शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
4
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
5
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
6
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
7
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
9
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
10
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
11
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
12
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
13
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
14
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
15
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
16
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
17
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
18
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
19
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
20
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण

सांगलीच्या उपनगरांत जगण्याचा संघर्ष कायम- मदत वाटपावेळी नागरिकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 00:37 IST

या महापुराचा सर्वाधिक फटका शहरातील उपनगरांना बसला. दत्तनगर, काकानगर, सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, मगरमच्छ कॉलनी, शामरावनगर, इंद्रप्रस्थनगर, मीरा हौसिंग सोसायटी, कलानगर या उपनगरांतील पूर्ण घरेच पाण्याखाली गेली होती. तब्बल पावणेदोन लाख लोकांना महापुराचा फटका बसला.

ठळक मुद्देजनजीवन पूर्वपदावर : घरांच्या ओल्या भिंतींना अजूनही कुबट वास

सांगली : महापुराच्या धक्क्यातून आता सांगली शहर हळूहळू सावरू लागले आहे. पुरामुळे नागरी वस्तीचे मोठे नुकसान झाले होते. विशेषत: उपनगरात राहणाऱ्या गोरगरीब जनतेला पुराचा मोठा दणका बसला होता. आता पंधरा दिवसांनंतर उपनगरांतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. स्वच्छता, कचरा उठाव बºयापैकी झाला असला तरी, भिंती ओल्याच असल्याने घरात अजूनही दुर्गंधी आहे. काही भागात कचºयाचे ढीग रस्त्यावर पडून आहेत, तर काही ठिकाणी अपेक्षित औषध फवारणी झाली नसल्याच्या तक्रारी आहेत.

आॅगस्टच्या पहिल्याच आठवड्यात कृष्णा नदीला महापूर आला. २००५ च्या पुराचा अनुभव गाठीशी असलेल्या सांगलीकरांनी त्यानुसार नियोजन केले. पण शतकाला सर्वात मोठ्या महापुराला सामोरे जावे लागणार असल्याची पुसटशी कल्पनाही जनतेच्या मनात नव्हती. त्यात जिल्हा प्रशासनानेही पाण्याची पातळी किती वाढणार, याची माहिती जनतेला दिली नाही. केवळ वाहनांवर ध्वनिक्षेपक लावून, खबरदारी घ्या, असे सांगून हात झटकले होते. नेमकी काय खबरदारी घ्यायची, हे कळण्यापूर्वीच लोकांच्या दारात कृष्णामाई अवतरली. त्यामुळे जनतेचा मोठा गोंधळ उडाला. हजारो नागरिक पुरात अडकून पडले होते.

या महापुराचा सर्वाधिक फटका शहरातील उपनगरांना बसला. दत्तनगर, काकानगर, सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, मगरमच्छ कॉलनी, शामरावनगर, इंद्रप्रस्थनगर, मीरा हौसिंग सोसायटी, कलानगर या उपनगरांतील पूर्ण घरेच पाण्याखाली गेली होती. तब्बल पावणेदोन लाख लोकांना महापुराचा फटका बसला. त्यात उपनगरांतील लोकांची संख्या अधिक होती. महापूर ओसरल्यानंतर पूरग्रस्त लोक घरी परतले, पण घरादारासमोरचा चिखल, पुरात वाहून गेलेला संसार पाहून त्यांच्यासमोर अनेक प्रश्न उभे राहिले. चार ते पाच दिवसांच्या परिश्रमानंतर घरातील चिखल लोकांनी बाहेर काढला. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सारेच राबत होते. पंधरा दिवसानंतर आता कुठे उपनगरांतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. दत्तनगर, काकानगर, मगरमच्छ कॉलनीत स्वच्छता झाली आहे. काही ठिकाणी कचºयाचे ढीग आहेत. दोन-तीनदा उपनगरांतील कचरा उचलला गेला. त्यानंतरही कचरा रस्त्यावर येतच आहे. कर्नाळ रस्त्यावरील शिवशंभो चौकात कचºयाचा ढीग आहे.

औषध फवारणीबाबत काही नागरिकांच्या तक्रारी दिसून आल्या. सुरूवातीच्या काळात एकदाच औषध फवारणी झाली. त्यानंतर आठ दिवसांनी फवारणी झाल्याचे सांगण्यात आले. शासनाची मदतही नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचली आहे. महापालिकेकडून कीट वाटप सुरू केले आहे. पण पुरामुळे घरातील ओलावा काही हटलेला नाही. घराच्या भिंती अजूनही ओल्याच आहेत. त्यामुळे घरात कुबट वास येत आहे. अजूनही काही घरात स्वच्छतेचे काम सुरूच असल्याचे चित्रही उपनगरांत दिसून येते. उपनगरांत मोलमजुरी करून जीवन जगणाऱ्यांची संख्या अधिक आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांचा रोजगार बुडाला आहे. त्यात शासनाने पाच हजाराची मदत केल्याने त्यांना थोडाफार हातभार लागला आहे. अजूनही अनेकजण मजुरीसाठी बाहेर पडलेले नाहीत.मदत वाटपातही नेत्यांकडून श्रेयवादपूरग्रस्त उपनगरांत सध्या महापालिकेच्यावतीने साहित्याच्या कीटचे वाटप केले जात आहे. महापालिकेतील अधिकाºयांचे पथक उपनगरात जाऊन स्वत: कीट वाटत आहे. पण कीट वाटप करताना त्या भागातील लोकप्रतिनिधी मात्र वारंवार हस्तक्षेप करीत आहेत. त्यांच्यामुळेच मदत मिळत असल्याचे लोकांच्या मनावर बिंबविण्याचा केविलवाणा प्रयत्नही सुरू झाला आहे. रविवारी हरिपूर रस्त्यावर कीटचे वाटप करताना मोठा गोंधळ उडाला. ५०० हून अधिक लोक कीटसाठी रांगेत उभे होते. गोंधळामुळे अखेर आयुक्त नितीन कापडणीस यांना घटनास्थळी जावे लागले. त्यांनी लोकांची समजूत काढून, अजून कीट वाटली जाणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर जनतेचा संताप कमी झाला.पूरग्रस्त शाळा : अजूनही बंदचमहापालिकेसह खासगी शाळांनाही पुराचा मोठा फटका बसला आहे. उपनगरांतील अनेक शाळा पाण्याखाली होत्या. या शाळा अजूनही सुरू झालेल्या नाहीत. सोमवारपासून त्या सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. मुलांचे शालेय साहित्यही पुरात खराब झाले आहे. या मुलांना महापालिकेच्यावतीने पुस्तके व शालेय साहित्य दिले जाणार आहे. पण शाळाच बंद असल्याने त्यांचे वाटपही पूर्णपणे होऊ शकलेले नाही. उपनगरांतील मुलांना मात्र आता शाळेची ओढ लागली आहे.

 

टॅग्स :Sangliसांगलीfloodपूर