शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

सदाभाऊंकडून जयंतरावांच्या आरोपाचे ‘स्टिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 23:15 IST

इस्लामपूर : बोगस ग्रीन हाऊसच्या माध्यमातून आष्टा येथील शेतकऱ्याला चुकीच्या पद्धतीने अनुदान वाटप केल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केल्यानंतर कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी रविवारी ग्रीन हाऊसचे स्टिंग आॅपरेशन केले. संबंधित शेतकरी तानाजी आनंदराव चव्हाण हे जयंत पाटील यांचेच समर्थक असल्याचे व जयंत पाटील यांनी त्यांचा वापर करून बोगस आरोप केल्याचे ...

इस्लामपूर : बोगस ग्रीन हाऊसच्या माध्यमातून आष्टा येथील शेतकऱ्याला चुकीच्या पद्धतीने अनुदान वाटप केल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केल्यानंतर कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी रविवारी ग्रीन हाऊसचे स्टिंग आॅपरेशन केले. संबंधित शेतकरी तानाजी आनंदराव चव्हाण हे जयंत पाटील यांचेच समर्थक असल्याचे व जयंत पाटील यांनी त्यांचा वापर करून बोगस आरोप केल्याचे समोर आले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सदाभाऊ खोत यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली.आष्टा (ता. वाळवा) येथील शेतकरी तानाजी आनंदराव चव्हाण यांनी ८१ लाख ९१ हजारांचे ग्रीन हाऊससाठीचे अनुदान चुकीच्या पध्दतीने घेऊन शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत केला होता. याची स्वत: कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शहानिशा केली. यामध्ये कोणताही भ्रष्टाचार अथवा फसवणूक झाली नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मंत्री खोत यांनी संबंधित शेतकरी तानाजी चव्हाण यांचा आष्टा येथे जाऊन सत्कार केला. विशेष म्हणजे चव्हाण हे जयंत पाटील यांचेच कार्यकर्ते असून, वैयक्तिक आकसापोटी चव्हाण यांना अडचणीत आणल्याचा आरोपही खोत यांनी केला.तानाजी चव्हाण म्हणाले, आम्ही घेतलेल्या अनुदानासाठी प्रत्येक सात-बारा वेगळा आहे. शासनाच्या धोरणानुसार आम्हाला माझ्या नावावर २०१३-१४ मध्ये ४० गुंठ्यासाठी ३ लाख ६० हजार, शांताबाई आनंदराव चव्हाण यांना १५ गुंठ्यासाठी १ लाख ९० हजार, तसेच भगतसिंग यांच्या ४० गुंठ्यासाठी ३ लाख २४ हजारांचे, असे अनुदान घेतले आहे. यापूर्वी मला शासनाचा शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाला आहे. या ग्रीन हाऊसमुळे परिसरातील शेकडो लोकांना रोजगार मिळाला आहे. असे असताना माझी बदनामी कशासाठी? सध्या मी जिल्हा शेती कमिटीवर नियुक्त आहे. परंतु या सर्व प्रकारामुळे मी जिल्हाधिकाºयांना भेटून आपल्या पदाचा राजीनामा देणार आहे.यावेळी इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील, वैभव शिंदे, प्रवीण माने, बाळासाहेब थोटे, जिल्हा कृषी अधीक्षक राजेंद्र साबळे, उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ, कृषी अधीक्षक उमेश पाटील, तालुका कृषी अधिकारी भगवान माने उपस्थित होते.काय आहे प्रकरणमंत्री खोत म्हणाले, २७ मार्च रोजी जयंत पाटील यांनी विधानसभेतील चर्चेत आष्टा येथील शेतकरी तानाजी आनंदराव चव्हाण, शांताबाई आनंदराव चव्हाण, भगतसिंग चव्हाण अशा एकाच कुटुंबातील व्यक्तींच्या नावे ८१ लाख ९१ हजार इतके अनुदान बोगसरित्या घेतल्याचा आरोप केला होता. तसेच कोणत्याही प्रकारचे ग्रीन हाऊस त्याठिकाणी नसल्याचेही त्यांनी नमूद केले होते. त्यावेळी मी त्यांना प्रत्युत्तर दिले होते. रविवारी १ एप्रिल रोजी चव्हाण यांच्या ग्रीन हाऊसला भेट देऊन संबंधित शेतकºयांची भेट घेतली. मिळालेले अनुदान आणि त्याचा वापर योग्यप्रकारे झाला का, याची खात्री केली असता, यामध्ये शासनाची कसलीही फसवणूक झाली नसल्याचे समोर आले. केवळ माझ्याविरोधात राजकीय सूडबुध्दीनेच आ. पाटील यांनी हे आरोप केल्याचे निष्पन्न झाले.