शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

या आजीबाईच्या हाकेने चिमण्या करतात चिवचिवाट..रोज येतात तांदूळ खायला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 00:37 IST

त्यांच्या घराच्या परिसरात चिमण्यांचा राबता वाढला आहे.त्या हाकेला लागलीच प्रतिसाद देत अंगणात ठरलेल्या ठिकाणी एकवटतात.

ठळक मुद्देवाढत्या नागरिकरणामुळे सर्वच पक्ष्यांच्या जीवनमानावर परिणाम झाला आहे.

सहदेव खोत ।पुनवत : धान्यातील घातक रासायनिक घटक, सिमेंटच्या जंगलांमुळे नष्ट झालेला नैसर्गिक अधिवास, पाण्याची समस्या, यामुळे चिमण्यांच्या संख्येवर विपरित परिणाम झाला आहे. खवरेवाडी (ता. शिराळा) येथील सुशिला रामचंद्र वरेकर या आजीबाई मात्र परसदारी चिमण्यांना चक्क हाक मारून त्यांना खाऊ घालतात. गावचिमण्यांबरोबरच रानचिमण्याही येथे दररोज मोठ्या संख्येने जमतात.

वाढत्या नागरिकरणामुळे सर्वच पक्ष्यांच्या जीवनमानावर परिणाम झाला आहे. त्याला चिमण्याही अपवाद नाहीत. चिमणी हा तसा मनुष्यवस्तीत वावरणारा पक्षी, तर रानचिमणीचे वास्तव्य शेतात. या दोन्ही प्रकारच्या चिमण्यांची संख्या सध्या वेगाने कमी होत आहे. त्यामुळे चिमण्यांचा चिवचिवाटही ऐकायला मिळणे दुर्मिळ झाले आहे. चिमण्यांचे प्रमुख खाद्य म्हणजे धान्य, पण हे धान्यच रासायनिक खतांमुळे पूर्वीसारखे दर्जेदार राहिले नाही. शिवाय गावात चिमण्यांना घरटी बांधण्यासाठी जागाच उरल्या नाहीत. सिमेंटची जंगले उभी राहिली. परिणामी चिमण्यांचे तसेच अन्य पक्ष्यांचे अधिवास उद्ध्वस्त होत आले.

खवरेवाडी येथील सुशिला रामचंद्र वरेकर या आजीबाई मात्र गेल्या काही महिन्यांपासून चिमण्यांना परसदारी बोलावून खाऊ घालत आहेत. त्यामुळे त्यांच्या घराच्या परिसरात चिमण्यांचा राबता वाढला आहे.दररोज देतात तांदूळसुशिलाबाई दिवसातून चारवेळा हाती तांदूळ घेऊन चिमण्यांना ‘या गं’अशी हाक मारतात. त्यांचा आवाज ऐकताच चिमण्याही हजर होतात. यात रानचिमण्याही मोठ्या संख्येने असतात. तांदळावर ताव मारून त्या शेजारच्या झाडावर जाऊन बसतात. त्यांना ही हाक सवयीची बनली आहे. त्यामुळे त्या हाकेला लागलीच प्रतिसाद देत अंगणात ठरलेल्या ठिकाणी एकवटतात.