शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकार पूरग्रस्तांना घरे बांधून देण्यासाठी कटिबध्द -:चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 00:02 IST

पुरामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात हजारो घरांसह, शेती आणि जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळची पूरस्थिती लक्षात घेता, नदीकाठच्या गावांना सातत्याने पुराचा सामना करावा लागत

ठळक मुद्देपर्यायी जागा खरेदीसाठीही पैसे देणार

सांगली : पुरामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात हजारो घरांसह, शेती आणि जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळची पूरस्थिती लक्षात घेता, नदीकाठच्या गावांना सातत्याने पुराचा सामना करावा लागत असल्याने, यापुढे घरांचे नुकसान होणार नाही याबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे. त्यासाठीच पूरग्रस्तांना जागा खरेदीसाठी सरकारकडून पैसे देण्याबरोबरच घरे बांधून देण्यासाठी सरकार कटिबध्द आहे, असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पूरपरिस्थिती आणि मदत आढावा बैठकीनंतर महसूलमंत्री पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पूरग्रस्तांना सावरण्याबरोबरच त्यांना अधिक मदत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

महसूलमंत्री पाटील म्हणाले, पूर ओसरला असला तरी प्रशासनासमोर स्वच्छतेसह पूरग्रस्तांना दिलासा देण्याचे आव्हान होते. पुरामुळे जिल्ह्यातील चार लाखांवर स्थलांतरित झालेली कुटुंबे घरी परतली असली तरी, त्यांना सावरण्याचे आव्हान सर्वांसमोर आहे. पूरग्रस्तांना संकटातून बाहेर काढत मदतीसाठी सरकारचे प्राधान्य असणार आहे. पुरातून सावरलेल्या कुटुंबांसाठी तात्काळ पाच हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे.

जिल्ह्यात आलेली यंदाची पूरस्थिती लक्षात घेता, नदीकाठच्या लोकांना वारंवार पुराचा सामना करावा लागत आहे. सतत घरांना पुराचा फटका बसणार नाही, याबाबतची दक्षता सरकारकडून घेतली जाणार आहे. पुरामुळे बाधित झालेल्या घरांच्या उभारणीचे मोठे आव्हान सरकारपुढे असणार आहे. या भागातील जनजीवन स्थिरावण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यात पुनर्वसनाचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. पूरग्रस्त कुटुंबांना जागा खरेदीसाठी सरकारकडून पैसे देण्यात येतील, जेणेकरून पुन्हा पुन्हा नुकसानीचा सामना करावा लागणार नाही.

यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, महापौर संगीता खोत, आमदार पृथ्वीराज देशमुख, अप्पर सचिव प्रवीण परदेशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.धोकादायक घरात कोणीही राहू नयेमहसूलमंत्री पाटील म्हणाले, पूरग्रस्त भागातील पंचनामे सुरू आहेत. धोकादायक घरांमध्ये कोणीही राहू नये. नवीन घर पूर्ण होईपर्यंत ग्रामीण भागात २४ हजार, तर शहरात ३६ हजारांचे अनुदान देण्यात येणार आहे. नवीन घर बांधण्यासाठी ग्रामीण भागात अडीच, तर शहरी भागात साडेतीन लाख रुपये देण्यात येणार आहेत. सरकार पूरग्रस्तांना पूर्णपणे सावरण्यासाठी तयार आहे.राजू शेट्टींची प्रगल्भता मोठीस्वाभिमानीचे नेते माजी खा. राजू शेट्टी यांनी पुराबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप केला आहे. यावर महसूलमंत्री पाटील यांना प्रतिक्रिया विचारली असता, शेट्टी हे मोठे नेते आहेत. त्यांची प्रगल्भता जादा आहे. मी स्वत: दिवसभरात अनेक गावात जाऊन पूरस्थितीबाबतची माहिती घेत आहे. त्यात कोठेही कोणीही सरकारविरोधात बोलत नाहीत. त्यामुळे आता शेट्टींनी सरकारविरोधात मोर्चे काढण्यापेक्षा पूरग्रस्तांना सावरण्यासाठीच्या उपाययोजना सुचवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Sangli Floodसांगली पूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलRaju Shettyराजू शेट्टी