शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

झेडपीच्या कृषी विभागावरील गंडांतर थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:18 IST

सांगली : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून गुणनियंत्रण व विशेष घटक योजनेचे अधिकार शासनाच्या कृषी विभागाकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू आहेत. हे गंडांतर थांबवा, अशी मागणी गुरुवारी जिल्हा परिषद अध्यक्षांनी खासदार, आमदारांकडे केली.जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण म्हणजे दक्षता समितीची बैठक गुरुवारी खासदार संजयकाका पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या वसंतदादा सभागृहात ...

सांगली : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून गुणनियंत्रण व विशेष घटक योजनेचे अधिकार शासनाच्या कृषी विभागाकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू आहेत. हे गंडांतर थांबवा, अशी मागणी गुरुवारी जिल्हा परिषद अध्यक्षांनी खासदार, आमदारांकडे केली.जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण म्हणजे दक्षता समितीची बैठक गुरुवारी खासदार संजयकाका पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या वसंतदादा सभागृहात पार पडली. या बैठकीला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आ. शिवाजीराव नाईक, आमदार अनिल बाबर, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर आदी उपस्थित होते.जिल्हा परिषदेकडील कृषी विभागाकडून गुणनियंत्रणआणि विशेष घटक योजनांच्या अंमलबजावणीचे अधिकार राज्य शासनाच्या कृषी विभागाकडे देण्याच्या हालचाली शासन स्तरावर सुरू आहेत. विविध योजनांमध्ये शेतकºयांचा सहभाग कमी होत चालला असताना, ज्या ठिकाणी पदाधिकारी असतात, अशा संस्थांच्या माध्यमातून योजनांची अंमलबजावणी चांगली होते. त्यामुळे जिल्हा परिषदेचा हा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी मंत्री, खासदार, आमदारांनी शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी यावेळी केली.वीज कंपनीकडून सेवेच्या बाबतीत नसलेली तत्परता वसुलीत दाखविली जाते आणि कृषी विभागाकडून अनुदानाच्या योजनांबद्दल गाफिलपणाचे दर्शन घडते, अशी टीका करीत दक्षता समितीच्या बैठकीत गुरुवारी जिल्ह्यातील खासदार आणि आमदारांनी दोन्ही विभागांच्या कारभारावर संताप व्यक्त केला.पीक विमा योजनेसाठी शेतकºयांचा समाधानकारक प्रतिसाद मिळत नाही. जिल्ह्यामध्ये केवळ ३० टक्के शेतकºयांनी पीक विमा घेतलेला आहे. खरीप व रब्बी हंगामामध्ये २ टक्के विमा असल्यामुळे शेतकरी विमा भरतात; मात्र द्राक्ष आणि डाळिंबासाठी विमा हप्त्याची रक्कम मोठी असल्यामुळे तसेच शेतकºयांना कमी भरपाई मिळते. यामुळे शेतकºयांचा प्रतिसाद मिळत नाही, असे स्पष्टीकरण अधिकाºयांनी दिले. यावर अधिकारी शेतकºयांमध्ये जागृती करण्यास कमी पडत असल्याचे सांगत खासदार पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. द्राक्ष विमा मिळण्यासाठी मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी यावेळी कार्यकर्ते, पदाधिकाºयांकडून करण्यात आली.दुरुपयोग झाल्यास कारवाईशासनाच्या विविध विभागांकडे काही ठराविकच व्यक्ती माहिती अधिकाराचे अर्ज करून शासकीय कामांमध्ये अडथळा आणण्याचे काम करतात. एकच व्यक्ती अनेक अर्ज अनेक विभागांमध्ये करत असेल, तर अशी व्यक्ती अधिकाºयांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी त्या व्यक्तीवर गुन्हे दाखल करावेत, अशा सूचना सदाभाऊ खोत यांनी दिल्या.

टॅग्स :zpजिल्हा परिषद