शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

मदनभाऊंच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने पाऊल

By admin | Updated: April 14, 2017 23:09 IST

जयश्रीताई पाटील : महापालिकेच्या ५६ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे उद््घाटन; सांगली, कुपवाडला स्वच्छ पाणी

सांगली : सांगली व कुपवाड या दोन शहरांना स्वच्छ व मुबलक पाणी देण्याचे मदन पाटील यांचे स्वप्न होते. या स्वप्नपूर्तीच्या दिशेने आणखी एक पाऊल महापालिकेने टाकले आहे. ५६ एमएलडी जलशद्धीकरण केंद्रामुळे दोन्ही शहरांना स्वच्छ पाणी मिळणार आहे, असे प्रतिपादन काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांनी शुक्रवारी केले. महापालिकेच्या माळबंगला येथील ५६ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे उद््घाटन श्रीमती पाटील यांच्याहस्ते करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या. महापौर हारूण शिकलगार, आयुक्त रवींद्र खेबूडकर, गटनेते किशोर जामदार, स्वाभिमानी आघाडीचे गटनेते जगन्नाथ ठोकळे, माजी महापौर कांचन कांबळे, माजी उपमहापौर प्रशांत पाटील मजलेकर, स्थायी समितीचे माजी सभापती संतोष पाटील, नगरसेवक दिलीप पाटील, धनपाल खोत यावेळी उपस्थित होते. पाटील म्हणाल्या की, माळबंगला येथील ३६ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचा विस्तार वाढविण्यात आला आहे. आता ५६ एमएलडी पाणी शुद्ध होणार आहे. त्यामुळे सांगली व कुपवाड या दोन शहरांना स्वच्छ पाणी मिळेल. या दोन्ही शहरांसाठी मदन पाटील यांनी वारणा उद््भव योजना आणली होती. शहराला मुबलक व स्वच्छ पाणी मिळावे, हे त्यांचे स्वप्न होते. वारणा पाणी योजनेचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. त्याचाही पाठपुरावा सुरू आहे. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शरद सागरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी महिला व बालकल्याण सभापती सुनीता खोत, माजी सभापती गुलजार पेंढारी, माजी उपमहापौर प्रशांत पाटील, नगरसेवक पांडुरंग भिसे, रोहिणी पाटील, पुष्पलता पाटील, अलका पवार आदी यावेळी उपस्थित होते. अभियंता अजित जाधव यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)