शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

राज्यात कॉँग्रेस स्वबळावर सरकार स्थापन करणार

By admin | Updated: October 12, 2014 00:53 IST

हर्षवर्धन पाटील : आटपाडीत राष्ट्रवादीवर हल्लाबोल

विटा : विधानसभेची निवडणूक ऐतिहासिक असून, विचाराने मतदान करण्याची गरज आहे. राज्यात आघाडीत बिघाडी झाली ते बरे झाले. बेभरवशाची माणसे बाजूला गेली कारण त्यांनी आघाडी धर्म कधीच पाळला नाही, असा हल्ला राष्ट्रवादीवर चढवत राज्यात कॉँग्रेस पक्ष स्वबळावर सरकार स्थापन केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.आटपाडी येथे आज (शनिवारी) खानापूर मतदारसंघाचे कॉँग्रेसचे उमेदवार आ. सदाशिवराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत माजी मंत्री पाटील बोलत होते. यावेळी आ. पाटील, आनंदराव पाटील, अण्णासाहेब पत्की, रामभाऊ पाटील, भारत पाटील, वसंतराव गायकवाड, जयदीप भोसले, वलवणचे सदाशिव पाटील, रामरावदादा पाटील, प्रतापदादा साळुंखे, रवींद्रअण्णा देशमुख, जि. प. सदस्य डॉ. नामदेव माळी उपस्थित होते.माजी मंत्री पाटील म्हणाले की, कॉँग्रेसच्या कोणत्याही आमदार व मंत्र्यांवर डाग नाही. राष्ट्रवादीच्याच भानगडी जास्त आहेत. त्यामुळे यावेळी आघाडी तुटली ते योग्य झाले. कारण राष्ट्रवादीच्या भानगडीचे सर्व खापर कॉँग्रेसवर फुटले असते. खानापूरचे आमदार सदाशिवराव पाटील यांनी टेंभू योजनेसाठी दहा मिनिटे सभागृह बंद पाडले. निधी मंजूर घेतला. कोणत्याही भूलथापांना बळी न पडता आ. पाटील यांच्या पाठीशी ताकद उभी करावी.केंद्राच्या निर्यातबंदीमुळे डाळिंब व साखरेचे दर कमी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. परंतु, दुसऱ्या बाजूला सिमेंटचे भाव वाढवून गुजरातमधील सिमेंट कंपन्यांचे केंद्राने भले केले. अमेरिकेतील १०८ औषधांच्या फाईलवर सही करायची असेल तरच अमेरिकेला या, असा अमेरिकेने फतवा काढल्यानंतरही मोदी अमेरिकेला जाऊन त्या फाईलवर सही केल्याने औषधांच्या किमती वाढल्या. त्याला केंद्रातील भाजप सरकारच जबाबदार असल्याचा आरोपही यावेळी माजी मंत्री पाटील यांनी केला.आ. पाटील म्हणाले की, दुष्काळात कॉँग्रेसने चारा छावण्यांसह अन्य उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. सर्वांत जास्त डाळिंब अनुदान आटपाडीला मिळाले. विकास कामात खानापूर व आटपाडी असा भेदभाव केला नाही. दत्तोपंत चोथे यांनी प्रास्ताविक केले. नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, उपनगराध्यक्ष झाकीर तांबोळी, बाबूराव गायकवाड, पृथ्वीराज पाटील, दीपक पाटील, विजय पुजारी भैय्या मोरे, जयकुमार देशमुख, राधेशाम जाधव, संभाजी ठोंबरे उपस्थित होते. (वार्ताहर)