शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात कॉँग्रेस स्वबळावर सरकार स्थापन करणार

By admin | Updated: October 12, 2014 00:53 IST

हर्षवर्धन पाटील : आटपाडीत राष्ट्रवादीवर हल्लाबोल

विटा : विधानसभेची निवडणूक ऐतिहासिक असून, विचाराने मतदान करण्याची गरज आहे. राज्यात आघाडीत बिघाडी झाली ते बरे झाले. बेभरवशाची माणसे बाजूला गेली कारण त्यांनी आघाडी धर्म कधीच पाळला नाही, असा हल्ला राष्ट्रवादीवर चढवत राज्यात कॉँग्रेस पक्ष स्वबळावर सरकार स्थापन केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.आटपाडी येथे आज (शनिवारी) खानापूर मतदारसंघाचे कॉँग्रेसचे उमेदवार आ. सदाशिवराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत माजी मंत्री पाटील बोलत होते. यावेळी आ. पाटील, आनंदराव पाटील, अण्णासाहेब पत्की, रामभाऊ पाटील, भारत पाटील, वसंतराव गायकवाड, जयदीप भोसले, वलवणचे सदाशिव पाटील, रामरावदादा पाटील, प्रतापदादा साळुंखे, रवींद्रअण्णा देशमुख, जि. प. सदस्य डॉ. नामदेव माळी उपस्थित होते.माजी मंत्री पाटील म्हणाले की, कॉँग्रेसच्या कोणत्याही आमदार व मंत्र्यांवर डाग नाही. राष्ट्रवादीच्याच भानगडी जास्त आहेत. त्यामुळे यावेळी आघाडी तुटली ते योग्य झाले. कारण राष्ट्रवादीच्या भानगडीचे सर्व खापर कॉँग्रेसवर फुटले असते. खानापूरचे आमदार सदाशिवराव पाटील यांनी टेंभू योजनेसाठी दहा मिनिटे सभागृह बंद पाडले. निधी मंजूर घेतला. कोणत्याही भूलथापांना बळी न पडता आ. पाटील यांच्या पाठीशी ताकद उभी करावी.केंद्राच्या निर्यातबंदीमुळे डाळिंब व साखरेचे दर कमी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. परंतु, दुसऱ्या बाजूला सिमेंटचे भाव वाढवून गुजरातमधील सिमेंट कंपन्यांचे केंद्राने भले केले. अमेरिकेतील १०८ औषधांच्या फाईलवर सही करायची असेल तरच अमेरिकेला या, असा अमेरिकेने फतवा काढल्यानंतरही मोदी अमेरिकेला जाऊन त्या फाईलवर सही केल्याने औषधांच्या किमती वाढल्या. त्याला केंद्रातील भाजप सरकारच जबाबदार असल्याचा आरोपही यावेळी माजी मंत्री पाटील यांनी केला.आ. पाटील म्हणाले की, दुष्काळात कॉँग्रेसने चारा छावण्यांसह अन्य उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. सर्वांत जास्त डाळिंब अनुदान आटपाडीला मिळाले. विकास कामात खानापूर व आटपाडी असा भेदभाव केला नाही. दत्तोपंत चोथे यांनी प्रास्ताविक केले. नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, उपनगराध्यक्ष झाकीर तांबोळी, बाबूराव गायकवाड, पृथ्वीराज पाटील, दीपक पाटील, विजय पुजारी भैय्या मोरे, जयकुमार देशमुख, राधेशाम जाधव, संभाजी ठोंबरे उपस्थित होते. (वार्ताहर)