शहरं
Join us  
Trending Stories
1
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
2
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
3
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
4
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
5
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
6
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
8
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
9
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
10
खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
11
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
12
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
13
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
14
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
15
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा
16
Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
17
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
18
चांदी जैसा रंग है तेरा...! 'ही' छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...
19
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
20
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
Daily Top 2Weekly Top 5

टांग्यांच्या गावातच अस्तित्वासाठी टांगेवाल्यांची धडपड...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 12:07 IST

सदानंद औंधे  मिरज : प्रवासी वाहतुकीचे साधन म्हणून वापरण्यात येणारा टांगा इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात एकेकाळी मोठ्या संख्येने ...

सदानंद औंधे मिरज : प्रवासी वाहतुकीचे साधन म्हणून वापरण्यात येणारा टांगा इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात एकेकाळी मोठ्या संख्येने टांगे असलेल्या मिरजेत आता केवळ १५ टांगे शिल्लक आहेत. प्रवासी भाडे मिळत नसल्याने टांग्यातून मालाची वाहतूक करण्यात येत आहे.प्रवासी मिळत नसल्याने टांगाचालकांचा रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रवासी मिळत नसल्याने घोड्यास जगविणे कठीण झाले आहे. टांगा व्यवसाय करणाऱ्या बहुसंख्य अशिक्षित टांगाचालकांना हलाकीचे दिवस आले आहेत. दिवसभर भाड्याच्या प्रतीक्षेत असणारे टांगाचालक नाईलाजाने मालवाहतूक करीत आहेत. बांधकामाचे साहित्य टांग्यातून नेण्यात येत आहे. साहित्य टांग्यात चढविण्याचे व उतरविण्याचे काम टांगाचालक करीत आहेत. 

पूर्वी टांग्याचा रुबाब होता; मात्र आता टांग्यात बसायला लाज वाटत असल्याने टांगा सर्वजण टाळत आहेत. टांग्याने जाण्यासाठी उशीर लागत असल्याने बस, वडाप किंवा रिक्षाने प्रवास सोयीस्कर ठरला आहे. बाल-गोपाळांची हौस व मनोरंजन म्हणून एखादा फेरफटका मारण्यासाठी आता टांग्याचा वापर होतो.

पेट्रोलची बचत व प्रदूषण नसलेला टांगा आता कोणीही वापरत नाही. चपळ, वेगवान व शिंगे नसल्याने गर्दीच्या ठिकाणी घातक नसणाºया देशी घोड्याचा टांग्यासाठी वापर होतो. घोडागाडी असणे हे एकेकाळी स्टेटस सिंबॉल होते. घोडागाडीचा प्रकार असलेली टांगा व बग्गी ही वाहने आपल्याकडे वापरात होती.मिरजेत १९८० पर्यंत रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूस टांगा स्टॉप होता. किरण हॉटेलजवळ, देवल टॉकीजजवळ, मिशन हॉस्पिटलजवळ, दत्त चौकात, कृष्णाघाटावर, शास्त्री चौक, पोलीस चौकीजवळ असे मिरजेतल्या विविध भागात मोक्याच्या ठिकाणी, बाजारपेठेत टांगा स्टॉप होते.

रिक्षा व अन्य वाहने उपलब्ध झाल्यानंतर टांग्याचे महत्त्व कमी झाले. टांगा स्टॉपच्या जागेवर रिक्षा थांबे झाले. काही जागा फळविक्रेत्या, भाजीपाला विक्रेत्यांनी ताब्यात घेतल्या. आता मिरजेत किसान चौक टांगा व गांधी चौकातील टांगा स्टॉपवर केवळ १५ टांगे शिल्लक आहेत.म्हातारपणी घोड्याला कसे सोडणार?घोड्याचा खुराक व टांग्याचा देखभाल खर्च भागविण्यासाठी मालवाहतुकीशिवाय पर्यायच नाही. अन्य कोणताच व्यवसाय करण्याची उमेद आता राहिली नाही. आयुष्यभर साथ देणाºया घोड्याला म्हातारपणी सोडता येत नसल्याने, दररोज केवळ तीनशे ते चारशे रुपयात घोड्याचा व कुटुंबाचा खर्च चालवावा लागत असल्याचे, गेली ४० वर्षे टांगा व्यवसाय करणारे सलीम पठाण यांनी सांगितले.टांगाचालकांची ओळखपत्रे ठाण्यात जमाप्रवासी वाहतुकीसाठी पूर्वी टांग्याचेही वाहतूक नियमानुसार पासिंग केले जात होते. यासाठी टांग्यात कुशन गादी, रात्रीसाठी पुढे कंदील, दोन मोठ्या, तीन लहान आसनांची व्यवस्था करावी लागत असे. पाच प्रवाशांच्या वाहतुकीची परवानगी असलेल्या टांग्यास पुढील बाजूस पासिंगची माहिती असणारी लोखंडी पत्र्याची पट्टी असे.

टांगाचालकास ओळखपत्र म्हणून बिल्ला मिळायचा. टांग्याचे पासिंग थांबविल्यानंतर मिरजेत टांगाचालकांची ओळखपत्रे पोलीस ठाण्यात जमा केली. सध्या टांगा व्यवसायावर परिवहन विभागाचे नियंत्रण नाही.