शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

प्रचार शिगेला : नेत्यांना वाघ, नाग आणि सागाची उपमा

By admin | Updated: October 5, 2014 23:04 IST

वाघ, नागाचे समीकरण असलेल्या या मतदारसंघात आता नव्याने काँग्रेसच्या सागाचे समीकरण

अशोक पाटील -इस्लामपूर - विधानसभा निवडणुकीत मतदानाला अवघे १० दिवस उरले आहेत. राज्यपातळीवर आघाडीची बिघाडी झाली, तर युतीचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार एकमेकांविरोधात उभे आहेत. तिघांचाही प्रचार शिगेला पोहोचला आहे. वाळवा-शिराळा सीमारेषेवर महामार्गावरील कणेगाव ते कासेगावदरम्यान असलेल्या गावांतून तिघांचेही राजकारण एकवटले आहे. वाघ, नागाचे समीकरण असलेल्या या मतदारसंघात आता नव्याने काँग्रेसच्या सागाचे समीकरण जोडले जाऊ लागले आहे. या मतदारसंघात वाळवा तालुक्यातील ४८ गावांचा समावेश आहे. त्यामुळे ‘वाळव्याचा वाघ’ म्हणजे जयंत पाटील यांनी राजकारणातील स्थान टिकवून ठेवले आहेत. शिवाजीराव नाईक म्हणजेच शिराळ्याचा नाग. पाटील व नाईक यांच्यामधील संघर्ष नेहमीच चर्चिला जातो. त्यात आता नव्यानेच कोकरुड म्हणजे डोंगरी भागातील सागवानाची भर पडली आहे. ‘सागवान म्हणजे सत्यजित देशमुख’ असे नवीन समीकरण प्रचारसभेतून गाजू लागले आहे.इस्लामपूर मतदारसंघात शांतता असली तरी, या वाळवा तालुक्यातील ४८ गावांत मात्र प्रचार शिगेला पोहोचला आहे. या प्रचाराचा केंद्रबिंदू पुणे-बेंगलोर महामार्गावरील कणेगाव ते कासेगावदरम्यान असलेली सर्व गावे बनली आहेत. कणेगाव, येलूर, इटकरे, येडेनिपाणी, कामेरी, पेठ, नेर्ले, कासेगाव ही गावे शिराळा मतदारसंघातील मोठी गावे आहेत. या गावांतील मतदारच शिराळ्याचा आमदार ठरवत असतात. त्यामुळे सर्वच पक्षांतील दिग्गज नेत्यांच्या सभा गाजू लागल्या आहेत. पहिल्या फेरीत काँग्रेसचे नारायण राणे यांनी कामेरी येथे सभा घेतली. याच गावात भाजपकडून नितीन गडकरी यांच्याही सभेचे आयोजन करण्यात आले आहे.शिराळा मतदारसंघावर जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. ते म्हणतील तोच आमदार, असे समीकरण असल्याचे मानले जाते. राष्ट्रवादीचे उमेदवार मानसिंगराव नाईक यांच्या पाठीशी ते आहेत. भाजपचे उमेदवार शिवाजीराव नाईक यांचे पानिपत करण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. त्यामुळेच याहीवेळी वाघ-नागाचा संघर्ष पहावयास मिळत आहे. त्यातच आता विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी आणलेल्या निधीतून केलेल्या विकास कामांच्या ताकदीवर त्यांचे चिरंजीव सत्यजित देशमुख यांनी काँग्रेसतर्फे राष्ट्रवादी आणि भाजपपुढे आव्हान उभे केले आहे.डोंगरी भागातील मुंबईचे मतदान खेचण्याचे प्रयत्न तिन्ही उमेदवारांकडून केले जात आहेत. मुंबई येथे जाऊन प्रचार सभाही घेण्यात आल्या आहेत. वाघ, नाग आणि सागाचे राजकारण चांगलेच रंगले असून, कार्यकर्त्यांसह मतदारांचा भाव वधारला आहे.वाळव्यातील ४८ गावेच केंद्रबिंदूप्रचाराच्या रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर मतदारसंघात सध्या शांतता असली तरी, या वाळवा तालुक्यातील ४८ गावांत मात्र प्रचार शिगेला पोहोचला आहे. या प्रचाराचा केंद्रबिंदू पुणे-बेंगलोर महामार्गावरील कणेगाव ते कासेगावदरम्यान असलेली सर्व गावे बनली आहेत. ही गावे शिराळ्याचा आमदार ठरवित असल्याने याच भागात दिग्गज नेत्यांच्या सभा गाजू लागल्या आहेत.