शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

सदाभाऊंकडून जयंतरावांच्या आरोपाचे ‘स्टिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 23:15 IST

इस्लामपूर : बोगस ग्रीन हाऊसच्या माध्यमातून आष्टा येथील शेतकऱ्याला चुकीच्या पद्धतीने अनुदान वाटप केल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केल्यानंतर कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी रविवारी ग्रीन हाऊसचे स्टिंग आॅपरेशन केले. संबंधित शेतकरी तानाजी आनंदराव चव्हाण हे जयंत पाटील यांचेच समर्थक असल्याचे व जयंत पाटील यांनी त्यांचा वापर करून बोगस आरोप केल्याचे ...

इस्लामपूर : बोगस ग्रीन हाऊसच्या माध्यमातून आष्टा येथील शेतकऱ्याला चुकीच्या पद्धतीने अनुदान वाटप केल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केल्यानंतर कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी रविवारी ग्रीन हाऊसचे स्टिंग आॅपरेशन केले. संबंधित शेतकरी तानाजी आनंदराव चव्हाण हे जयंत पाटील यांचेच समर्थक असल्याचे व जयंत पाटील यांनी त्यांचा वापर करून बोगस आरोप केल्याचे समोर आले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सदाभाऊ खोत यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली.आष्टा (ता. वाळवा) येथील शेतकरी तानाजी आनंदराव चव्हाण यांनी ८१ लाख ९१ हजारांचे ग्रीन हाऊससाठीचे अनुदान चुकीच्या पध्दतीने घेऊन शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत केला होता. याची स्वत: कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शहानिशा केली. यामध्ये कोणताही भ्रष्टाचार अथवा फसवणूक झाली नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मंत्री खोत यांनी संबंधित शेतकरी तानाजी चव्हाण यांचा आष्टा येथे जाऊन सत्कार केला. विशेष म्हणजे चव्हाण हे जयंत पाटील यांचेच कार्यकर्ते असून, वैयक्तिक आकसापोटी चव्हाण यांना अडचणीत आणल्याचा आरोपही खोत यांनी केला.तानाजी चव्हाण म्हणाले, आम्ही घेतलेल्या अनुदानासाठी प्रत्येक सात-बारा वेगळा आहे. शासनाच्या धोरणानुसार आम्हाला माझ्या नावावर २०१३-१४ मध्ये ४० गुंठ्यासाठी ३ लाख ६० हजार, शांताबाई आनंदराव चव्हाण यांना १५ गुंठ्यासाठी १ लाख ९० हजार, तसेच भगतसिंग यांच्या ४० गुंठ्यासाठी ३ लाख २४ हजारांचे, असे अनुदान घेतले आहे. यापूर्वी मला शासनाचा शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाला आहे. या ग्रीन हाऊसमुळे परिसरातील शेकडो लोकांना रोजगार मिळाला आहे. असे असताना माझी बदनामी कशासाठी? सध्या मी जिल्हा शेती कमिटीवर नियुक्त आहे. परंतु या सर्व प्रकारामुळे मी जिल्हाधिकाºयांना भेटून आपल्या पदाचा राजीनामा देणार आहे.यावेळी इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील, वैभव शिंदे, प्रवीण माने, बाळासाहेब थोटे, जिल्हा कृषी अधीक्षक राजेंद्र साबळे, उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ, कृषी अधीक्षक उमेश पाटील, तालुका कृषी अधिकारी भगवान माने उपस्थित होते.काय आहे प्रकरणमंत्री खोत म्हणाले, २७ मार्च रोजी जयंत पाटील यांनी विधानसभेतील चर्चेत आष्टा येथील शेतकरी तानाजी आनंदराव चव्हाण, शांताबाई आनंदराव चव्हाण, भगतसिंग चव्हाण अशा एकाच कुटुंबातील व्यक्तींच्या नावे ८१ लाख ९१ हजार इतके अनुदान बोगसरित्या घेतल्याचा आरोप केला होता. तसेच कोणत्याही प्रकारचे ग्रीन हाऊस त्याठिकाणी नसल्याचेही त्यांनी नमूद केले होते. त्यावेळी मी त्यांना प्रत्युत्तर दिले होते. रविवारी १ एप्रिल रोजी चव्हाण यांच्या ग्रीन हाऊसला भेट देऊन संबंधित शेतकºयांची भेट घेतली. मिळालेले अनुदान आणि त्याचा वापर योग्यप्रकारे झाला का, याची खात्री केली असता, यामध्ये शासनाची कसलीही फसवणूक झाली नसल्याचे समोर आले. केवळ माझ्याविरोधात राजकीय सूडबुध्दीनेच आ. पाटील यांनी हे आरोप केल्याचे निष्पन्न झाले.