शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

प्रचार शिगेला : नेत्यांना वाघ, नाग आणि सागाची उपमा

By admin | Updated: October 5, 2014 23:04 IST

वाघ, नागाचे समीकरण असलेल्या या मतदारसंघात आता नव्याने काँग्रेसच्या सागाचे समीकरण

अशोक पाटील -इस्लामपूर - विधानसभा निवडणुकीत मतदानाला अवघे १० दिवस उरले आहेत. राज्यपातळीवर आघाडीची बिघाडी झाली, तर युतीचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार एकमेकांविरोधात उभे आहेत. तिघांचाही प्रचार शिगेला पोहोचला आहे. वाळवा-शिराळा सीमारेषेवर महामार्गावरील कणेगाव ते कासेगावदरम्यान असलेल्या गावांतून तिघांचेही राजकारण एकवटले आहे. वाघ, नागाचे समीकरण असलेल्या या मतदारसंघात आता नव्याने काँग्रेसच्या सागाचे समीकरण जोडले जाऊ लागले आहे. या मतदारसंघात वाळवा तालुक्यातील ४८ गावांचा समावेश आहे. त्यामुळे ‘वाळव्याचा वाघ’ म्हणजे जयंत पाटील यांनी राजकारणातील स्थान टिकवून ठेवले आहेत. शिवाजीराव नाईक म्हणजेच शिराळ्याचा नाग. पाटील व नाईक यांच्यामधील संघर्ष नेहमीच चर्चिला जातो. त्यात आता नव्यानेच कोकरुड म्हणजे डोंगरी भागातील सागवानाची भर पडली आहे. ‘सागवान म्हणजे सत्यजित देशमुख’ असे नवीन समीकरण प्रचारसभेतून गाजू लागले आहे.इस्लामपूर मतदारसंघात शांतता असली तरी, या वाळवा तालुक्यातील ४८ गावांत मात्र प्रचार शिगेला पोहोचला आहे. या प्रचाराचा केंद्रबिंदू पुणे-बेंगलोर महामार्गावरील कणेगाव ते कासेगावदरम्यान असलेली सर्व गावे बनली आहेत. कणेगाव, येलूर, इटकरे, येडेनिपाणी, कामेरी, पेठ, नेर्ले, कासेगाव ही गावे शिराळा मतदारसंघातील मोठी गावे आहेत. या गावांतील मतदारच शिराळ्याचा आमदार ठरवत असतात. त्यामुळे सर्वच पक्षांतील दिग्गज नेत्यांच्या सभा गाजू लागल्या आहेत. पहिल्या फेरीत काँग्रेसचे नारायण राणे यांनी कामेरी येथे सभा घेतली. याच गावात भाजपकडून नितीन गडकरी यांच्याही सभेचे आयोजन करण्यात आले आहे.शिराळा मतदारसंघावर जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. ते म्हणतील तोच आमदार, असे समीकरण असल्याचे मानले जाते. राष्ट्रवादीचे उमेदवार मानसिंगराव नाईक यांच्या पाठीशी ते आहेत. भाजपचे उमेदवार शिवाजीराव नाईक यांचे पानिपत करण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. त्यामुळेच याहीवेळी वाघ-नागाचा संघर्ष पहावयास मिळत आहे. त्यातच आता विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी आणलेल्या निधीतून केलेल्या विकास कामांच्या ताकदीवर त्यांचे चिरंजीव सत्यजित देशमुख यांनी काँग्रेसतर्फे राष्ट्रवादी आणि भाजपपुढे आव्हान उभे केले आहे.डोंगरी भागातील मुंबईचे मतदान खेचण्याचे प्रयत्न तिन्ही उमेदवारांकडून केले जात आहेत. मुंबई येथे जाऊन प्रचार सभाही घेण्यात आल्या आहेत. वाघ, नाग आणि सागाचे राजकारण चांगलेच रंगले असून, कार्यकर्त्यांसह मतदारांचा भाव वधारला आहे.वाळव्यातील ४८ गावेच केंद्रबिंदूप्रचाराच्या रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर मतदारसंघात सध्या शांतता असली तरी, या वाळवा तालुक्यातील ४८ गावांत मात्र प्रचार शिगेला पोहोचला आहे. या प्रचाराचा केंद्रबिंदू पुणे-बेंगलोर महामार्गावरील कणेगाव ते कासेगावदरम्यान असलेली सर्व गावे बनली आहेत. ही गावे शिराळ्याचा आमदार ठरवित असल्याने याच भागात दिग्गज नेत्यांच्या सभा गाजू लागल्या आहेत.