शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

या आजीबाईच्या हाकेने चिमण्या करतात चिवचिवाट..रोज येतात तांदूळ खायला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 00:37 IST

त्यांच्या घराच्या परिसरात चिमण्यांचा राबता वाढला आहे.त्या हाकेला लागलीच प्रतिसाद देत अंगणात ठरलेल्या ठिकाणी एकवटतात.

ठळक मुद्देवाढत्या नागरिकरणामुळे सर्वच पक्ष्यांच्या जीवनमानावर परिणाम झाला आहे.

सहदेव खोत ।पुनवत : धान्यातील घातक रासायनिक घटक, सिमेंटच्या जंगलांमुळे नष्ट झालेला नैसर्गिक अधिवास, पाण्याची समस्या, यामुळे चिमण्यांच्या संख्येवर विपरित परिणाम झाला आहे. खवरेवाडी (ता. शिराळा) येथील सुशिला रामचंद्र वरेकर या आजीबाई मात्र परसदारी चिमण्यांना चक्क हाक मारून त्यांना खाऊ घालतात. गावचिमण्यांबरोबरच रानचिमण्याही येथे दररोज मोठ्या संख्येने जमतात.

वाढत्या नागरिकरणामुळे सर्वच पक्ष्यांच्या जीवनमानावर परिणाम झाला आहे. त्याला चिमण्याही अपवाद नाहीत. चिमणी हा तसा मनुष्यवस्तीत वावरणारा पक्षी, तर रानचिमणीचे वास्तव्य शेतात. या दोन्ही प्रकारच्या चिमण्यांची संख्या सध्या वेगाने कमी होत आहे. त्यामुळे चिमण्यांचा चिवचिवाटही ऐकायला मिळणे दुर्मिळ झाले आहे. चिमण्यांचे प्रमुख खाद्य म्हणजे धान्य, पण हे धान्यच रासायनिक खतांमुळे पूर्वीसारखे दर्जेदार राहिले नाही. शिवाय गावात चिमण्यांना घरटी बांधण्यासाठी जागाच उरल्या नाहीत. सिमेंटची जंगले उभी राहिली. परिणामी चिमण्यांचे तसेच अन्य पक्ष्यांचे अधिवास उद्ध्वस्त होत आले.

खवरेवाडी येथील सुशिला रामचंद्र वरेकर या आजीबाई मात्र गेल्या काही महिन्यांपासून चिमण्यांना परसदारी बोलावून खाऊ घालत आहेत. त्यामुळे त्यांच्या घराच्या परिसरात चिमण्यांचा राबता वाढला आहे.दररोज देतात तांदूळसुशिलाबाई दिवसातून चारवेळा हाती तांदूळ घेऊन चिमण्यांना ‘या गं’अशी हाक मारतात. त्यांचा आवाज ऐकताच चिमण्याही हजर होतात. यात रानचिमण्याही मोठ्या संख्येने असतात. तांदळावर ताव मारून त्या शेजारच्या झाडावर जाऊन बसतात. त्यांना ही हाक सवयीची बनली आहे. त्यामुळे त्या हाकेला लागलीच प्रतिसाद देत अंगणात ठरलेल्या ठिकाणी एकवटतात.