शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

जिल्ह्यास वादळी पावसाचा जोरदार तडाखा

By admin | Updated: September 11, 2015 23:41 IST

वाळवा तालुक्यात नुकसान : ज्वारी जमीनदोस्त; घरे, शेडवरील पत्रे, कौले उडाली; लाखोंचे नुकसान

ऐतवडे बुद्रुक : वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुदु्रक, ढगेवाडी, शेखरवाडी परिसरास शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वारे व जोरदार पावसाने झोडपून काढले. परिसरातील ८0 टक्के ऊस व ज्वारी पीक जमीनदोस्त झाले. घरे व शेडवरील पत्रे, कौले उडाली. तसेच विजेचे खांब कोलमडले व झाडे उन्मळून पडली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.परिसरात सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वारे व जोरदार पावसाने हाहाकार उडवून दिला. कार्वे येथील एकनाथ निवृत्ती पाटील यांच्या शेडवरील पत्रा ब्रॅकेटसह उडून शेजारच्या वीज ट्रान्स्फॉर्मरवर जाऊन पडला. यामुळे वीजतारा तुटून गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता. ऐतवडे बुद्रुक येथे शशिकांत कांबळे, हरीश कांबळे, सुषमा कांबळे यांच्या घरांवरील पत्रे, कौले उडून गेली. गौतमनगरात विद्युत खांब पडून तेथील वीज प्रवाह खंडित झाला होता. ऐतवडे बुद्रुक ते करंजवडे रस्त्यावर तीन ठिकाणी बाभळीची झाडे उन्मळून पडली. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. शिराळा—आष्टा या मुख्य रस्त्यावरील सुतार ओढा पाण्याखाली गेला होता. पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आष्टा : आष्टा परिसरात शुक्रवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. अनेक दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. मात्र पाऊस हुलकावणी देत होता.गुरुवारी रात्री व शुक्रवारी दुपारी आष्टा, तुंग, कारंदवाडी, मर्दवाडी, मिरजवाडी, नागाव, पोखर्णी, बागणी परिसरात दमदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी शेतात पावसाचे पाणी साचले होते. सोयाबीन, उसासह, झेंडूच्या बागेतही पाणी साचले होते. सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू आहे. मात्र पावसामुळे हाता-तोंडाशी आलेले सोयाबीन वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. आष्टा शहरातील शुक्रवारच्या आठवडा बाजारात पाऊस झाल्याने भाजी मंडईच्या बाहेर विक्री करण्यास बसलेले व्यापारी, विक्रेते व नागरिकांचा एकच गोंधळ उडाला. अहिल्या चौक ते दरोजबुवा चौक या रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र पावसामुळे रस्त्यावर चिखल झाल्याने या रस्त्यावरून येणाऱ्या पादचाऱ्यांसह दुचाकीस्वारांना कसरत करावी लागत होती. पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. बागणी : बागणी, काकाचीवाडी परिसरात शुक्रवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे सोयाबीन व भुईमूग काढणाऱ्या शेतक ऱ्यांची तारांबळ उडाली. या पावसामुळे उशिरा पेरणी झालेल्या सोयाबीन व भुईमूग पिकाला चांगलाच फायदा होणार आहे. (वार्ताहर) जिल्ह्यात सरासरी २३० मि.मी. पाऊससांगली : जिल्ह्यात सर्वच तालुक्यात पावसाने हजेरी लावली असून, शुक्रवारी सकाळी ८.३० पर्यंत गेल्या २४ तासात एकूण २११.९ मि.मी., तर सरासरी २१.२ मि.मी. इतकी पावसाची नोंद झाली आहे. खानापूर-विटा तालुक्यात सर्वाधिक ३५.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मिरज तालुक्यात २९.२ मि.मी., जत १६.९ मि.मी., वाळवा-इस्लामपूर १४.२ मि.मी., तासगाव २४.६ मि.मी., शिराळा २२.६ मि.मी., आटपाडी ३.७ मि.मी., कवठेमहांकाळ २४.३ मि.मी., पलूस २४.६ मि.मी. व कडेगाव तालुक्यात १६.२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण २३०९.१ मि.मी., तर सरासरी एकूण २३०.९ मि.मी. पाऊस पडला आहे.