शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीच्या उपनगरांत जगण्याचा संघर्ष कायम- मदत वाटपावेळी नागरिकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 00:37 IST

या महापुराचा सर्वाधिक फटका शहरातील उपनगरांना बसला. दत्तनगर, काकानगर, सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, मगरमच्छ कॉलनी, शामरावनगर, इंद्रप्रस्थनगर, मीरा हौसिंग सोसायटी, कलानगर या उपनगरांतील पूर्ण घरेच पाण्याखाली गेली होती. तब्बल पावणेदोन लाख लोकांना महापुराचा फटका बसला.

ठळक मुद्देजनजीवन पूर्वपदावर : घरांच्या ओल्या भिंतींना अजूनही कुबट वास

सांगली : महापुराच्या धक्क्यातून आता सांगली शहर हळूहळू सावरू लागले आहे. पुरामुळे नागरी वस्तीचे मोठे नुकसान झाले होते. विशेषत: उपनगरात राहणाऱ्या गोरगरीब जनतेला पुराचा मोठा दणका बसला होता. आता पंधरा दिवसांनंतर उपनगरांतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. स्वच्छता, कचरा उठाव बºयापैकी झाला असला तरी, भिंती ओल्याच असल्याने घरात अजूनही दुर्गंधी आहे. काही भागात कचºयाचे ढीग रस्त्यावर पडून आहेत, तर काही ठिकाणी अपेक्षित औषध फवारणी झाली नसल्याच्या तक्रारी आहेत.

आॅगस्टच्या पहिल्याच आठवड्यात कृष्णा नदीला महापूर आला. २००५ च्या पुराचा अनुभव गाठीशी असलेल्या सांगलीकरांनी त्यानुसार नियोजन केले. पण शतकाला सर्वात मोठ्या महापुराला सामोरे जावे लागणार असल्याची पुसटशी कल्पनाही जनतेच्या मनात नव्हती. त्यात जिल्हा प्रशासनानेही पाण्याची पातळी किती वाढणार, याची माहिती जनतेला दिली नाही. केवळ वाहनांवर ध्वनिक्षेपक लावून, खबरदारी घ्या, असे सांगून हात झटकले होते. नेमकी काय खबरदारी घ्यायची, हे कळण्यापूर्वीच लोकांच्या दारात कृष्णामाई अवतरली. त्यामुळे जनतेचा मोठा गोंधळ उडाला. हजारो नागरिक पुरात अडकून पडले होते.

या महापुराचा सर्वाधिक फटका शहरातील उपनगरांना बसला. दत्तनगर, काकानगर, सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, मगरमच्छ कॉलनी, शामरावनगर, इंद्रप्रस्थनगर, मीरा हौसिंग सोसायटी, कलानगर या उपनगरांतील पूर्ण घरेच पाण्याखाली गेली होती. तब्बल पावणेदोन लाख लोकांना महापुराचा फटका बसला. त्यात उपनगरांतील लोकांची संख्या अधिक होती. महापूर ओसरल्यानंतर पूरग्रस्त लोक घरी परतले, पण घरादारासमोरचा चिखल, पुरात वाहून गेलेला संसार पाहून त्यांच्यासमोर अनेक प्रश्न उभे राहिले. चार ते पाच दिवसांच्या परिश्रमानंतर घरातील चिखल लोकांनी बाहेर काढला. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सारेच राबत होते. पंधरा दिवसानंतर आता कुठे उपनगरांतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. दत्तनगर, काकानगर, मगरमच्छ कॉलनीत स्वच्छता झाली आहे. काही ठिकाणी कचºयाचे ढीग आहेत. दोन-तीनदा उपनगरांतील कचरा उचलला गेला. त्यानंतरही कचरा रस्त्यावर येतच आहे. कर्नाळ रस्त्यावरील शिवशंभो चौकात कचºयाचा ढीग आहे.

औषध फवारणीबाबत काही नागरिकांच्या तक्रारी दिसून आल्या. सुरूवातीच्या काळात एकदाच औषध फवारणी झाली. त्यानंतर आठ दिवसांनी फवारणी झाल्याचे सांगण्यात आले. शासनाची मदतही नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचली आहे. महापालिकेकडून कीट वाटप सुरू केले आहे. पण पुरामुळे घरातील ओलावा काही हटलेला नाही. घराच्या भिंती अजूनही ओल्याच आहेत. त्यामुळे घरात कुबट वास येत आहे. अजूनही काही घरात स्वच्छतेचे काम सुरूच असल्याचे चित्रही उपनगरांत दिसून येते. उपनगरांत मोलमजुरी करून जीवन जगणाऱ्यांची संख्या अधिक आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांचा रोजगार बुडाला आहे. त्यात शासनाने पाच हजाराची मदत केल्याने त्यांना थोडाफार हातभार लागला आहे. अजूनही अनेकजण मजुरीसाठी बाहेर पडलेले नाहीत.मदत वाटपातही नेत्यांकडून श्रेयवादपूरग्रस्त उपनगरांत सध्या महापालिकेच्यावतीने साहित्याच्या कीटचे वाटप केले जात आहे. महापालिकेतील अधिकाºयांचे पथक उपनगरात जाऊन स्वत: कीट वाटत आहे. पण कीट वाटप करताना त्या भागातील लोकप्रतिनिधी मात्र वारंवार हस्तक्षेप करीत आहेत. त्यांच्यामुळेच मदत मिळत असल्याचे लोकांच्या मनावर बिंबविण्याचा केविलवाणा प्रयत्नही सुरू झाला आहे. रविवारी हरिपूर रस्त्यावर कीटचे वाटप करताना मोठा गोंधळ उडाला. ५०० हून अधिक लोक कीटसाठी रांगेत उभे होते. गोंधळामुळे अखेर आयुक्त नितीन कापडणीस यांना घटनास्थळी जावे लागले. त्यांनी लोकांची समजूत काढून, अजून कीट वाटली जाणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर जनतेचा संताप कमी झाला.पूरग्रस्त शाळा : अजूनही बंदचमहापालिकेसह खासगी शाळांनाही पुराचा मोठा फटका बसला आहे. उपनगरांतील अनेक शाळा पाण्याखाली होत्या. या शाळा अजूनही सुरू झालेल्या नाहीत. सोमवारपासून त्या सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. मुलांचे शालेय साहित्यही पुरात खराब झाले आहे. या मुलांना महापालिकेच्यावतीने पुस्तके व शालेय साहित्य दिले जाणार आहे. पण शाळाच बंद असल्याने त्यांचे वाटपही पूर्णपणे होऊ शकलेले नाही. उपनगरांतील मुलांना मात्र आता शाळेची ओढ लागली आहे.

 

टॅग्स :Sangliसांगलीfloodपूर