंडळे, संस्था अशा लोकांच्या नावे दहीहंडीचे कार्यक्रम भरविण्यात येऊ लागले. राजकीय गर्दीत दहीहंडीचे अस्तित्व राहिले, मात्र त्यातून कृष्ण हरविला. कृष्णाच्या अस्तित्वापेक्षा स्वत:च्या अस्तित्वासाठी हा सण इव्हेंटच्या स्वरुपात सांगलीत रुजू पाहात आहे. गोपाळकाल्याचा दिवस सोडून सवडीने, सोयीने दहीहंडीचे कार्यक्रम होत आहेत. त्यामुळे श्रावण संपून भाद्रपद आला तरी दहीहंडी साजरी करण्याची नवी परंपरा यातून निर्माण झाली. (प्रतिनिधी)यांनी जपली परंपरासांगलीचे गोपाळकृष्ण मंदिर, जुने मुरलीधर मंदिर, सांगलीवाडीचे विठ्ठल मंदिर, राम मंदिर येथेही पूर्वीपासून मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. सांगलीवाडीत पारायणे व अन्य धार्मिक कार्यक्रमांतून हा सण साजरा होतो. शेकडो वर्षांपासून सांगलीच्या गवळी समाजाने परंपरागत सण जपला आहे.