शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

स्थायी सदस्यांचा सभागृहात ठिय्या- पावसाळी मुरूमावरून वाद : निविदाच न काढल्याने संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 23:12 IST

महापालिकेच्या स्थायी समिती सभेत पुन्हा एकदा पावसाळी मुरूमावरून जोरदार वाद झाला. गत सभेत प्रशासनाने मुरुमाची निविदा काढल्याचे स्पष्ट केले होते. पण मंगळवारी ही बाब खोटी ठरल्याने सर्वच नगरसेवक

सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सभेत पुन्हा एकदा पावसाळी मुरूमावरून जोरदार वाद झाला. गत सभेत प्रशासनाने मुरुमाची निविदा काढल्याचे स्पष्ट केले होते. पण मंगळवारी ही बाब खोटी ठरल्याने सर्वच नगरसेवक संतप्त झाले. सर्वपक्षीय नगरसेवकांनी सभापतींच्या आसनासमोर ठिय्या मांडत प्रशासनाचा खोटारडेपणा उघडकीस आणला. अखेर आयुक्त, उपायुक्तांनी तीन दिवसांत निविदा प्रक्रिया पूर्ण करून पावसाळी मुरूम उपलब्ध करण्याची ग्वाही दिल्यानंतर नगरसेवकांनी आंदोलन मागे घेतले.

सभापती बसवेश्वर सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली. सभेच्या सुरुवातीला नगरसेवक दिलीप पाटील, शिवराज बोळाज, प्रियांका बंडगर, प्रशांत पाटील यांच्यासह सर्वच नगरसेवकांनी पावसाळी मुरूमाचा मुद्दा उपस्थित केला. गत सभेत बांधकामचे उपअभियंता सतीश सावंत यांनी पावसाळी मुरुमाची निविदा काढण्यात आली असल्याचे सांगितले होते. मंगळवारी सदस्यांनी, या निविदेचे काय झाले? अशी विचारणा केली.

त्यावर शहर अभियंता बामणे यांनी, निविदा काढली नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे सदस्यांचा पारा चढला. सावंत यांनी सभागृहाला खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. त्यावर बांधकाममधील अधिकाऱ्यांनी सारवासारव करण्याचाही प्रयत्न केला. केवळ शामरावनगरसाठी मुरुमाची निविदा काढल्याचा खुलासा केला.

त्यावर दिलीप पाटील यांनी, गत सभेतील इतिवृत्तांताच्या सत्यप्रती सदस्यांसह अधिकाºयांना दिल्या. गत सभेत सावंत यांनी निविदा काढल्याचे इतिवृत्तात स्पष्टपणे म्हटले होते. प्रशासन पावसाळी मुरुमासाठी टाळाटाळ करीत असल्याचे दिसताच सर्वच सदस्य सभापतींच्या आसनासमोर एकवटले. सदस्यांनी सभागृहात आंदोलन सुरू केले. तब्बल अर्धा ते पाऊण तास नगरसेवकांचे आंदोलन सुरू होते. अधिकाºयांकडून खोटी माहिती दिली जात असल्याबद्दल सदस्यांनी संताप व्यक्त केला.

नगरसेविका बंडगर यांनी, शामरावनगरपेक्षाही दत्तनगरमध्ये दयनीय अवस्था झाली आहे. प्रशासनाने मुरूम दिलेला नाही. नागरिकांनाही, प्रशासनाचा खरा चेहरा सांगता येईल, उद्यापर्यंत मुरूम न मिळाल्यास महासभेत आवाज उठवण्याचा इशारा दिला.अखेर उपायुक्त सुनील पवार यांनी आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. आयुक्तांनी तीन दिवसांची शॉर्ट नोटीस काढून पावसाळी मुरूम उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. त्यानंतर सभेच्या कामकाजाला पुन्हा सुरुवात झाली.भावना अन् आशाप्रशासनाच्या कारभारावर नगरसेवकांनी टीकेची झोड उठवली. उपायुक्त पवार यांनी, प्रशासनाची काम करण्याची भावना आहे. आयुक्तसाहेब निश्चित पावसाळी मुरुमाच्या फाईलवर सह्या करतील असे सांगून सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यावर प्रशांत पाटील यांनी, प्रशासनाच्या भावना व आशेवरच सांगलीकर नागरिक आहेत, असा टोला लगावला.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण