शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘स्थायी’त विभागीय समतोल

By admin | Updated: November 21, 2014 00:26 IST

आठजणांच्या निवडी : कुपवाड, सांगलीवाडीला प्रतिनिधीत्व

सांगली : महापालिका स्थायी समितीच्या आठ सदस्यांची निवड गुरुवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आली. निवडी करताना विभागीय समतोल राखण्याचा प्रयत्न सर्वच पक्षांनी केल्याचे दिसून आले. काँग्रेसचे दिलीप पाटील, हारूण शिकलगार, शिवाजी दुर्वे, स्वाभिमानी आघाडीचे जगन्नाथ ठोकळे, शांता जाधव, राष्ट्रवादीचे शेडजी मोहिते, आशा शिंदे, जरीना बागवान या सात सदस्यांची स्थायी समितीवर निवड करण्यात आल्याचे महापौरांनी जाहीर केले. गेल्या पंधरा दिवसांपासून स्थायीत वर्णी लावण्यासाठी सर्वच पक्षाच्या इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी स्थायी समितीतील आठ सदस्य निवृत्त झाले होते. त्यात काँग्रेस व राष्ट्रवादीचे प्रत्येकी तीन, स्वाभिमानीच्या दोन सदस्यांचा समावेश होता. सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीनंतर सदस्य निवडीचा निर्णय घेतला होता. गेल्या पंधरा दिवसांपासून इच्छुकांनी स्थायीत वर्णी लागावी, म्हणून पक्षाच्या नेत्यांकडे साकडे घातले होते. त्यामुळे स्थायी निवडीकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. सदस्य निवडीवरच सभापती निवडीचे भवितव्य अवलंबून असल्याने इच्छुकांनी नेत्यांकडे जोरदार प्रयत्न केले होते. कोणत्या शहरातील किती सदस्यांना संधी मिळणार, हासुद्धा विषय चर्चेचा होता. सत्ताधारी काँग्रेस तसेच विरोधी बाकावरील राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी आघाडीने तिन्ही शहरांना प्रतिनिधीत्व देण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसने सांगली, मिरजेला संधी देताना दिलीप पाटील यांच्या माध्यमातून सांगलीवाडीला स्थायीत स्थान दिले. सांगलीवाडीत अनपेक्षित यश काँग्रेसला मिळाल्याने स्थायी समितीवर सांगलीवाडीला संधी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने सांगली, मिरज आणि कुपवाड असा समतोल साधला. राष्ट्रवादीकडे इच्छुकांची संख्या अधिक होती. नगरसेवक राजू गवळी, कुपवाडचे शेडजी मोहिते, जुबेर चौधरी यांच्यासह माजी महापौर मैनुद्दीन बागवान, संगीता हारगे यांनीही प्रयत्न केले होते. (प्रतिनिधी)भाजपला ठेंगा; जगन्नाथ ठोकळे यांची वर्णीस्वाभिमानी आघाडीत भाजप, शिवसेना अशी फूट पडली आहे. गटनेते शिवराज बोळाज हे माजी आमदार संभाजी पवार समर्थक असल्याने स्थायी निवडीत पवार गटाचाच वरचष्मा राहण्याची शक्यता होती. निवडीत तसेच घडले. पवार गटाचे जगन्नाथ ठोकळे यांची वर्णी लागली. अपक्ष नगरसेविका शांता जाधव यांनी आघाडीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांनाही पवार गटानेच संधी दिल्याचे सांगितले जात आहे. आघाडीत भाजप सदस्यांची संख्या अधिक असतानाही त्यांच्यापैकी कोणालाही संधी मिळू शकली नाही. सांगली-मिरजेतून विधानसभा निवडणुकीत विजय मिळविल्याबद्दल आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे व मुख्यमंत्रीपदी निवडीबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. एलबीटी सुरू ठेवण्याची घोषणा केल्याबद्दलही मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव किशोर जामदार यांनी मांडली. गौतम पवार यांचा विरोध नोंदवून ठराव संमत करण्यात आला.